शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

महिंद्रा कंपनी सुरू होणार पण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 23:26 IST

सातपूर : महिनाभरापासून बंद असलेले उद्योग सुरू करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी निर्बंध शिथिल केल्याने जवळपास १६५० उद्योगांनी आपले उद्योग सुरू केले आहेत. तर जिल्ह्यातील अग्रणी समजल्या जाणा-या महिंद्र अँड महिंद्र कंपनीलादेखील कारखाना सुरू करण्यासाठी परवानगी मिळाली आहे. मात्र प्रत्यक्षात उत्पादन कधी सुरू होईल, याबाबत व्यवस्थापनाने साशंकता व्यक्त केली आहे.

सातपूर : महिनाभरापासून बंद असलेले उद्योग सुरू करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी निर्बंध शिथिल केल्याने जवळपास १६५० उद्योगांनी आपले उद्योग सुरू केले आहेत. तर जिल्ह्यातील अग्रणी समजल्या जाणा-या महिंद्र अँड महिंद्र कंपनीलादेखील कारखाना सुरू करण्यासाठी परवानगी मिळाली आहे. मात्र प्रत्यक्षात उत्पादन कधी सुरू होईल, याबाबत व्यवस्थापनाने साशंकता व्यक्त केली आहे.जिल्हाधिकाऱ्यांनी दि. २० एप्रिलपासून जिल्ह्यातील उद्योगांना (जाहीर केलेला कॅन्टोन्मेंट एरिया वगळता) अटी-शर्ती अबाधित ठेवून उद्योग सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार तीन हजारांवर उद्योगांनी आॅनलाइन परवानगी मागितली होती. शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणाºया १,६२७ उद्योगांना रीतसर परवानगी दिल्याने हे उद्योग सुरू झाले आहेत. जिल्ह्यातील सर्वात मोठा उद्योग म्हणून महिंद्र अँड महिंद्र कंपनी आणि बॉश कंपनीकडे पाहिले जाते. या दोन्ही कारखान्यांच्या वेंडरची (सप्लायर्स) संख्या जवळपास एक हजाराच्या आसपास आहे. या दोन्ही कारखान्यांत आणि संलग्न लघुउद्योगात सुमारे २५ हजार कामगार काम करतात.जिल्हा प्रशासनाने जरी निर्बंध शिथिल केले असले तरी या मोठ्या उद्योग प्रकल्पांना उद्योग सुरू करण्यास अनेक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. कारण वेंडर्स (सप्लायर्स) कडून लागणारे उत्पादन (पुरवठा) मिळणार नसेल तर मोठे उद्योग सुरू करून उपयोग होणार नाही. त्याशिवाय या मोठ्या उद्योगातील कामगारांना ने-आण करणे अडचणीचे ठरणार आहे. यांसह अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार असल्याने या उद्योगांनी ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेतली आहे. तरीही महिंद्र अँड महिंद्र कंपनीने बुधवारपासून (दि.२९) कंपनी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र प्रत्यक्षात उत्पादन सुरू होणार नसल्याचे व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे. एवढेच काय उत्पादन प्रक्रि या नेमकी कधी सुरू होणार याबाबत अनभिज्ञता व्यक्त केली आहे.--------जवळपास सव्वा महिन्यापासून कंपनीतील यंत्रे पूर्णपणे बंद आहेत. उत्पादन सुरू करण्यापूर्वी यंत्रांचे मेंटेनन्स आवश्यक आहे. त्यानंतर उत्पादन प्रक्रि या सुरळीत करण्यासाठी जुळवाजुळव करावी लागणार आहे. त्याचबरोबर वेंडर्स (सप्लायर्स) कडून लागणारा पुरवठा मिळणे गरजेचे आहे. काही मोजक्या कर्मचाºयांना बोलावून यंत्रे स्टार्टअपची कामे करणार आहे. बुधवारपासून नियोजन केले होते. मात्र त्याचा उपयोग झाला नाही. शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून प्रत्यक्षात उत्पादन कधी सुरू करता येईल त्याचे नियोजन करण्यात येत आहे. - प्रदीप देशमुख, उपाध्यक्ष, महिंद्र अँड महिंद्र कंपनी, सातपूर

टॅग्स :Nashikनाशिक