शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

खरिपावर मका, सोयाबीनची छाप

By admin | Updated: August 27, 2016 23:10 IST

बदलत्या पर्जन्यमानाचा ‘परिणाम’: ज्वारीच्या क्षेत्रात लाखाने झाली घट

 गणेश धुरी नाशिकबदलत्या पर्जन्यमानाने जिल्ह्यातील खरिपाचा पीक पेरणी पॅटर्नही बदलू लागला असून, कधी काळी दोन लाख हेक्टर लागवडीच्या घरात असलेली खरिपाची बाजरी यंदा अवघ्या सव्वा लाख हेक्टरवर मर्यादित राहिली आहे. त्या मानाने वाढत वाढत चक्क पावणे दोन लाख हेक्टरच्या घरात पोहोचलेल्या मका पिकाचे क्षेत्र दिवसागणिक वाढतच असून, यंदाच्या खरिपात ते चक्क सव्वादोन लाख हेक्टरच्या आसपास पोहोचले आहे. तीच बाब सोयाबीनच्या बाबतीत झाली असून, ४० हजार हेक्टरच्या आसपास मर्यादित असलेल्या सोयाबीनचे क्षेत्र ६५ हजारांवर पोहोचले आहे. दोन वर्षांपासून सातत्याने घटलेले पर्जन्य आणि अचानक यावर्षी दमदार हजेरी असणाऱ्या पर्जन्यामुळे हा खरिपाचा पीक पॅटर्न बदलल्याचा अंदाज कृषितज्ज्ञांनी व्यक्त केला असला तरी त्यामागील नगदी पिके घेऊन कमी काळात झटपट पैसा वसूल करण्याच्या भूमिकेतून हा खरिपाचा पीक पॅटर्न बदलल्याची चर्चा आहे.खरिपाच्या बाजरीवर संकटजिल्ह्यात खरिपाचे सरासरी क्षेत्र सहा लाख ५२ हजार ५०० हेक्टर असून, यावर्षी पाऊस दमदार झाल्याने पेरण्याही शंभर टक्के झाल्या आहेत. असे असले तरी खरिपाच्या बाजरीचे क्षेत्र कमी पर्जन्यामुळे सातत्याने घटत असल्याचे चित्र आहे. मागील वर्षी दोन लाख हेक्टर सरासरी क्षेत्राच्या तुलनेत अवघ्या एक लाख १४ हजार हेक्टर क्षेत्रावरच बाजरीची लागवड झाली होती. यावर्षी त्यामुळेच सरासरी लागवडीखालील क्षेत्र अचानक घटून ते एक लाख ६० हजार हेक्टर होते. त्यापैकीही एक लाख ३१ हजार ८२२ हेक्टरवरच बाजरीची लागवड करण्यात आली आहे. म्हणजेच दोन वर्षांत दोन लाखांवरून खरिपाच्या बाजरीचे क्षेत्र घटून अवघे सव्वा लाख इतकेच झाले आहे. खरिपाचे यावर्षीचे पीकनिहाय सरासरी क्षेत्र हेक्टरमध्ये पुढीलप्रमाणे, कंसात प्रत्यक्ष पेरणी झालेले क्षेत्र - भात - ६६,७०० (७७८१३), ज्वारी -३९०० (५७१), बाजरी -१,६०,२०० (१,३१,८२२), नागली - ३५३०० (२८३०५), मका - १,७३,००० (२,१८,२७३), इतर तृणधान्य - १३,६०० (१४७०५), तूर -१०४०० (१०७५४), मूग - १०३०० (१२३४२), उडीद - १४७०० (११२८८), इतर कडधान्य -१०,००० (६२२७), भूईमूग -३१३०० (२५९११), सूर्यफूल - १०० (२४), तीळ -०.७५ (९२), सोेयाबीन - ५७००० (६४६९९), खुरसणी - १५१००(८२५४), इतरगळीत - ३००० (५९१), कापूस - ४७२०० (४०७८०) असे एकूण सहा लाख ५२ हजार ५०० हेक्टर क्षेत्रापैकी ६ लाख ५१ हजार ८२१ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. धरणे ओव्हरफ्लोमागील वर्षाच्या तुलनेत पावसाचे प्रमाण चांगले राहील, हा हवामान खात्याचा अंदाज पावसाच्या दमदार हजेरीमुळे यावेळी खरा ठरविल्याने जिल्ह्यातील धरणांची परिस्थिती समाधानकारक झाली आहे. जिल्ह्यातील धरणातील पाणीसाठ्याची सरासरी शिल्लक प्रमाण ८२ टक्के इतके आहे. ओझरखेड, तीसगाव, भावली, वालदेवी, आळंदी, भोजापूर, केळझर, हरणबारी ही आठ धरणे ओव्हर फ्लो झाली आहे. जिल्ह्यातील उर्वरित धरणांमधील आॅगस्टअखेरचा उपयुक्त पाणीसाठा दलघफूमध्ये पुढीलप्रमाणे - कंसात पाण्याची टक्केवारी - गंगापूर -५०९१ (९१), पालखेड - ३७८ (५०), करंजवण -५२८२ (९८), वाघाड - २३०२ (९२), पुणेगाव - ५७० (९१), दारणा - ६३९४ (८९), नांदूरमध्यमेश्वर - २४८ (९६), चणकापूर -२१०८ (८७), पूनद - १२४५ (८९), गिरणा - १२३८० (६७) असे आहे. जिल्ह्यातील धरणात एकूण पाणी साठवण क्षमता ६५ हजार ८७४ दलघफू इतकी असून, आॅगस्टअखेर त्यात ५३९०६ (८१ टक्के) दलघफू इतका पाणीसाठा आहे.