शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

बागलाणच्या पश्चिम पट्ट्यातील मका पिकाला लष्करी अळीचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 18:59 IST

वटार : बागलाण तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात मका पिकाला अमेरिकन लष्करी अळीने विळखा घातला आहे. महागडी औषधे फवारणी करूनही अळी मरत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

दरवर्षी दुष्काळ परिसराच्या पाचवीलाच पुजलेला आहे. पावसाळा सुरू होऊन दीड महिना उलटूनही अद्याप जोरदार पावसाने हजेरी लावलेली नाही. अपुऱ्या पावसावर पेरण्या केलेले शेतकरी पावसाने पुन्हा ओढ दिल्याने चिंताग्रस्त झाले आहेत. अस्मानी आणि सुलतानी संकटात गुरफटलेल्या शेतकऱ्यांच्या दहा ते पंधरा दिवसाच्या मका पिकाला लष्करी अळीने विळखा घातल्यामुळे नवे संकट उभे ठाकले आहे. परिसरात ब-याच शेतक-यांच्या मका पिकावर लष्करी अळीने आक्र मण केले. मका पिकाच्या पानावर पांढरे चट्टे पडू लागले आहेत. ही लष्करी अळी पोग्यातील कोवळी पाने खाऊन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करीत असल्याने मका पिक वाया जाण्याचा धोका वाढला आहे. सुरुवातीपासून आर्थिक संकटात सापडलेल्या शेतक-यांनी हजारो रु पये खर्च करून उभ्या केलेल्या पिकांवर आता कीटकनाशक औषधांची फवारणी करूनही नियंत्रण मिळवता येत नसल्याने अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव रोखायचा कसा असा प्रश्न शेतक-यांना सतावत आहे. शासनाच्या कृषी विभागामार्फत लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी खेडोपाडी मार्गदर्शन शिबीर राबवत आहेत, त्याचा उपयोग प्रत्यक्षात होताना दिसत नसल्याने खरीप हंगामातील पिके वाया जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी