शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
3
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
4
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
5
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
6
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
7
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
8
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
9
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
10
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
11
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
12
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
13
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
14
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
15
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!
16
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
17
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
18
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
19
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
20
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे

मालेगावचा व्यापारी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 01:16 IST

सटाणा : ताहाराबाद रस्त्यावरील वीरगावनजीक होंडा सिटी कारच्या चालकाचा ताबा सुटून कार झाडावर जाऊन आदळल्याने झालेल्या भीषण अपघातात मालेगाव येथील व्यापारी संजय रमणभाई आमीन (५०) यांचा जागीच मृत्यू झाला, तर चालकासह तिघे किरकोळ जखमी झाले आहेत. सोमवारी पहाटेच्या सुमारास हा अपघात घडल्याची माहिती सटाणा पोलिसांनी दिली आहे.

ठळक मुद्देतिघे जखमी : वाहनावरील ताबा सुटला वीरगावजवळ अपघात;

सटाणा : ताहाराबाद रस्त्यावरील वीरगावनजीक होंडा सिटी कारच्या चालकाचा ताबा सुटून कार झाडावर जाऊन आदळल्याने झालेल्या भीषण अपघातात मालेगाव येथील व्यापारी संजय रमणभाई आमीन (५०) यांचा जागीच मृत्यू झाला, तर चालकासह तिघे किरकोळ जखमी झाले आहेत. सोमवारी पहाटेच्या सुमारास हा अपघात घडल्याची माहिती सटाणा पोलिसांनी दिली आहे.मालेगाव येथे वास्तव्यास असलेले मूळचे गुजरात राज्यातील आमीन कुटुंबीय गुजरातमधील एका नातलगाच्या साखरपुड्याच्या कार्यक्र माला गेले होते. गुजरातहून परतीच्या प्रवासाला निघालेल्या त्यांच्या होंडा सिटी कार चालकाला पहाटेच्या सुमारास डुलकी आल्याने वीरगाव परिसरात ही कार झाडावर जाऊन आदळली. धडक इतकी भीषण होती की या अपघातात कारमध्ये बसलेले संजय आमीन यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचा मुलगा ध्रुव आमीन (१५) आणि वडील रमनभाई अमीन (७०), चालक पार्थ आमीन हे किरकोळ जखमी झाले आहेत. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक शिंदे करीत आहेत.चालक पार्थची होती परीक्षाच्कारचालक पार्थ अमीन यांची मालेगाव येथील एका महाविद्यालयात सोमवारी (दि.३) परीक्षा होती. ताहाराबाद परिसरातदेखील त्यांना डुलकी आल्याने कारचा ताबा सुटला होता; मात्र तो वेळीच नियंत्रणात आला. संजय आमीन यांनी त्याला तासभर आराम करण्याचा सल्लादेखील दिला होता. मात्र परीक्षा आहे म्हणून लवकर मालेगावला जायचे आहे यासाठी त्याने आराम न करता कार चालविल्याने पुन्हा त्याला डुलकी आली आणि कार झाडावर आदळून आमीन यांचा मृत्यू झाल्याचे त्यांचे पुत्र ध्रुव याने ही माहिती पोलिसांना दिली.