शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
4
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
5
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
6
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
7
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
8
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
9
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
10
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
12
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
13
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
14
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
15
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
16
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
17
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
18
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
19
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
20
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक

देश व समाजाची सेवा करून जीवन सार्थकी लावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 14:55 IST

नांदूरवैद्य : सदैव संतांच्या सहवासात राहिल्याने जीवनाचा उद्धार होण्यास विलंब लागत नाही. तसेच देशसेवा केल्याने देखील मानवी जीवनाचे सार्थक ...

ठळक मुद्देपुरूषोत्तम पाटील : किसन महाराज काजळे पुण्यतिथी सोहळा

नांदूरवैद्य : सदैव संतांच्या सहवासात राहिल्याने जीवनाचा उद्धार होण्यास विलंब लागत नाही. तसेच देशसेवा केल्याने देखील मानवी जीवनाचे सार्थक होते. त्यामुळे देशाची व समाजाची सेवा करु न आपले जीवन सार्थकी लावा असे आवाहन पुरूषोत्तम महाराज पाटील यांनी केले.इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य येथील महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार व प्रबोधनकार वैकुंठवासी किसन महाराज काजळे यांच्या १५ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कीर्तनातून केले.ज्यांनी आपले जीवन समाजाला तसेच देशाला वाहून घेतले आहे अशाच समाजसेवकांचे तसेच देशभक्तांचे जयंती उत्सव, तसेच पुण्यतिथी साजरी केली जाते. तसेच त्यांचे पुतळे उभारले जातात.म्हणून देशसेवेला प्राधान्य देऊन देशसेवा करून आपली कीर्ती या जगामध्ये मागे ठेवून गेल्यास निश्चितच जीवनाचे सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. यावेळी संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचा आधार घेत ‘उत्तमची उरे कीर्ती मागे ’ या उक्तीप्रमाणे तुम्ही किती वर्ष जगला ? यापेक्षा तुम्ही कसे जगला याला विशेष महत्त्व असल्यामुळे आपण गेल्यानंतरही समाजाने आपली आठवण काढली पाहिजे,असे प्रबोधन पाटील यांनी केले.यानंतर पुरूषोत्तम महाराज पाटील यांचा केशव महाराज काजळे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.नंतर भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आले.रामकृष्ण महाराज लहवितकर यांनी सांगितले की, नाशिक जिल्ह्यात पहिले बालसंस्कार शिबीर सुरू करण्याचा मान वैकुंठवासी किसन महाराज काजळे यांना जातो.त्र्यंबकेश्वर येथे पहिले शिबीर सुरू करून त्यांनी महाराष्ट्रात अनेक नामवंत कीर्तनकार, गायक, मृदुंगवादकघडविले आहेत.याप्रसंगी प्रभाकर मुसळे, सोपान मुसळे, रामदास यंदे, संतोष डोळस, सखाहारी काजळे, नामदेव डोळस, किसन यंदे, मोहन धोंगडे, शिवाजी मुसळे, माधव काजळे, दत्तात्रय दिवटे, माजी सैनिक तुकाराम काजळे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकReligious programmeधार्मिक कार्यक्रम