शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

गोदावरीला प्रदूषणमुक्त करा : भारती पवार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 00:54 IST

धार्मिक महत्त्व असलेल्या गोदावरी नदीत केमिकलयुक्त पाणी मिसळत असल्याने प्रदूषण वाढले असून, गोदावरीसह नांदूर-मधमेश्वर येथे केंद्र व राज्य सरकारच्या मार्फत स्वच्छता अभियान राबवून प्रदूषण मुक्ती साधण्याची मागणी दिंडोरीच्या खासदार डॉ. भारती पवार यांनी संसदेत केली. 

नाशिक : धार्मिक महत्त्व असलेल्या गोदावरी नदीत केमिकलयुक्त पाणी मिसळत असल्याने प्रदूषण वाढले असून, गोदावरीसह नांदूर-मधमेश्वर येथे केंद्र व राज्य सरकारच्या मार्फत स्वच्छता अभियान राबवून प्रदूषण मुक्ती साधण्याची मागणी दिंडोरीच्या खासदार डॉ. भारती पवार यांनी संसदेत केली. गोदावरी नदी दक्षिण भारतातील एक प्रमुख नदी असून तिला दक्षिण गंगादेखील म्हटले जाते. परंतु वाढत असलेले जल प्रदूषण गोदावरीची समस्या बनले आहे. खूप साऱ्या कंपन्यांचे केमिकलयुक्त खराब पाणी या नदीपात्रात सोडले जाते. ज्यामुळे गोदावरीचे पाणी पिण्यायोग्य राहत नाही आणि त्यामुळे त्वचेसंबंधीचे आजार होण्याची भीतीदेखील असते. पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात दुर्गंधीचे प्रमाण वाढले असून काही ठिकाणी गोदावरी नदीचे संपूर्ण पात्र पानवेलींनी घेरलेले आहे असे  सांगून खासदार डॉ. भारती पवार यांनी गोदावरी प्रदूषण मुक्त करण्याची मागणी केली.निफाड तालुक्यातील नांदुर मध्यमेश्वर येथे पक्षी अभयारण्य असून तेथे २०० पेक्षा अधिक जातींचे पक्षी येत असतात. त्याच ठिकाणी २५ पेक्षा अधिक माशांच्या प्रजाती देखील पहावयास मिळतात.  या नांदूर मध्यमेश्वरला रामसरमध्ये घोषित केले आहे. परंतु या क्षेत्रातही जल प्रदूषणाचा धोका वाढत आहे. यामुळे  केंद्र आणि राज्य सरकारमार्फत स्वच्छता अभियान राबवून गोदावरी नदीचे प्रदूषण दूर करण्यासाठी विशेष उपाययोजना करण्याचा प्रयत्न करण्याची विनंती त्यांनी केली.

टॅग्स :Nashikनाशिकgodavariगोदावरी