शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावमध्ये कळवणचा समावेश नको

By admin | Updated: June 19, 2014 00:57 IST

कळवण : नियोजित मालेगाव जिल्हानिर्मितीमध्ये कळवण तालुक्याचा समावेश करू नये,अशी मागणी जि प सदस्य नितीन पवार यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे

कळवण : नियोजित मालेगाव जिल्हानिर्मितीला कुठलाही विरोध नाही. परंतु त्यामध्ये कळवण आदिवासी तालुक्याचा समावेश करू नये, आदिवासी जनतेची मागणी लक्षात घेऊन शासनाने कळवण आदिवासी जिल्हानिर्मिती करावी, अशी मागणी नाशिक जिल्हा परिषदेचे सदस्य व आदिवासी विकास महामंडळाचे माजी संचालक नितीन पवार यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे मालेगाव जिल्ह्यात कळवणचा समावेश करू नये अशा आशयाचा तालुक्यातील ग्रामपंचायत व विविध सहकारी संस्था यांचे ठराव, तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी व ग्रामस्थ यांचे निवेदन तयार केले आहे. राज्यातील भाजपा-शिवसेना युतीच्या शासनात ए. टी. पवार हे आदिवासी विकासमंत्री असताना त्यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात कळवण आदिवासी जिल्हा निर्मितीची मागणी केली होती. त्यावेळी तत्कालीन राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी कळवण आदिवासी जिल्हा निर्मितीला हिरवा कंदील दिला होता. या निर्णयाचे आदिवासी जनतेने स्वागत केले होते. परंतु पुढे सरकार बदलल्यानंतर कुठलीही कार्यवाही झाली नाही.कळवण येथे नियोजित आदिवासी जिल्ह्यासाठी आवश्यक कार्यालयासाठी सुसज्ज प्रशासकीय कार्यालयाची इमारत उभी असून, आजमितीला कळवण शहरात अनेक महत्त्वाची कार्यालये सुरू आहेत. त्यात प्रामुख्याने उपविभागीय अधिकारी कार्यालयाला जिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी आज काम पाहत आहेत. आदिवासी विकास प्रकल्प, उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम व वीज वितरण, पोलीस उपअधीक्षक , पाटबंधारे, आदिवासी विकास महामंडळ, प्रादेशिक सेवायोजन , कार्यालयांनी कळवण शहर व्यापले आहे. शासनाच्या महसूल आचारसंहितानुसार कळवण येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाला कामे करण्याचा अधिकार दिलेला आहे व सध्या जिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी शासन नियुक्त असल्याने कळवणला विकासासाठी इतर नवीन खाते उघडण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही त्यामुळे कळवण तालुक्याला शासनाने आदिवासी जिल्ह्याचा दर्जा द्यावा, अशी मागणी पवार यांनी केली आहे. (वार्ताहर)