शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

माहेश्वरीच्या पायांना मिळाले बळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 00:01 IST

जन्मापासून दोन्ही पायांना असलेले व्यंग डॉक्टरांनी केलेल्या यशस्वी उपचारानंतर दूर झाल्याने दोनवर्षीय बालिकेच्या पायांना बळ मिळाले आहे. राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत या बालिकेवर उपचार करण्यात आल्याने या बालिकेच्या स्वप्नांना उभारी मिळणार आहे.

ठळक मुद्देकळवण । बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत उपचार

मनोज देवरे ।कळवण : जन्मापासून दोन्ही पायांना असलेले व्यंग डॉक्टरांनी केलेल्या यशस्वी उपचारानंतर दूर झाल्याने दोनवर्षीय बालिकेच्या पायांना बळ मिळाले आहे. राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत या बालिकेवर उपचार करण्यात आल्याने या बालिकेच्या स्वप्नांना उभारी मिळणार आहे.कळवण येथील संभाजीनगर परिसरात राहणाऱ्या माहेश्वरी प्रमोद कोळी या दोनवर्षीय बालिकेच्या दोन्ही पायांना जन्मत:च व्यंग होते. त्यामुळे तिच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला होता. दोन्ही पायांना व्यंग असल्याने पालकांनाही चिंता सतावत होती.योगायोगाने कळवण उपजिल्हा रुग्णालयात शासनाच्या राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्र मांतर्गत आयोजित संदर्भसेवा शिबिरात उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली बालरोगतज्ज्ञ डॉ. दीपक बहिरम यांनी माहेश्वरीची तपासणी केली. त्यावेळीच तिच्यावर उपचार करण्याचा निर्णय घेण्यात आला.पुढील उपचारासाठी तिला नाशिक येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील अस्थिरोगतज्ञ डॉ. नीलेश शेलार, मरियम काझी यांनी बालिकेच्या व्यंग असलेल्या दोन्ही पायांवर यशस्वीरीत्या उपचार करून तिचे पाय सरळ केले. या उपचाराला प्रतिसाद मिळाल्यामुळे व माहेश्वरीचे पाय सरळ झाल्याने तिच्या पालकांनीही आनंद व्यक्त करत डॉक्टरांचे आभार मानले.या डॉक्टर, परिचारिकांचे लाभले सहकार्यमाहेश्वरीला शस्रक्रिया व उपचार मिळणेकामी राष्ट्रीय बाल-स्वास्थ्य कार्यक्र म पथकातील डॉ. एच.डी. पाटील, डॉ.एम.एस. सूर्यवंशी, औषध-निर्माण अधिकारी वैभव काकुळते, मनोज जाधव, परिचारिका आहेर यांनी पुढाकार घेतला. राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्र माचे जिल्हा समन्वयक संदीप पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

टॅग्स :Healthआरोग्य