शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
2
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
3
अमेरिकेत महागाईनं हाहाकार! ट्रम्प यांनी अनेक वस्तूंवरील टॅरिफ केलं कमी, स्वस्त होणार 'या' गोष्टी
4
Shubman Gill Injury Update : शुभमन गिलनं मैदान सोडलं! पंत झाला कॅप्टन, नेमकं काय घडलं?
5
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
6
लाल किल्ल्याजवळील स्फोटाने जमीन हादरली; मेट्रो स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज आले समोर
7
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
8
कुणी २७, कुणी ९५ मतांनी, तर..., बिहारमधील या मतदारसंघांत माफक फरकाने झाला जय-पराजयाचा फैसला
9
'मारुती सुझुकी'च्या या कारमध्ये मोठा बिघाड, ३९ हजारांहून अधिक गाड्या परत मागवल्या
10
धक्कादायक...! मध्यरात्रीचा थरार...! पूर्वजांना मोक्ष मिळावा म्हणून आईनं पोटच्या २ चिमुकल्यांची केली हत्या, सासरे थोडक्यात बचावले
11
मुदतीपूर्वीच Gen Z कर्मचाऱ्यांना कंपनीतून का काढलं जातंय?; स्टडी रिपोर्टमधून समोर आलं कारण
12
धर्मेंद्र यांच्या ९० व्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन होणार! हेमा मालिनी म्हणाल्या- "आता प्रत्येक दिवस..."
13
New Fastag Rule: आजपासून फास्टॅगच्या नियमांत झाला मोठा बदल; याकडे लक्ष दिलं नाही तर भरावा लागेल दुप्पट टोल
14
"पैसे वाटून निवडणुका होत असतील आयोगाने विचार करावा"; बिहार निकालावर शरद पवारांचे गंभीर भाष्य
15
बिहार निकालानंतर काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा; मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याचे संकेत
16
Astro Tips: मनासारखा जोडीदार नशिबात आहे की नाही हे कसे ओळखावे? ज्योतिष शास्त्रानुसार... 
17
“भाजपाने आता अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी अन् टॅरिफचा घोळ संपवावा”: आदित्य ठाकरे
18
SBI चा ग्राहकांना झटका! १ डिसेंबरपासून बंद होणार 'ही' लोकप्रिय सेवा; बँकेच्या कामांवर होणार परिणाम
19
"विवाहित मुलांना वडिलांच्या मालमत्तेत राहण्याचा कोणताही अधिकार नाही"; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
20
Rishabh Pant Record : टेस्टमध्ये टी-२० चा तडका! सेहवागचा १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत पंतनं रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

महिंद्रा, बॉशची चाके फिरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 23:28 IST

सातपूर : जिल्ह्यातील मदर इंडस्ट्रीज समजल्या जाणाऱ्या महिंद्र अ‍ॅन्ड महिंद्र आणि बॉश कंपनीची चाके प्रत्यक्ष फिरायला लागल्याने त्यांच्यावर अवलंबून असलेले सुमारे एक हजार लघुउद्योग (सप्लायर्स) व तेथे काम करणा-या हजारो कामगारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. या दोन्ही कारखान्यांच्या उत्पादनाला सुरुवात झाल्याने वाहन उद्योगाला काही प्रमाणात गती मिळणार आहे.

सातपूर : जिल्ह्यातील मदर इंडस्ट्रीज समजल्या जाणाऱ्या महिंद्र अ‍ॅन्ड महिंद्र आणि बॉश कंपनीची चाके प्रत्यक्ष फिरायला लागल्याने त्यांच्यावर अवलंबून असलेले सुमारे एक हजार लघुउद्योग (सप्लायर्स) व तेथे काम करणा-या हजारो कामगारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. या दोन्ही कारखान्यांच्या उत्पादनाला सुरुवात झाल्याने वाहन उद्योगाला काही प्रमाणात गती मिळणार आहे.कोरोना विषाणू संसर्गजन्य रोगाचा फैलाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने दि. १७ मेपर्यंत लॉकडाउन जाहीर केले असले तरी जिल्हाधिकाऱ्यांनी २० एप्रिलपासून जिल्ह्यातील उद्योगांना (जाहीर केलेल्या कंटेनमेंट एरिया वगळता) अटी-शर्ती अबाधित ठेवून उद्योग सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याच्या अटीवर उद्योगांना उद्योग सुरू करण्यास रीतसर परवानगी दिल्याने हे उद्योग सुरू झाले आहेत. नाशिक जिल्हा आॅटोमोबाइल (वाहन उद्योग) आणि इंजिनिअरिंग हब म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यातील सर्वात मोठा उद्योग म्हणून महिंद्र अ‍ॅन्ड महिंद्र कंपनी आणि बॉश कंपनीकडे पाहिले जाते. या दोन्ही कारखान्यांच्या वेंडरची (सप्लायर्स) संख्या जवळपास एक हजारच्या आसपास आहे. या दोन्ही कारखान्यांत आणि संलग्न लघुउद्योगात सुमारे २५ हजार कामगार काम करतात.जिल्हा प्रशासनाने जरी निर्बंध शिथिल केले असले तरी या मोठ्या उद्योग प्रकल्पांना उद्योग सुरू करण्यास अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. कारण वेंडर्स (सप्लायर्स) कडून लागणारे उत्पादन (पुरवठा) मिळणार नसेल तर मोठे उद्योग सुरू करून उपयोग होणार नाही आणि मोठे उद्योग प्रकल्प सुरू झाल्याशिवाय त्यांच्यावर अवलंबून असलेले लघुउद्योग सुरू होऊ शकत नाही. अशा परिस्थितीत महिंद्र अ‍ॅन्ड महिंद्र कंपनीने दि. २९ पासून कंपनी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र प्रत्यक्षात उत्पादन सोमवारपासून सुरू झाले आहे. तर बॉश कंपनीदेखील दि. ५ मे पासून सुरू झाली असली तरी प्रत्यक्षात लवकरच उत्पादन सुरू होणार असल्याचे सांगितले जात आहे. या दोन्ही कारखान्यांत साधारणपणे २५ ते ३० टक्के कामगार कामावर बोलावण्यात आल्याचे सांगितले जात आहे.------१५ हजार हातांना काम मिळणारमहिंद्र अ‍ॅन्ड महिंद्र आणि बॉश हे दोन मोठे उद्योग प्रकल्प सुरू झाल्यास त्यांच्यावर अवलंबून असलेले लघुउद्योगदेखील लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. या दोन्ही कारखान्यांचे जवळपास एक हजार वेंडर्स असून, सुमारे दहा ते पंधरा हजार कामगार काम करतात. लवकरच हे उद्योग सुरू झाल्यास या कामगारांच्या हाताला काम मिळणार आहे. त्यामुळे कामगारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यानंतर खºया अर्थाने वाहन उद्योगाला गती मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

टॅग्स :Nashikनाशिक