शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींची शरद पवार, उद्धव ठाकरेंना खुली ऑफर; CM शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
2
'माझ्यावरील आरोप खोटे होते, त्यावेळी मला वाचवले नाही'; रविंद्र वायकरांचा ठाकरे गटावर आरोप
3
हेमंत सोरेन यांना दिलासा नाहीच, सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी 13 मे रोजी होणार!
4
पालघरमधील सहाही आमदार आमच्यासोबत, हितेंद्र ठाकूर यांनी वाढवलं भाजपा आणि ठाकरे गटाचं टेन्शन
5
“मोदींनी मान्य करावे की आता सत्तेत येत नाहीत”; पवार, ठाकरेंच्या ऑफरवर नाना पटोले थेट बोलले
6
'चाँदनी'ला अनोखी आदरांजली! अंधेरी लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील चौकाला श्रीदेवीचं नाव
7
"काँग्रेसला मतदान करणं म्हणजे...", नवनीत राणांच्या वक्तव्यावरून वाद, गुन्हा दाखल
8
नरहरी झिरवळ शरद पवार गटाच्या वाटेवर, चौथ्या टप्प्यातील मतदानापूर्वी महायुतीला मोठा धक्का
9
‘नकली शिवसेनावाले मला जिवंत गाडण्याच्या बाता मारताहेत, म्हणताहेत…’ नरेंद्र मोदींची टीका  
10
ते बालबुद्धीने बोलत असतात; अजितदादांनी डिवचताच शरद पवारांचा आक्रमक पलटवार
11
तुमच्याकडेही SBI चे क्रेडिट कार्ड असेल तर 'हे' जाणून घ्या; होऊ शकते मोठे नुकसान
12
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करतात गंगापूजा; त्याबरोबरच देवघरातील गंगेशी संबंधित नियम वाचा!
13
Gold Silver Price: गेल्या अक्षय तृतीयेला घेतलेल्या सोन्याची किंमत किती झाली माहितीये? दरात झालीये मोठी वाढ
14
'बिग बॉस' फेम अब्दु रोझिकच्या लग्नाची बातमी खोटी? जवळचा मित्र शिव ठाकरे म्हणाला...
15
“नरेंद्र मोदी लटकता आत्मा, आमचे पवित्र आत्मे त्यांच्यासोबत जाणार नाही”; संजय राऊतांचा पलटवार
16
Akshaya Tritiya 2024: सुखाचा व धनाचा कधीही होणार नाही क्षय; अक्षय्य तृतीयेला घरी आणा 'ही' मूर्ती!
17
"यूपीत इंडिया आघाडीचे वादळ, नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार नाहीत", राहुल गांधींचा हल्लाबोल
18
देशातील पहिला डिजिटल भिकारी राजूचे Heart Attack ने निधन, QR कोडद्वारे मागायचा भीक
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : "निलेश लंके तू किस झाड की पत्ती है..." अजित पवार यांचा इशारा
20
काँग्रेसमध्ये जाण्यापेक्षा शिंदे, अजितदादांसोबत या; PM मोदींची उद्धव ठाकरे, शरद पवारांना खुली 'ऑफर'

उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 2:05 AM

मालेगाव तालुक्यात दमदार पाऊस झाला नसल्यामुळे ग्रामस्थांना पावसाळ्यातदेखील पाणीटंचाईचा सामना करावा लागतो आहे. लोकप्रतिनिधींनी पाण्याचे महत्त्व जाणून पाण्याचे योग्य नियोजन करावे, असे आवाहन ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी केले.

ठळक मुद्देदादा भुसे ; मालेगावी सरपंच-उपसरपंच मेळाव्यात आवाहन

मालेगाव : तालुक्यात दमदार पाऊस झाला नसल्यामुळे ग्रामस्थांना पावसाळ्यातदेखील पाणीटंचाईचा सामना करावा लागतो आहे. लोकप्रतिनिधींनी पाण्याचे महत्त्व जाणून पाण्याचे योग्य नियोजन करावे, असे आवाहन ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी केले.येथील अग्रेसन भवन येथे जिल्हा परिषद व मालेगाव पंचायत समितीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या सरपंच, उपसरपंच मेळाव्यात राज्यमंत्री भुसे बोलत होते.यावेळी भुसे म्हणाले की, चणकापूर, पुनंद धरणातील पाणीसाठा अत्यल्प आहे. तालुक्यातील गावांना पाणीपुरवठा करणाºया या तलावात महिनाभर पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक आहे. जर लवकर पाऊस झाला नाही तर तालुक्याला भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागेल. त्यामुळे उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करा. लोकप्रतिनिधी व ग्रामसेवक यांनी गावातील पाण्याबाबतची गंभीर परिस्थिती ग्रामस्थांसमोर मांडा, अशा स्पष्ट सूचना भुसे यांनी यावेळी दिल्या.राज्यात बाळासाहेब ठाकरे स्मृती योजनेतून एक हजार ग्रामपंचायतींची कार्यालये बांधली जाणार आहेत. त्याअंतर्गत तालुक्यात २१ ग्रामपंचातींच्या बांधकामांना मंजुरी मिळाली आहे, तर नऊ ग्रामपंचायतींना मंजुरीची प्रतीक्षा आहे. ज्या ग्रामपंचायतींच्या बांधकामांना मंजुरी मिळाली त्या गावातील सरपंच, ग्रामसेवक यांना आदेशाचे वाटप करण्यात आले.मेळाव्यात सौंदाणेचे सरपंच डॉ. मिलिंद पवार यांच्यासह विविध गावांतील सरपंचांनी सूचना व समस्या मांडल्या. मेळाव्याला पंचायत समिती सदस्य भगवान मालपुरे, सुरेखा ठाकरे, शंकर बोरसे, सरला शेळके, कृष्णा ठाकरे, दाभाडीच्या सरपंच चारुशिला निकम, विश्वनाथ निकम, गटविकास अधिकारी आनंद पिंगळे यांच्यासह पंचायत समितीचे विभागप्रमुख उपस्थित होते.

टॅग्स :Malegaonमालेगांवsarpanchसरपंच