शहरं
Join us  
Trending Stories
1
हाँगकाँग अग्निकांडातील 83 जणांच्या मृत्यूला जबाबदार कोण? 70 वर्षांतील सर्वात मोठी दुर्घटना, 4600 जणांची घरे स्वाहा...! 
2
बिहारमधील पराभवाच्या आढावा बैठकीपूर्वीच काँग्रेसमध्ये मोठा राडा! दोन नेते एकमेकांना भिडले, कुणी दिली गोळी घालण्याची धमकी?
3
२०६ च्या एकदम ४४...! सीआयए अन् मोसादनं रचला काँग्रेसला हरवण्याचा कट? माजी खासदाराचा मोठा दावा, काय तर्क दिला? जाणून घ्या
4
कर्नाटक सत्तासंघर्ष : "जनादेश एका क्षणाचा नाही तर पाच वर्षांचा..."; CM-DCM यांचं वाक्युद्ध 
5
इम्रान खान कुठे आहेत? पाकिस्तान संसदेत पीटीआयचा गदारोळ; बहिणी तुरुंगाबाहेच बसून...
6
WPL Auction Sold And Unsold Players: शेवटच्या क्षणी अंपायरची लेक 'लखपती'; स्टार्कची बायको 'अनसोल्ड'च
7
लवकरच येतोय ICICI च्या जॉइंट व्हेंचरचा आयपीओ, केव्हा लॉन्च होणार? जाणून घ्या सविस्तर
8
"२ तारखेपर्यंत मला युती टिकवायचीय"; शिवसेनेसोबतच्या वादावर रविंद्र चव्हाणांचे मोठे राजकीय संकेत...
9
WPL 2026 Auction : एअरफोर्स ऑफिसर Shikha Pandey वर पैशांची 'बरसात'; ३६ व्या वर्षी विक्रमी बोली
10
“भाजपा पैसे वाटल्याशिवाय जिंकू शकत नाही, भविष्यात महायुती टिकणार नाही”: विजय वडेट्टीवार
11
WPL 2026 Auction : अनुष्का शर्माचं नाव येताच RCB तिच्या मागून धावला! पण खर्च नाही झेपला अन्...
12
१०० वर्षांनी पंचग्रही योग, २०२६ला ७ राशींची मनासारखी कमाई; पद-पैसा-प्रतिष्ठा, शुभ-लाभ भरभराट!
13
ट्रेनमध्ये प्रवास करताना नेटवर्क का जाते? इंटरनेट का होते स्लो? जाणून घ्या 'या' समस्येवरचा उपाय
14
एकपेक्षा जास्त लग्न करणे गुन्हा...'या' राज्यात विधेयक मंजूर; दंडासह कठोर शिक्षेची तरतूद
15
ॲपल अडकली? भारतात ₹३.२० लाख कोटी दंडाची टांगती तलवार; कायदा बदलला अन्...
16
३०० सीट वाढणार, ४ कोच कायमस्वरुपी जोडले जाणार; वंदे भारत ट्रेनला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद
17
मन हेलावून टाकणारी घटना...! पती, पत्‍नी, प्रियकर अन् एक अजब करार...! सर्वत्र होतेय चर्चा 
18
टाटा सिएरा खरेच ₹११.४९ लाखांना मिळणार? नेक्सॉन, हॅरिअरलाच खाऊन टाकणार..., हो, नाही...
19
अरेच्चा! भारतीयांना 'हे' शब्द नीट उच्चारताच येत नाही; तुम्ही Croissant, Ghibli चा उच्चार चुकवता?
20
Hong Kong Fire : अग्निकल्लोळ! हाँगकाँगमध्ये इमारतीला कशी लागली एवढी मोठी आग? ५५ जणांचा मृत्यू, २७९ जण बेपत्ता
Daily Top 2Weekly Top 5

बहुमताचा वापर हुकूमशाहीसाठी नसावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 01:06 IST

विभानसभेचे पडघम वाजले असून, राज्यभरात निवडणुकीसाठी राजकीय पक्षांची जोरदार तयारी सुरू आहे. येत्या २१ तारखेला राज्यभरात मतदान होणार असून, उमेदवारांनी आपल्या मतदारसंघात तयारी सुरू केली आहे.

वेळ : सकाळी ११ वाजतास्थळ : रथचक्र कट्टाइंदिरानगर : विभानसभेचे पडघम वाजले असून, राज्यभरात निवडणुकीसाठी राजकीय पक्षांची जोरदार तयारी सुरू आहे. येत्या २१ तारखेला राज्यभरात मतदान होणार असून, उमेदवारांनी आपल्या मतदारसंघात तयारी सुरू केली आहे. उमेदवारांचे ज्येष्ठ नागरिकांचा एक गठ्ठा मतदान याकडे लक्ष लागून आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या घरी निकालाविषयी सुरू असलेल्या चर्चेत त्यांनी ज्या पक्षाला बहुमत मिळेल त्यांनी हुकूमशाहीकडे वाटचाल करू नये, असे सांगितले.पक्षाला बहुमत म्हणजे हुकूमशाही असे वाटू लागले आहे तसेच सत्ताधाऱ्यांसमोर विरोधीपक्षही महत्त्वाचा असतो यावरच एका ज्येष्ठाने विरोधीपक्ष नामशेष करण्याचा प्रयत्न सध्या सुरू असल्याने मत मांडले त्यावर एकाने लोकशाहीला काळिमा फासणारे कृत्य सत्ताधाऱ्यांनी निर्माण केल्याचे सांगितले. तसेच एकाने सरकार हे फक्त गोडबोले असून, त्यांच्याकडून साधे-साधे प्रश्न सुटत नसल्याचे मत मांडले. तसेच एकाने राजकीय पक्ष म्हणजे सफेद पोषाखातील गुंड असल्याचे मत मांडले. त्यावर एकाने शहरातील काही राजकीय पक्षातील लोकांचे नाव घेत संताप व्यक्त केला. तसेच एकाने जिल्हा शेतीप्रधान असूनदेखील शेतकºयांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे सांगितले. तसेच एकाने तरुणाईमध्ये बेरोजगारीचे प्रमाण वाढले असून, कोणतेही सरकार कामाचे नसल्याचे सांगितले. त्यामुळे आता नव्याने स्थापन होणाºया सरकारने याकडे लक्ष दिले तर बरे होईल, असे मत व्यक्त केले. तसेच एकाने राज्यासह जिल्ह्यातील जातीपातीचे व घराणेशाहीचे राजकारण संपले पाहिजे तरच जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होण्याचे मत मांडत आमदारांना मिळणारे मानधन कमी करायले हवे, असेपण ते जनतेचा पैसा खातात असे मत मांडले. शेवटी सगळ्या ज्येष्ठांनी लोकप्रतिनिधींनी त्यांच्या प्रश्नाकडे लक्ष दिले पाहिजे, असे मत एकमताने व्यक्त केले.(या चर्चेत अरविंद पाटील, जयवंत मोरे, रमेश नागरे, सदाशिव उगले, बाबूराव पाटील, रंगनाथ राऊत, तुकाराम मोरे आदींनी सहभाग घेतला होता.)सरकार कोणतेही आले तरी ते हुकूमशाही पद्धतीने कामकाज करत असल्याचे मत या ज्येष्ठांनी मांडले. भाजप सरकार आले तेव्हा त्यांनी अचानक नोटबंदी करत सामान्य नागरिकांना वेठीस धरले. जनतेने आपले बहुमूल्य मत देत सरकार स्थापन केले, मात्र सरकारने काही निर्णय जनतेच्या हिताविरुद्ध घेतल्याचे मत या ज्येष्ठांनी मांडले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Nashikनाशिक