शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
4
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
5
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
7
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
8
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
9
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
10
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
11
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
12
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
13
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
14
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
15
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
16
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
17
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
18
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
19
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
20
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...

दुर्बल घटकांच्या विकासाठी प्रयत्न होणे गरजेचे,ग्रामविकास राज्यमंत्री दादाभूसे यांचे प्रतिपादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 18:41 IST

विकासाची फळे समाजातील शेवटच्या घटकांपर्यत पोहोचवण्याचे आणि दुर्बल घटकांच्या विकासाचे प्रयत्न व्हावेत, असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी केले. यशवतंराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ येथे 73 व 74 घटना दुरुस्तीच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त ह्यप्रगती व पुढील दिशाह्ण या संकल्पनेवर आयोजित विभागीय परिषदेत ते बोलत होते.

ठळक मुद्देदुर्बल घटकांच्या विकासाठी प्रयत्न होणे आवश्यकग्रामविकास राज्यमंत्री दादाभूसे यांचे प्रतिपादन73 व 74 घटना दुरुस्तीच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त विभागीय परिषदेत

नाशिक :  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून विकासाची फळे समाजातील शेवटच्या घटकांपर्यत पोहोचवण्याचे आणि दुर्बल घटकांच्या विकासाचे प्रयत्न व्हावेत, असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी केले.यशवतंराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ येथे 73 व 74 घटना दुरुस्तीच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त ह्यप्रगती व पुढील दिशाह्ण या संकल्पनेवर आयोजित विभागीय परिषदेत ते बोलत होते. कार्यक्रमास विभागीय आयुक्त झगडे, नाशिक जि.प.अध्यक्षा शितल सांगळे, अहमदनगर जि.प अध्यक्षा शालीनी विखे-पाटील, महापौर रंजना भानसी, विद्यापीठाचे कुलगुरु ई.वायुनंदन, मनपा आयुक्त डॉ. अभिषेक कृष्णा, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मिना, डी. गंगाधरन, पोलीस अधीक्षक संजय दराडे, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. दिनेश बोंडे, आदी उपस्थित होते. भुसे म्हणाले,गेल्या 25 वर्षात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून लोकशाहीअधिक प्रगल्भ झाली आहे. यानिमित्ताने पंचायतराज व्यवस्थेच्या कामगिरीचा आढावा घेतला गेल्यास काळानुरुप बदल घडवून आणता येतील. वसंतराव नाईक समितीने सुचविलेल्या त्रिस्तरीय रचनेच्या माध्यमातून विकास योजना ग्रामीण भागापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न झाला. घटन दुरुस्तीनुसार शासनाकडील काही विषय स्थानिक स्वराज्य संस्थांकडे हस्तांतरीतकरण्यात आले आहेत.समाजातील समस्या दूर करण्या साठी आणि माणूस म्हणून प्रत्येकाला जगण्याचा हक्क देण्यासाठी घटनेच्या चौकटीत राहून उपाय शोधण्यात यावे. सकारात्मक दृष्टीकोनातून ग्रामपातळीवरील प्रश्न सोडवावे. भारताला महासत्ता बनविण्याच्या भावनेतून स्थानिक स्वराज्य संस्थेचे कामकाज व्हावे आणि जलयुक्त अभियान, स्वच्छ भारत आदी योजनांचे रुपांतरलोकचळवळीत व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पंचायतराज व्यवस्थेतील कामकाज अधिक गतिमान होण्यासाठी लोकप्रतिनिधींनाप्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे. मुख्यमंत्री महोदयांनी प्रत्येक जिल्ह्यात एक प्रशिक्षण केंद्र उभारण्याचे सुतोवाच केले आहे. परिषदेत लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या चर्चेतुन निघणारे सारांश स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पुढील वाटचालीसाठी महत्वाचे ठरतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तर विभागीय आयुक्त महेश झगडे म्हणाले, लोकांच्या आशा-आकांक्षा पुर्ण करण्यासाठी 73 व 74 व्या घटनादुरुस्तीच्या फलनिष्पत्तीचा आढावा घेऊन पुढील वाटचाल करणे गरजेचे आहे. मानवी जीवनात विकासाचे अनेक टप्पे आहेत. त्यातुन पुढे जात मानवाने प्रगती साधाली आहे. गेल्या 200 वर्षात प्रगतीचा वेग वाढून 54 टक्के जनता शहरी भागात रहात आहे. पुढील काही वर्षातहे प्रमाण 75 टक्क्यापर्यंत पोहोचेल. ग्रामीण भागातून नागरिक शहरात का जातात, त्यांनाआवश्यक सुविधा देण्यासाठी तरतूद केली जाते का याचा विचार परिषदेच्या निमित्ताने व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली ई वायुनंदन यांनी समाजातील प्रत्येक घटकाला मुलभूत सुविधा देण्यासाठीआणि एकंदरीत विकासासाठी शासनाने अत्यंत विचारपूर्वक घटनादुरुस्ती केल्याचे नमूद केले.

टॅग्स :ministerमंत्रीnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदpanchayat samitiपंचायत समितीNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका