शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
2
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
3
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
4
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
5
राज ठाकरे यांच्या मविआमधील समावेशाबाबत काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांचं मोठं विधान, म्हणाले... 
6
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
7
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
8
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
9
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
10
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
11
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
12
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
13
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
14
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
15
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
16
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
17
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
18
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत
19
शुबमन गिलची हवा! इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या कॅप्टनला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
20
टाटा मोटर्सचा ऐतिहासिक निर्णय! 'या' दिवशी कंपनीचे होणार विभाजन; तुम्हाला काय फायदा?

महात्मा फुले यांच्या विचारांनी मिटेल अंधश्रद्धेचे मळभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 00:25 IST

महात्मा जोतिराव फुले यांनी क्षुद्रातीक्षुद्र वर्गात शिक्षणाचा प्रसार करून तत्कालीन परिस्थितीत अंधश्रद्धेच्या दरीत लोटला गेलेल्या समाजाला बाहेर काढून शिक्षित केले. परंतु, आजही समाजातील काही घटक पूजा, जप, अनुष्ठानमध्ये गुरफटलेला आहे. या समाज घटकांनी महात्मा फुले यांच्या विचारांचे आचरण करून शिक्षण घेतल्यास समाजातील अंधश्रद्धेचे मळभ पूर्णपणे दूर होईल, असा विश्वास प्रा. जयवंत बागुल यांनी व्यक्त केला आहे.

नाशिक : महात्मा जोतिराव फुले यांनी क्षुद्रातीक्षुद्र वर्गात शिक्षणाचा प्रसार करून तत्कालीन परिस्थितीत अंधश्रद्धेच्या दरीत लोटला गेलेल्या समाजाला बाहेर काढून शिक्षित केले. परंतु, आजही समाजातील काही घटक पूजा, जप, अनुष्ठानमध्ये गुरफटलेला आहे. या समाज घटकांनी महात्मा फुले यांच्या विचारांचे आचरण करून शिक्षण घेतल्यास समाजातील अंधश्रद्धेचे मळभ पूर्णपणे दूर होईल, असा विश्वास प्रा. जयवंत बागुल यांनी व्यक्त केला आहे. माळी समाज सेवा समितीतर्फे पंडित पलुस्कर सभागृहात क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती उत्सवानिमित्त महात्मा फुले विचार ज्ञानयज्ञ सोहळ्यात ‘महात्मा फुले व अंधश्रद्धा निर्मूलन’ विषयावर द्वितीय पुष्प गुंफताना ते बोलत होते. व्यासपीठावर माजी नगरसेवक बाळासाहेब जानमाळी, मोना शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. दौलतराव गांगुर्डे, वीरशैव लिंगायत समाजाचे अध्यक्ष अनिल कोठुळे, मीना समाजाचे राजकुमार जेफ, ज्येष्ठ नागरिक संघाचे उत्तमराव तांबे, माळी समाज सेवा समिती अध्यक्ष विजय राऊत, नाशिकरोड देवळाली व्यापारी बँकेचे संचालक सुधाकर जाधव, महिला समितीच्या अध्यक्ष मंगला माळी उपस्थित होते. प्रा. बागुल म्हणाले, पूर्वीच्या काळात बहुजन समाज शिक्षित नसल्याने विशिष्ट वर्गाकडून त्यांचे शोषण केले गेले. यातूनच अंधश्रद्धा फोफावल्याने समाजाची प्रगती खुंटल्याचे लक्षात आल्यानंतर महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची निर्मिती करून अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न केला. सोबतच सर्वसामान्यांसाठी व महिलांसाठी शिक्षणाचा मार्ग फुले दाम्पत्यांनी खुला केला. परंतु माळी समाजसेवा समितीचे अध्यक्ष विजय राऊत यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन सुरेश कापरे यांनी केले. उत्तमराव बडदे यांनी आभार मानले.

टॅग्स :Nashikनाशिक