शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

मका बाजारभावात घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 18:27 IST

गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या सर्वच पिकांचे बाजारभाव झपाट्याने कोसळत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. कांद्यापाठोपाठ मका पिकाचे दरही एक हजार ते बाराशे रु पयांनी कमी झाल्याने शेतकरीवर्गाच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

ठळक मुद्देभाव निम्म्याने घटले : दरवाढण्याची आशा फोल; शेतकरी हवालदिल

पाटोदा : गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या सर्वच पिकांचे बाजारभाव झपाट्याने कोसळत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. कांद्यापाठोपाठ मका पिकाचे दरही एक हजार ते बाराशे रु पयांनी कमी झाल्याने शेतकरीवर्गाच्या तोंडचे पाणी पळाले आहे.या वर्षी खरीप हंगामात अवकाळी पावसाने नुकसान झाल्याने उत्पादनात पन्नास ते साठ टक्क्यापेक्षा जास्त घट आल्याने शेतकऱ्यांनी भाववाढीच्या आशेवर ठेवलेला मका सध्या मातीमोल भावात विकावा लागत असून, शेतकºयांनी साठवून ठेवलेल्या या पिवळ्या सोन्याची तेजी दिवसेंदिवस कमी होत आहे.सध्या उत्पादन खर्चापेक्षा कितीतरी पटीने शेतकºयांना तोटा सहन करावा लागत असून, हातात आहे ते उत्पन्न विकण्यासाठी त्याची धावपळ असल्याचे चित्र सध्या येवला तालुक्यात पहावयास मिळत आहे. अडीच हजारावर पोहोचलेले मक्याचे दर गेल्या काही दिवसांपासून बाराशे, तेराशे, चौदाशे रु पये क्विंटल दराच्या आतच असून, पुढील काळात दर अजून कमी होतील, अशी भीती व्यापारीवर्ग शेतकºयांना दाखवून त्यांची मोठ्या प्रमाणावर लूट केली जात असल्याने शेतकरीवर्गामधून संताप व्यक्त केला जात आहे.यावर्षी मुबलक पाणी उपलब्ध असल्याने शेतकरीवर्गाने मोठ्या प्रमाणात उन्हाळी मक्याची लागवड केली आहे. येत्या काही दिवसात उन्हाळ मकाही काढणीस येणार असल्याने दर वाढण्याची शक्यता नसल्याने शेतकºयांनी आहे तो मका मिळेल त्या भावात विक्र ी करण्यास प्राधान्य दिल्याचे दिसत आहे.कर्ज कसे फेडायचे?शेतकºयांनी उत्पादित केलेल्या सर्वच पिकांना मातीमोल दर मिळत असल्याने केलेला खर्चही वसूल होत नसल्याने शेतकºयांची आर्थिक कोंडी झाली आहे. वातावरणातील बदलामुळे पिकांचे तीन तेरा वाजले आहेत. अनेक शेतकºयांनी आपल्या कारभारणीचे सौभाग्याचे लेणे बँका वा पतसंस्थांकडे गहाण ठेवून भांडवल घेतले आहे; मात्र शेतीसाठी भांडवल म्हणून उचललेले कर्ज कसे फेडायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

टॅग्स :Nashikनाशिकagricultureशेती