शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
8
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
9
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
10
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
11
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
12
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
13
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
14
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
15
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
16
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
17
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
18
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
19
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
20
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल

खरिपावर मका, सोयाबीनची छाप

By admin | Updated: August 27, 2016 23:10 IST

बदलत्या पर्जन्यमानाचा ‘परिणाम’: ज्वारीच्या क्षेत्रात लाखाने झाली घट

 गणेश धुरी नाशिकबदलत्या पर्जन्यमानाने जिल्ह्यातील खरिपाचा पीक पेरणी पॅटर्नही बदलू लागला असून, कधी काळी दोन लाख हेक्टर लागवडीच्या घरात असलेली खरिपाची बाजरी यंदा अवघ्या सव्वा लाख हेक्टरवर मर्यादित राहिली आहे. त्या मानाने वाढत वाढत चक्क पावणे दोन लाख हेक्टरच्या घरात पोहोचलेल्या मका पिकाचे क्षेत्र दिवसागणिक वाढतच असून, यंदाच्या खरिपात ते चक्क सव्वादोन लाख हेक्टरच्या आसपास पोहोचले आहे. तीच बाब सोयाबीनच्या बाबतीत झाली असून, ४० हजार हेक्टरच्या आसपास मर्यादित असलेल्या सोयाबीनचे क्षेत्र ६५ हजारांवर पोहोचले आहे. दोन वर्षांपासून सातत्याने घटलेले पर्जन्य आणि अचानक यावर्षी दमदार हजेरी असणाऱ्या पर्जन्यामुळे हा खरिपाचा पीक पॅटर्न बदलल्याचा अंदाज कृषितज्ज्ञांनी व्यक्त केला असला तरी त्यामागील नगदी पिके घेऊन कमी काळात झटपट पैसा वसूल करण्याच्या भूमिकेतून हा खरिपाचा पीक पॅटर्न बदलल्याची चर्चा आहे.खरिपाच्या बाजरीवर संकटजिल्ह्यात खरिपाचे सरासरी क्षेत्र सहा लाख ५२ हजार ५०० हेक्टर असून, यावर्षी पाऊस दमदार झाल्याने पेरण्याही शंभर टक्के झाल्या आहेत. असे असले तरी खरिपाच्या बाजरीचे क्षेत्र कमी पर्जन्यामुळे सातत्याने घटत असल्याचे चित्र आहे. मागील वर्षी दोन लाख हेक्टर सरासरी क्षेत्राच्या तुलनेत अवघ्या एक लाख १४ हजार हेक्टर क्षेत्रावरच बाजरीची लागवड झाली होती. यावर्षी त्यामुळेच सरासरी लागवडीखालील क्षेत्र अचानक घटून ते एक लाख ६० हजार हेक्टर होते. त्यापैकीही एक लाख ३१ हजार ८२२ हेक्टरवरच बाजरीची लागवड करण्यात आली आहे. म्हणजेच दोन वर्षांत दोन लाखांवरून खरिपाच्या बाजरीचे क्षेत्र घटून अवघे सव्वा लाख इतकेच झाले आहे. खरिपाचे यावर्षीचे पीकनिहाय सरासरी क्षेत्र हेक्टरमध्ये पुढीलप्रमाणे, कंसात प्रत्यक्ष पेरणी झालेले क्षेत्र - भात - ६६,७०० (७७८१३), ज्वारी -३९०० (५७१), बाजरी -१,६०,२०० (१,३१,८२२), नागली - ३५३०० (२८३०५), मका - १,७३,००० (२,१८,२७३), इतर तृणधान्य - १३,६०० (१४७०५), तूर -१०४०० (१०७५४), मूग - १०३०० (१२३४२), उडीद - १४७०० (११२८८), इतर कडधान्य -१०,००० (६२२७), भूईमूग -३१३०० (२५९११), सूर्यफूल - १०० (२४), तीळ -०.७५ (९२), सोेयाबीन - ५७००० (६४६९९), खुरसणी - १५१००(८२५४), इतरगळीत - ३००० (५९१), कापूस - ४७२०० (४०७८०) असे एकूण सहा लाख ५२ हजार ५०० हेक्टर क्षेत्रापैकी ६ लाख ५१ हजार ८२१ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. धरणे ओव्हरफ्लोमागील वर्षाच्या तुलनेत पावसाचे प्रमाण चांगले राहील, हा हवामान खात्याचा अंदाज पावसाच्या दमदार हजेरीमुळे यावेळी खरा ठरविल्याने जिल्ह्यातील धरणांची परिस्थिती समाधानकारक झाली आहे. जिल्ह्यातील धरणातील पाणीसाठ्याची सरासरी शिल्लक प्रमाण ८२ टक्के इतके आहे. ओझरखेड, तीसगाव, भावली, वालदेवी, आळंदी, भोजापूर, केळझर, हरणबारी ही आठ धरणे ओव्हर फ्लो झाली आहे. जिल्ह्यातील उर्वरित धरणांमधील आॅगस्टअखेरचा उपयुक्त पाणीसाठा दलघफूमध्ये पुढीलप्रमाणे - कंसात पाण्याची टक्केवारी - गंगापूर -५०९१ (९१), पालखेड - ३७८ (५०), करंजवण -५२८२ (९८), वाघाड - २३०२ (९२), पुणेगाव - ५७० (९१), दारणा - ६३९४ (८९), नांदूरमध्यमेश्वर - २४८ (९६), चणकापूर -२१०८ (८७), पूनद - १२४५ (८९), गिरणा - १२३८० (६७) असे आहे. जिल्ह्यातील धरणात एकूण पाणी साठवण क्षमता ६५ हजार ८७४ दलघफू इतकी असून, आॅगस्टअखेर त्यात ५३९०६ (८१ टक्के) दलघफू इतका पाणीसाठा आहे.