शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतले निखारे! पहलगाम मुद्द्यावर काही भारतीयांचा पाकिस्तानला पाठिंबा! ३७ जणांना अटक
2
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
3
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
4
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
5
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
6
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
7
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
8
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
9
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
10
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
11
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
12
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
13
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
14
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
15
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
16
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
17
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
18
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
19
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
20
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...

महिंद्रा, बॉशची चाके फिरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 23:28 IST

सातपूर : जिल्ह्यातील मदर इंडस्ट्रीज समजल्या जाणाऱ्या महिंद्र अ‍ॅन्ड महिंद्र आणि बॉश कंपनीची चाके प्रत्यक्ष फिरायला लागल्याने त्यांच्यावर अवलंबून असलेले सुमारे एक हजार लघुउद्योग (सप्लायर्स) व तेथे काम करणा-या हजारो कामगारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. या दोन्ही कारखान्यांच्या उत्पादनाला सुरुवात झाल्याने वाहन उद्योगाला काही प्रमाणात गती मिळणार आहे.

सातपूर : जिल्ह्यातील मदर इंडस्ट्रीज समजल्या जाणाऱ्या महिंद्र अ‍ॅन्ड महिंद्र आणि बॉश कंपनीची चाके प्रत्यक्ष फिरायला लागल्याने त्यांच्यावर अवलंबून असलेले सुमारे एक हजार लघुउद्योग (सप्लायर्स) व तेथे काम करणा-या हजारो कामगारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. या दोन्ही कारखान्यांच्या उत्पादनाला सुरुवात झाल्याने वाहन उद्योगाला काही प्रमाणात गती मिळणार आहे.कोरोना विषाणू संसर्गजन्य रोगाचा फैलाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने दि. १७ मेपर्यंत लॉकडाउन जाहीर केले असले तरी जिल्हाधिकाऱ्यांनी २० एप्रिलपासून जिल्ह्यातील उद्योगांना (जाहीर केलेल्या कंटेनमेंट एरिया वगळता) अटी-शर्ती अबाधित ठेवून उद्योग सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याच्या अटीवर उद्योगांना उद्योग सुरू करण्यास रीतसर परवानगी दिल्याने हे उद्योग सुरू झाले आहेत. नाशिक जिल्हा आॅटोमोबाइल (वाहन उद्योग) आणि इंजिनिअरिंग हब म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यातील सर्वात मोठा उद्योग म्हणून महिंद्र अ‍ॅन्ड महिंद्र कंपनी आणि बॉश कंपनीकडे पाहिले जाते. या दोन्ही कारखान्यांच्या वेंडरची (सप्लायर्स) संख्या जवळपास एक हजारच्या आसपास आहे. या दोन्ही कारखान्यांत आणि संलग्न लघुउद्योगात सुमारे २५ हजार कामगार काम करतात.जिल्हा प्रशासनाने जरी निर्बंध शिथिल केले असले तरी या मोठ्या उद्योग प्रकल्पांना उद्योग सुरू करण्यास अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. कारण वेंडर्स (सप्लायर्स) कडून लागणारे उत्पादन (पुरवठा) मिळणार नसेल तर मोठे उद्योग सुरू करून उपयोग होणार नाही आणि मोठे उद्योग प्रकल्प सुरू झाल्याशिवाय त्यांच्यावर अवलंबून असलेले लघुउद्योग सुरू होऊ शकत नाही. अशा परिस्थितीत महिंद्र अ‍ॅन्ड महिंद्र कंपनीने दि. २९ पासून कंपनी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र प्रत्यक्षात उत्पादन सोमवारपासून सुरू झाले आहे. तर बॉश कंपनीदेखील दि. ५ मे पासून सुरू झाली असली तरी प्रत्यक्षात लवकरच उत्पादन सुरू होणार असल्याचे सांगितले जात आहे. या दोन्ही कारखान्यांत साधारणपणे २५ ते ३० टक्के कामगार कामावर बोलावण्यात आल्याचे सांगितले जात आहे.------१५ हजार हातांना काम मिळणारमहिंद्र अ‍ॅन्ड महिंद्र आणि बॉश हे दोन मोठे उद्योग प्रकल्प सुरू झाल्यास त्यांच्यावर अवलंबून असलेले लघुउद्योगदेखील लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. या दोन्ही कारखान्यांचे जवळपास एक हजार वेंडर्स असून, सुमारे दहा ते पंधरा हजार कामगार काम करतात. लवकरच हे उद्योग सुरू झाल्यास या कामगारांच्या हाताला काम मिळणार आहे. त्यामुळे कामगारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यानंतर खºया अर्थाने वाहन उद्योगाला गती मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

टॅग्स :Nashikनाशिक