शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

खंडित विकासाला चालना देण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करा छगन भुजबळ : विकासकामांबाबत आढावा बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2019 17:40 IST

येवला : मागील काळात जिल्हाभरातील विकासाची गती खंडित झाल्याने पुन्हा त्याच गतीने येवला मतदारसंघासह जिल्ह्याला पुढे घेऊन जाण्यासाठी शासनाला प्रशासनाची साथ असणे आवश्यक आहे. त्यामुळे आगामी काळात अधिक मेहनत घेऊन सकारात्मक काम करूया असे आवाहन राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी अधिकाऱ्यांना केले.

ठळक मुद्देयेवला संपर्ककार्यालय येथे येवला मतदारसंघ व जिल्ह्यातील विकासकामांबाबत मंगळवारी आढावा बैठक झाली. त्यावेळी त्यांनी सर्व खातेप्रमुख अधिकाऱ्यांंशी चर्चा करून कामकाजाचा आढावा घेतला.

यावेळी प्रांतअधिकारी राजेंद्र पाटील, तहसीलदार रोहिदास वारु ळे, येवला नगरपालिकेच्या मुख्याधिकारी संगीता नांदूरकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता रणजित हांडे, कार्यकारी अभियंता सूर्यकांत अहिरे, कार्यकारी अभियंता सिद्धार्थ तांबे, महावितरणचे कार्यकारी अभियंता आर.डी. डोंगरे, येवल्याचे उपविभागीय अभियंता एस.एम. देवरे, उपविभागीय अभियंता उमेश पाटील, निफाडचे उपविभागीय अभियंता महेश पाटील, मांजरपाडा प्रकल्पाचे उपविभागीय अधिकारी विश्वास दराडे, बीडीओ उमेश देशमुख, विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, पंचायत समिती सदस्य मोहन शेलार, मकरंद सोनवणे, संजय सोमसे, संतोष खैरनार, विजय खोकले यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.छगन भुजबळ यांनी मंगळवारी बैठकीत रस्ते, पाणी, वीज, शेती यांसह येवला शहर व जिल्ह्यातील रखडलेल्या प्रकल्पाबाबत आढावा घेतला. यावेळी त्यांनी अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीच्या पंचनामेची सद्यस्थिती जाणून घेतली त्याचबरोबर एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीवाचून वंचित राहणार नाही याची प्रशासनाने काळजी घ्यावी अशी तंबी अधिकाºयांना दिली. जिल्ह्यातील खराब रस्त्यांची माहिती संकलित करून तातडीने दुरु स्ती करण्यासाठी कार्यवाही करावी. पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव कालव्याची, उर्वरित भरावांची, खोलीकरणाची व लिकेजेसची कामे लवकरात लवकर पूर्ण करावी त्यासाठी आवश्यक प्रस्ताव तयार करून मार्गी लावावे. येवला प्रशासकीय कार्यालयात येणाºया शेतकरी बांधवांना आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करून द्या. येवला शहर स्वच्छतेबाबत कारवाई करून संपूर्ण येवला शहर हे स्वच्छ राहायला हवे तसेच येवला सुशोभीकरणाची कामे तातडीने पूर्ण करा, असे आदेश येवला नगरपालिकेच्या मुख्याधिकाºयांना दिले. तसेच अधिकाºयांंना आवश्यक ट्रान्सफॉर्मर तातडीने उपलब्ध करून द्यावे तसेच सिंगल फेज यंत्रणेच्या अडचणी तत्काळ दूर करण्यात याव्या. शेतकºयांना नुकसानभरपाईचे वाटप करून याबाबत शेतकºयांच्या असणाºया अडचणी दूर करा. एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामा नये. शेतकºयांच्या हिताच्या दृष्टीने आवश्यक असलेली कामे सामोपचाराने पूर्ण करा तसेच कोणी खोडसाळपणे कामात अडथळे निर्माण करीत असेल तर त्यांच्यावर प्रसंगी कायदेशीर कारवाई करा. त्याचबरोबर रखडलेल्या कामांना गती देण्यात येऊन प्रस्तावांचा सातत्याने पाठपुरावा करण्यात यावा, असे आदेश त्यांनी संबंधित अधिकाºयांना दिले.