शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

मनपाने केली जलकुंभाची दुरुस्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 00:57 IST

सातपूर, गंगापूर परिसरातील अनेक नगरांना पाणीपुरवठा करणाऱ्या जलकुंभातून हजारो लिटर पाण्याची नासाडी होत असल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच मनपा प्रशासनाने या जलकुंभाची दुरुस्ती केली. बळवंतनगर परिसरात उभारण्यात आलेल्या सुमारे वीस लाख लिटर क्षमता असलेल्या या जलकुंभातून धो-धो पाणी गळती होत होती; परंतु याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत होते.

नाशिक : सातपूर, गंगापूर परिसरातील अनेक नगरांना पाणीपुरवठा करणाऱ्या जलकुंभातून हजारो लिटर पाण्याची नासाडी होत असल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच मनपा प्रशासनाने या जलकुंभाची दुरुस्ती केली. बळवंतनगर परिसरात उभारण्यात आलेल्या सुमारे वीस लाख लिटर क्षमता असलेल्या या जलकुंभातून धो-धो पाणी गळती होत होती; परंतु याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत होते.२००७ मध्ये गणेशनगर, सद्गुरुनगर आणि खांदवेनगरला लागून असलेल्या पाटाच्या रस्त्यावर बळवंतनगर परिसरात २० लाख लिटर पाणी क्षमता असलेला जलकुंभ उभारण्यात आला होता; मात्र निकृष्ट बांधकामामुळे काही महिन्यांतच जलकुंभाच्या मुख्य जलवाहिनीशेजारी छताला लिकेज् झाले. यातून दररोज हजारो लिटर पाण्याची नासाडी होत होती. पाण्याच्या गळतीचे प्रमाण इतके होते की, शेजारी असलेला नाला भर उन्हाळ्यात प्रवाहित झाला होता.  याविषयी परिसरातील नागरिकांनी वेळोवेळी महापालिकेच्या सातपूर विभागीय कार्यालयात तक्रारी केल्या होत्या; परंतु पाणीपुरवठा विभागाकडून लोकांच्या तक्रारीकडे सर्रासपणे दुर्लक्ष केले जात होते. त्याचबरोबर पाणीपुरवठा खंडित होऊ नये म्हणून आम्ही दुरुस्ती करीत नसल्याचे अजब कारण प्रशासनाकडून सांगितले जात होते. अखेर ‘लोकमत’मध्ये ‘जलकुंभातून २४ तास धो धो’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर प्रशासनाने तातडीने जलकुंभाची दुरुस्ती केली.  या जलकुंभातून गणेशनगर, बळवंतनगर, सद्गुरुनगर, खांदवेनगर, सोमेश्वर कॉलनी, आनंदवल्ली, सावरकरनगर, गंगापूर गाव यासह इतर नगरांना पाणीपुरवठा केला जातो. दरम्यान, नागरिकांना पाणी बचतीचे आवाहन करणाºया महापालिकेने पुढच्या काळातही कर्तव्यात कसूर करू नये, अशी अपेक्षा परिसरातील नागरिकांकडून व्यक्त करण्यात आली.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका