शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
3
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
4
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
5
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
8
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
9
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
10
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
11
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
12
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

बहुमताचा वापर हुकूमशाहीसाठी नसावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 01:06 IST

विभानसभेचे पडघम वाजले असून, राज्यभरात निवडणुकीसाठी राजकीय पक्षांची जोरदार तयारी सुरू आहे. येत्या २१ तारखेला राज्यभरात मतदान होणार असून, उमेदवारांनी आपल्या मतदारसंघात तयारी सुरू केली आहे.

वेळ : सकाळी ११ वाजतास्थळ : रथचक्र कट्टाइंदिरानगर : विभानसभेचे पडघम वाजले असून, राज्यभरात निवडणुकीसाठी राजकीय पक्षांची जोरदार तयारी सुरू आहे. येत्या २१ तारखेला राज्यभरात मतदान होणार असून, उमेदवारांनी आपल्या मतदारसंघात तयारी सुरू केली आहे. उमेदवारांचे ज्येष्ठ नागरिकांचा एक गठ्ठा मतदान याकडे लक्ष लागून आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या घरी निकालाविषयी सुरू असलेल्या चर्चेत त्यांनी ज्या पक्षाला बहुमत मिळेल त्यांनी हुकूमशाहीकडे वाटचाल करू नये, असे सांगितले.पक्षाला बहुमत म्हणजे हुकूमशाही असे वाटू लागले आहे तसेच सत्ताधाऱ्यांसमोर विरोधीपक्षही महत्त्वाचा असतो यावरच एका ज्येष्ठाने विरोधीपक्ष नामशेष करण्याचा प्रयत्न सध्या सुरू असल्याने मत मांडले त्यावर एकाने लोकशाहीला काळिमा फासणारे कृत्य सत्ताधाऱ्यांनी निर्माण केल्याचे सांगितले. तसेच एकाने सरकार हे फक्त गोडबोले असून, त्यांच्याकडून साधे-साधे प्रश्न सुटत नसल्याचे मत मांडले. तसेच एकाने राजकीय पक्ष म्हणजे सफेद पोषाखातील गुंड असल्याचे मत मांडले. त्यावर एकाने शहरातील काही राजकीय पक्षातील लोकांचे नाव घेत संताप व्यक्त केला. तसेच एकाने जिल्हा शेतीप्रधान असूनदेखील शेतकºयांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे सांगितले. तसेच एकाने तरुणाईमध्ये बेरोजगारीचे प्रमाण वाढले असून, कोणतेही सरकार कामाचे नसल्याचे सांगितले. त्यामुळे आता नव्याने स्थापन होणाºया सरकारने याकडे लक्ष दिले तर बरे होईल, असे मत व्यक्त केले. तसेच एकाने राज्यासह जिल्ह्यातील जातीपातीचे व घराणेशाहीचे राजकारण संपले पाहिजे तरच जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होण्याचे मत मांडत आमदारांना मिळणारे मानधन कमी करायले हवे, असेपण ते जनतेचा पैसा खातात असे मत मांडले. शेवटी सगळ्या ज्येष्ठांनी लोकप्रतिनिधींनी त्यांच्या प्रश्नाकडे लक्ष दिले पाहिजे, असे मत एकमताने व्यक्त केले.(या चर्चेत अरविंद पाटील, जयवंत मोरे, रमेश नागरे, सदाशिव उगले, बाबूराव पाटील, रंगनाथ राऊत, तुकाराम मोरे आदींनी सहभाग घेतला होता.)सरकार कोणतेही आले तरी ते हुकूमशाही पद्धतीने कामकाज करत असल्याचे मत या ज्येष्ठांनी मांडले. भाजप सरकार आले तेव्हा त्यांनी अचानक नोटबंदी करत सामान्य नागरिकांना वेठीस धरले. जनतेने आपले बहुमूल्य मत देत सरकार स्थापन केले, मात्र सरकारने काही निर्णय जनतेच्या हिताविरुद्ध घेतल्याचे मत या ज्येष्ठांनी मांडले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Nashikनाशिक