शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
2
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
5
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
6
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
7
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
8
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
9
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
10
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
11
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
12
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
13
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
14
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
15
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
16
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
17
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
18
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
19
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
20
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...

बहुमताचा वापर हुकूमशाहीसाठी नसावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 01:06 IST

विभानसभेचे पडघम वाजले असून, राज्यभरात निवडणुकीसाठी राजकीय पक्षांची जोरदार तयारी सुरू आहे. येत्या २१ तारखेला राज्यभरात मतदान होणार असून, उमेदवारांनी आपल्या मतदारसंघात तयारी सुरू केली आहे.

वेळ : सकाळी ११ वाजतास्थळ : रथचक्र कट्टाइंदिरानगर : विभानसभेचे पडघम वाजले असून, राज्यभरात निवडणुकीसाठी राजकीय पक्षांची जोरदार तयारी सुरू आहे. येत्या २१ तारखेला राज्यभरात मतदान होणार असून, उमेदवारांनी आपल्या मतदारसंघात तयारी सुरू केली आहे. उमेदवारांचे ज्येष्ठ नागरिकांचा एक गठ्ठा मतदान याकडे लक्ष लागून आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या घरी निकालाविषयी सुरू असलेल्या चर्चेत त्यांनी ज्या पक्षाला बहुमत मिळेल त्यांनी हुकूमशाहीकडे वाटचाल करू नये, असे सांगितले.पक्षाला बहुमत म्हणजे हुकूमशाही असे वाटू लागले आहे तसेच सत्ताधाऱ्यांसमोर विरोधीपक्षही महत्त्वाचा असतो यावरच एका ज्येष्ठाने विरोधीपक्ष नामशेष करण्याचा प्रयत्न सध्या सुरू असल्याने मत मांडले त्यावर एकाने लोकशाहीला काळिमा फासणारे कृत्य सत्ताधाऱ्यांनी निर्माण केल्याचे सांगितले. तसेच एकाने सरकार हे फक्त गोडबोले असून, त्यांच्याकडून साधे-साधे प्रश्न सुटत नसल्याचे मत मांडले. तसेच एकाने राजकीय पक्ष म्हणजे सफेद पोषाखातील गुंड असल्याचे मत मांडले. त्यावर एकाने शहरातील काही राजकीय पक्षातील लोकांचे नाव घेत संताप व्यक्त केला. तसेच एकाने जिल्हा शेतीप्रधान असूनदेखील शेतकºयांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे सांगितले. तसेच एकाने तरुणाईमध्ये बेरोजगारीचे प्रमाण वाढले असून, कोणतेही सरकार कामाचे नसल्याचे सांगितले. त्यामुळे आता नव्याने स्थापन होणाºया सरकारने याकडे लक्ष दिले तर बरे होईल, असे मत व्यक्त केले. तसेच एकाने राज्यासह जिल्ह्यातील जातीपातीचे व घराणेशाहीचे राजकारण संपले पाहिजे तरच जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होण्याचे मत मांडत आमदारांना मिळणारे मानधन कमी करायले हवे, असेपण ते जनतेचा पैसा खातात असे मत मांडले. शेवटी सगळ्या ज्येष्ठांनी लोकप्रतिनिधींनी त्यांच्या प्रश्नाकडे लक्ष दिले पाहिजे, असे मत एकमताने व्यक्त केले.(या चर्चेत अरविंद पाटील, जयवंत मोरे, रमेश नागरे, सदाशिव उगले, बाबूराव पाटील, रंगनाथ राऊत, तुकाराम मोरे आदींनी सहभाग घेतला होता.)सरकार कोणतेही आले तरी ते हुकूमशाही पद्धतीने कामकाज करत असल्याचे मत या ज्येष्ठांनी मांडले. भाजप सरकार आले तेव्हा त्यांनी अचानक नोटबंदी करत सामान्य नागरिकांना वेठीस धरले. जनतेने आपले बहुमूल्य मत देत सरकार स्थापन केले, मात्र सरकारने काही निर्णय जनतेच्या हिताविरुद्ध घेतल्याचे मत या ज्येष्ठांनी मांडले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Nashikनाशिक