शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
5
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
6
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
7
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
8
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
9
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
10
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
11
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
12
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
13
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
14
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
15
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
16
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
17
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
18
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
19
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज

खरिपावर मका, सोयाबीनची छाप

By admin | Updated: August 27, 2016 23:10 IST

बदलत्या पर्जन्यमानाचा ‘परिणाम’: ज्वारीच्या क्षेत्रात लाखाने झाली घट

 गणेश धुरी नाशिकबदलत्या पर्जन्यमानाने जिल्ह्यातील खरिपाचा पीक पेरणी पॅटर्नही बदलू लागला असून, कधी काळी दोन लाख हेक्टर लागवडीच्या घरात असलेली खरिपाची बाजरी यंदा अवघ्या सव्वा लाख हेक्टरवर मर्यादित राहिली आहे. त्या मानाने वाढत वाढत चक्क पावणे दोन लाख हेक्टरच्या घरात पोहोचलेल्या मका पिकाचे क्षेत्र दिवसागणिक वाढतच असून, यंदाच्या खरिपात ते चक्क सव्वादोन लाख हेक्टरच्या आसपास पोहोचले आहे. तीच बाब सोयाबीनच्या बाबतीत झाली असून, ४० हजार हेक्टरच्या आसपास मर्यादित असलेल्या सोयाबीनचे क्षेत्र ६५ हजारांवर पोहोचले आहे. दोन वर्षांपासून सातत्याने घटलेले पर्जन्य आणि अचानक यावर्षी दमदार हजेरी असणाऱ्या पर्जन्यामुळे हा खरिपाचा पीक पॅटर्न बदलल्याचा अंदाज कृषितज्ज्ञांनी व्यक्त केला असला तरी त्यामागील नगदी पिके घेऊन कमी काळात झटपट पैसा वसूल करण्याच्या भूमिकेतून हा खरिपाचा पीक पॅटर्न बदलल्याची चर्चा आहे.खरिपाच्या बाजरीवर संकटजिल्ह्यात खरिपाचे सरासरी क्षेत्र सहा लाख ५२ हजार ५०० हेक्टर असून, यावर्षी पाऊस दमदार झाल्याने पेरण्याही शंभर टक्के झाल्या आहेत. असे असले तरी खरिपाच्या बाजरीचे क्षेत्र कमी पर्जन्यामुळे सातत्याने घटत असल्याचे चित्र आहे. मागील वर्षी दोन लाख हेक्टर सरासरी क्षेत्राच्या तुलनेत अवघ्या एक लाख १४ हजार हेक्टर क्षेत्रावरच बाजरीची लागवड झाली होती. यावर्षी त्यामुळेच सरासरी लागवडीखालील क्षेत्र अचानक घटून ते एक लाख ६० हजार हेक्टर होते. त्यापैकीही एक लाख ३१ हजार ८२२ हेक्टरवरच बाजरीची लागवड करण्यात आली आहे. म्हणजेच दोन वर्षांत दोन लाखांवरून खरिपाच्या बाजरीचे क्षेत्र घटून अवघे सव्वा लाख इतकेच झाले आहे. खरिपाचे यावर्षीचे पीकनिहाय सरासरी क्षेत्र हेक्टरमध्ये पुढीलप्रमाणे, कंसात प्रत्यक्ष पेरणी झालेले क्षेत्र - भात - ६६,७०० (७७८१३), ज्वारी -३९०० (५७१), बाजरी -१,६०,२०० (१,३१,८२२), नागली - ३५३०० (२८३०५), मका - १,७३,००० (२,१८,२७३), इतर तृणधान्य - १३,६०० (१४७०५), तूर -१०४०० (१०७५४), मूग - १०३०० (१२३४२), उडीद - १४७०० (११२८८), इतर कडधान्य -१०,००० (६२२७), भूईमूग -३१३०० (२५९११), सूर्यफूल - १०० (२४), तीळ -०.७५ (९२), सोेयाबीन - ५७००० (६४६९९), खुरसणी - १५१००(८२५४), इतरगळीत - ३००० (५९१), कापूस - ४७२०० (४०७८०) असे एकूण सहा लाख ५२ हजार ५०० हेक्टर क्षेत्रापैकी ६ लाख ५१ हजार ८२१ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. धरणे ओव्हरफ्लोमागील वर्षाच्या तुलनेत पावसाचे प्रमाण चांगले राहील, हा हवामान खात्याचा अंदाज पावसाच्या दमदार हजेरीमुळे यावेळी खरा ठरविल्याने जिल्ह्यातील धरणांची परिस्थिती समाधानकारक झाली आहे. जिल्ह्यातील धरणातील पाणीसाठ्याची सरासरी शिल्लक प्रमाण ८२ टक्के इतके आहे. ओझरखेड, तीसगाव, भावली, वालदेवी, आळंदी, भोजापूर, केळझर, हरणबारी ही आठ धरणे ओव्हर फ्लो झाली आहे. जिल्ह्यातील उर्वरित धरणांमधील आॅगस्टअखेरचा उपयुक्त पाणीसाठा दलघफूमध्ये पुढीलप्रमाणे - कंसात पाण्याची टक्केवारी - गंगापूर -५०९१ (९१), पालखेड - ३७८ (५०), करंजवण -५२८२ (९८), वाघाड - २३०२ (९२), पुणेगाव - ५७० (९१), दारणा - ६३९४ (८९), नांदूरमध्यमेश्वर - २४८ (९६), चणकापूर -२१०८ (८७), पूनद - १२४५ (८९), गिरणा - १२३८० (६७) असे आहे. जिल्ह्यातील धरणात एकूण पाणी साठवण क्षमता ६५ हजार ८७४ दलघफू इतकी असून, आॅगस्टअखेर त्यात ५३९०६ (८१ टक्के) दलघफू इतका पाणीसाठा आहे.