शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदारला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
5
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
6
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
7
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
8
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
9
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
10
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
11
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
12
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
13
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
14
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
15
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
16
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
17
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
18
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
19
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
20
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 

गाफील यंत्रणेमुळे मालेगाव हॉटस्पॉट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 23:26 IST

नाशिक : जिल्ह्यातील मालेगाव शहर व तालुक्यातील कोरोनाबधितांचा आकडा दिवसांत २५८ वर जाऊन पोहोचला असून, आतापर्यंत १२ जणांचा बळी गेला आहे.

नाशिक : जिल्ह्यातील मालेगाव शहर व तालुक्यातील कोरोनाबधितांचा आकडा दिवसांत २५८ वर जाऊन पोहोचला असून, आतापर्यंत १२ जणांचा बळी गेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाउन घोषित केल्यानंतरही गाफील राहिलेल्या प्रशासकीय यंत्रणेमुळे मालेगाव कोरोनाचे हॉटस्पॉट बनले असून, गेल्या तीन-चार दिवसांत बाधितांचा आकडा वाढतच चालल्याने परिस्थिती आणखी चिघळत चालली आहे. त्यामुळे आता खांदेपालट करत सरकारही सतर्क झाले आहे.  पंतप्रधान मोदी यांनी २३ मार्चला लॉकडाउन घोषित केल्यानंतर नाशिक जिल्ह्यात २९ एप्रिल रोजी पहिला कोरोनाबाधित रुग्ण निफाड तालुक्यात आढळून आला होता. त्यापाठोपाठ नाशिक शहरात एका रुग्णाचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर ८ एप्रिल रोजी मालेगावमध्ये एकाच वेळी ५ रुग्ण कोरोनाबाधित आढळले तर पहिला बळीही मालेगावच्याच बाधित रुग्णाचा गेला. ८ ते २९ एप्रिल या २२ दिवसांच्या कालावधीत तब्बल २५८ बाधित रुग्ण आढळून आले असून, कोरोनाने १२ जणांचा बळी घेतला आहे. लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर दिल्लीतील कार्यक्रमांशी कनेक्शन असलेल्या लोकांना तात्काळ क्वॉरण्टाइन करण्याची प्रक्रिया राबविण्याबाबत प्रशासकीय यंत्रणा गाफील राहिली. त्यामुळे आता सद्यस्थितीत त्याचा उद्रेक मालेगावमध्ये पाहायला मिळतो आहे.इन्फोलॅब सुविधेमुळे चाचण्या जलद जिल्ह्यातील कोरोना संशयित रुग्णांचे स्वॅब नमुने प्रारंभी पुणे येथे लॅबमध्ये तपासणीसाठी पाठविले जात होते. त्यानंतर शासनाने धुळे येथे लॅब कार्यान्वित केली. आता नाशिकलाच मविप्रच्या वैद्यकीय महाविद्यालयात लॅबची सोय झाली असून, एका दिवसात १८०हून अधिक तपासणी अहवाल प्राप्त होत आहेत. या जलद तपासणीमुळेही आता मालेगावमधील वाढता प्रसार समोर येत आहे.--------------शासनालाही उशिराने शहाणपण सुचले आणि अपर जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, आरोग्याधिकारी यांच्या उचलबांगड्या करण्याची नामुष्की ओढवली. दाट लोकवस्तीतील लोकांशी सुसंवाद साधत त्यांच्यात कोरोनाबाबत जागृती करण्यातही यंत्रणा कमी पडली.  या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून मालेगाव आता हॉटस्पॉट तर बनले आहेच शिवाय मुंबई, पुण्यापाठोपाठ हिटलिस्टमध्येही आले आहे. दरम्यान, राज्याचे गृहमंत्री आणि आरोग्यमंत्री यांनी जिल्हा दौरा करत यंत्रणा हलवली आहे, त्यामुळे कोरोनाची बाधा काहीअंशी कमी होण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे. शासनालाही उशिराने शहाणपण सुचले आणि अपर जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, आरोग्याधिकारी यांच्या उचलबांगड्या करण्याची नामुष्की ओढवली. दाट लोकवस्तीतील लोकांशी सुसंवाद साधत त्यांच्यात कोरोनाबाबत जागृती करण्यातही यंत्रणा कमी पडली. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून मालेगाव आता हॉटस्पॉट तर बनले आहेच शिवाय मुंबई, पुण्यापाठोपाठ हिटलिस्टमध्येही आले आहे. दरम्यान, राज्याचे गृहमंत्री आणि आरोग्यमंत्री यांनी जिल्हा दौरा करत यंत्रणा हलवली आहे, त्यामुळे कोरोनाची बाधा काहीअंशी कमी होण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक