शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

मालेगावमध्ये कळवणचा समावेश नको

By admin | Updated: June 19, 2014 00:57 IST

कळवण : नियोजित मालेगाव जिल्हानिर्मितीमध्ये कळवण तालुक्याचा समावेश करू नये,अशी मागणी जि प सदस्य नितीन पवार यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे

कळवण : नियोजित मालेगाव जिल्हानिर्मितीला कुठलाही विरोध नाही. परंतु त्यामध्ये कळवण आदिवासी तालुक्याचा समावेश करू नये, आदिवासी जनतेची मागणी लक्षात घेऊन शासनाने कळवण आदिवासी जिल्हानिर्मिती करावी, अशी मागणी नाशिक जिल्हा परिषदेचे सदस्य व आदिवासी विकास महामंडळाचे माजी संचालक नितीन पवार यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे मालेगाव जिल्ह्यात कळवणचा समावेश करू नये अशा आशयाचा तालुक्यातील ग्रामपंचायत व विविध सहकारी संस्था यांचे ठराव, तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी व ग्रामस्थ यांचे निवेदन तयार केले आहे. राज्यातील भाजपा-शिवसेना युतीच्या शासनात ए. टी. पवार हे आदिवासी विकासमंत्री असताना त्यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात कळवण आदिवासी जिल्हा निर्मितीची मागणी केली होती. त्यावेळी तत्कालीन राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी कळवण आदिवासी जिल्हा निर्मितीला हिरवा कंदील दिला होता. या निर्णयाचे आदिवासी जनतेने स्वागत केले होते. परंतु पुढे सरकार बदलल्यानंतर कुठलीही कार्यवाही झाली नाही.कळवण येथे नियोजित आदिवासी जिल्ह्यासाठी आवश्यक कार्यालयासाठी सुसज्ज प्रशासकीय कार्यालयाची इमारत उभी असून, आजमितीला कळवण शहरात अनेक महत्त्वाची कार्यालये सुरू आहेत. त्यात प्रामुख्याने उपविभागीय अधिकारी कार्यालयाला जिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी आज काम पाहत आहेत. आदिवासी विकास प्रकल्प, उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम व वीज वितरण, पोलीस उपअधीक्षक , पाटबंधारे, आदिवासी विकास महामंडळ, प्रादेशिक सेवायोजन , कार्यालयांनी कळवण शहर व्यापले आहे. शासनाच्या महसूल आचारसंहितानुसार कळवण येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाला कामे करण्याचा अधिकार दिलेला आहे व सध्या जिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी शासन नियुक्त असल्याने कळवणला विकासासाठी इतर नवीन खाते उघडण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही त्यामुळे कळवण तालुक्याला शासनाने आदिवासी जिल्ह्याचा दर्जा द्यावा, अशी मागणी पवार यांनी केली आहे. (वार्ताहर)