शहरं
Join us  
Trending Stories
1
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
3
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
4
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
5
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
6
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
7
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
8
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
9
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
10
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
11
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
12
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न
13
Road Rage Case: ट्रक चालकाचे अपहरण; पूजा खेडकरच्या वडिलांच्या ड्रायव्हरला अटक, आई- वडील फरार
14
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
15
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
16
सूर्य ग्रहण २०२५: चंद्रग्रहणात केला तोच उपाय सूर्यग्रहणातही, साठवणीच्या अन्न-पाण्यावर ठेवा तुळशीचे पान 
17
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
18
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
19
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
20
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."

महिंद्रा कंपनी सुरू होणार पण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 23:26 IST

सातपूर : महिनाभरापासून बंद असलेले उद्योग सुरू करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी निर्बंध शिथिल केल्याने जवळपास १६५० उद्योगांनी आपले उद्योग सुरू केले आहेत. तर जिल्ह्यातील अग्रणी समजल्या जाणा-या महिंद्र अँड महिंद्र कंपनीलादेखील कारखाना सुरू करण्यासाठी परवानगी मिळाली आहे. मात्र प्रत्यक्षात उत्पादन कधी सुरू होईल, याबाबत व्यवस्थापनाने साशंकता व्यक्त केली आहे.

सातपूर : महिनाभरापासून बंद असलेले उद्योग सुरू करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी निर्बंध शिथिल केल्याने जवळपास १६५० उद्योगांनी आपले उद्योग सुरू केले आहेत. तर जिल्ह्यातील अग्रणी समजल्या जाणा-या महिंद्र अँड महिंद्र कंपनीलादेखील कारखाना सुरू करण्यासाठी परवानगी मिळाली आहे. मात्र प्रत्यक्षात उत्पादन कधी सुरू होईल, याबाबत व्यवस्थापनाने साशंकता व्यक्त केली आहे.जिल्हाधिकाऱ्यांनी दि. २० एप्रिलपासून जिल्ह्यातील उद्योगांना (जाहीर केलेला कॅन्टोन्मेंट एरिया वगळता) अटी-शर्ती अबाधित ठेवून उद्योग सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार तीन हजारांवर उद्योगांनी आॅनलाइन परवानगी मागितली होती. शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणाºया १,६२७ उद्योगांना रीतसर परवानगी दिल्याने हे उद्योग सुरू झाले आहेत. जिल्ह्यातील सर्वात मोठा उद्योग म्हणून महिंद्र अँड महिंद्र कंपनी आणि बॉश कंपनीकडे पाहिले जाते. या दोन्ही कारखान्यांच्या वेंडरची (सप्लायर्स) संख्या जवळपास एक हजाराच्या आसपास आहे. या दोन्ही कारखान्यांत आणि संलग्न लघुउद्योगात सुमारे २५ हजार कामगार काम करतात.जिल्हा प्रशासनाने जरी निर्बंध शिथिल केले असले तरी या मोठ्या उद्योग प्रकल्पांना उद्योग सुरू करण्यास अनेक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. कारण वेंडर्स (सप्लायर्स) कडून लागणारे उत्पादन (पुरवठा) मिळणार नसेल तर मोठे उद्योग सुरू करून उपयोग होणार नाही. त्याशिवाय या मोठ्या उद्योगातील कामगारांना ने-आण करणे अडचणीचे ठरणार आहे. यांसह अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार असल्याने या उद्योगांनी ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेतली आहे. तरीही महिंद्र अँड महिंद्र कंपनीने बुधवारपासून (दि.२९) कंपनी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र प्रत्यक्षात उत्पादन सुरू होणार नसल्याचे व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे. एवढेच काय उत्पादन प्रक्रि या नेमकी कधी सुरू होणार याबाबत अनभिज्ञता व्यक्त केली आहे.--------जवळपास सव्वा महिन्यापासून कंपनीतील यंत्रे पूर्णपणे बंद आहेत. उत्पादन सुरू करण्यापूर्वी यंत्रांचे मेंटेनन्स आवश्यक आहे. त्यानंतर उत्पादन प्रक्रि या सुरळीत करण्यासाठी जुळवाजुळव करावी लागणार आहे. त्याचबरोबर वेंडर्स (सप्लायर्स) कडून लागणारा पुरवठा मिळणे गरजेचे आहे. काही मोजक्या कर्मचाºयांना बोलावून यंत्रे स्टार्टअपची कामे करणार आहे. बुधवारपासून नियोजन केले होते. मात्र त्याचा उपयोग झाला नाही. शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून प्रत्यक्षात उत्पादन कधी सुरू करता येईल त्याचे नियोजन करण्यात येत आहे. - प्रदीप देशमुख, उपाध्यक्ष, महिंद्र अँड महिंद्र कंपनी, सातपूर

टॅग्स :Nashikनाशिक