शहरं
Join us  
Trending Stories
1
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
2
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
3
दसरा मेळाव्यात मनोज जरांगेंनी दिली पुढील आंदोलनाची हाक; म्हणाले, “सरकारला १ महिन्याची मुदत”
4
Zubeen Garg : स्कूबा डायव्हिंगमुळे नाही तर.... कसा झाला सिंगर झुबीन गर्गचा मृत्यू? आता मोठा खुलासा
5
Mohammed Siraj Record : मियाँ मॅजिक! सिराजनं साधला नंबर वन होण्याचा डाव; मिचेल स्टार्कला टाकले मागे
6
‘संघाला १०० वर्ष झाली तरी त्यांची ‘मुंह में राम, बगल में छुरी’ भूमिका आजही कायम, काँग्रेसची टीका    
7
बिल्सेरी, किनले, अक्वाफिनाला आता टक्कर देणार मुकेश अंबानी; ₹३०००० कोटींच्या व्यवसायात एन्ट्रीच्या तयारीत 
8
रशियाने मोठा धोका दिला? भारताच्या विनंतीकडे दुर्लक्ष करत पाकिस्तानला फायटर जेटचं इंजिन देण्याचा निर्णय घेतला; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
9
Viral Video: अशा मित्रांपासून सावध राहिलेलं बरं; एकदा 'हा' व्हिडीओ बघाच!
10
"गोपीनाथ मुंडेंनी मराठा आरक्षणाला विरोध केला नाही, पण..."; पंकजा मुंडे दसरा मेळाव्यात स्पष्टच बोलल्या
11
दसरा मेळाव्यात भाषण सुरू असतानाच पंकजा मुंडे कार्यकर्त्यांवर संतापल्या, म्हणाल्या पोरांनो तुम्ही...  
12
“भारत खरोखरच स्वतंत्र आहे का?”; गीतांजली वांगचूक यांचा सवाल, केंद्रीय गृहमंत्रालयावर टीका
13
Goldman Sachs चे 'हे' ४ शेअर्स बनले सुपरस्टार; एका वर्षात १५५ टक्क्यांपर्यंतची तेजी, तुम्ही घेतलाय का?
14
 ...मग पोलिसांची हत्या करावी लागली तरी हरकत नाही, समोर आला तौकीर रजाचा भयानक डाव
15
'आग तो लगी थी घर में...."; धनंजय मुंडेंनी शायरीतून भावना व्यक्त केली, मंत्रिपदाबाबत खंतही बोलून दाखवली
16
२ घास कमी खा पण स्वाभिमानाने राहा, कुणाचे तुकडे उचलू नका; पंकजा मुंडेंचं मेळाव्यात आवाहन
17
कराड आमचे दैवत...; पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यात झळकले वाल्मिक कराडचे पोस्टर
18
१९ वर्षे शनि, १८ वर्षे राहु महादशा: शनि महादशेत राहु अंतर्दशा आली? भाग्योदय; अपार पैसा-लाभ!
19
Gold Silver Price: सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी वाढ; गुंतवणूकदारांनी मात्र टाळाव्यात 'या' ५ चुका
20
"खोटे धंदे करू नका, गुंड पाळू नका, काही गरज नाही", पंकजा मुंडे भगवान गडावर काय बोलल्या?

लोककल्याणाच्या योजना अंमलात आणणारे महात्मा बसवेश्वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2020 17:59 IST

महात्मा बसवेश्वर महाराज यांची आज जयंती. त्यानिमित्ताने त्यांच्या जीवनकार्याविषयीचा लेख...

महात्मा बसवेश्वरांचा जन्म वैशाख शु. अक्षयतृतीया सन ११०५ मध्ये कर्नाटकातील बागेवाडी, जि. विजापूर येथे झाला. श्रावण शुद्ध ५ (नागपंचमी) सन ११६७ मध्ये कूडल संगम, जिल्हा विजापूर येथे कृष्णा-मलप्रभा नद्यांच्या संगमात त्यांनी संजीवन जलसमाधी घेतली. (जन्मतारीख, वर्ष, जलसमाधी काल याबाबत मतभेद आहेत.)बसवेश्वरांनी शेती, वाणिज्य, सामूहिक शिक्षण, अस्पृश्यता निवारण, अंधश्रद्धा निर्मूलन, छोट्या उद्योगधंद्यात वाढ इत्यादी अनेक योजना आखल्या व त्या राबविल्या. शेतामध्ये विहिरी, तलाव, तळी-बंधारे यांच्या सोयी केल्या. सामूहिक श्रम आणि शिक्षणाची लोकांमध्ये आवड निर्माण केली. सामान्य आणि दलित लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी आठशे वर्षांपूर्वी (बाराव्या शतकात) गरिबी हटावसारख्या योजना आखल्या व यशस्वीरीत्या पार पाडल्या.महात्मा बसेश्वर मनाने, विचाराने आणि कृतीने संत (शिवशरण) होते. ध्यान, चिंतन आणि मनन करणे हा त्यांचा स्वभाव होता. त्यांच्या दृष्टीने धर्मशील पुरुष राज्यकर्ता असावा. धर्म म्हणजे ईश्वरी गुण, धर्मशील म्हणजे ईश्वरी गुण धारण करणारा ईश्वर हा विश्वाचा शासनकर्ता आहे. राजा हा राष्ट्राचा शासनकर्ता असतो. राजा किंवा राज्यकर्ता ईश्वराचा प्रतिनिधी म्हणून विश्वाच्या त्या भागावर राज्य करीत असतो. म्हणून जे जे ईश्वराचे गुण ते ते गुण राज्यकर्त्यांमध्ये असावे लागतात. बसेश्वरांच्या दृष्टीने राजसत्ता हे साधन आहे आणि राष्ट्राचे अंतिम हित हे साध्य आहे. राष्ट्र म्हणजे निर्गुण निराकार ईश्वराची सगुण-साकार मूर्ती होय. आपल्या उन्नतीसाठी व्यक्तींनी, समाजांनी आणि राज्यकर्त्यांनी त्यांची पूजा करायला हवी. उन्नतीसाठी झटावयास हवे, असे त्यांना वाटे.महात्मा बसवेश्वर हे अवतारी पुरुष होते. उपजतच त्यांच्या ठिकाणी ईश्वरी गुण होते. त्यांचे हृदय शिवशरणांचे, संतांचे होते. ते धर्मशील होते. प्रापंचिक असूनही विरक्त होते. ते विज्जळ राजाचे प्रधानमंत्री होते. आदर्श शासनकर्ते होते. बालपणापासून अनेक आदर्शांची स्वप्ने ते उराशी बाळगून होते. वयाच्या २१व्या वर्षापर्यंत त्यांनी सर्व विद्या आत्मसात केल्या. त्या वयापर्यंत त्यांना सगुण साकार ईश्वराचा साक्षात्कार, आत्मसाक्षात्कार आणि निर्गुण निराकार ईश्वराचा साक्षात्कार झाला होता. राज्यकारभार स्वच्छ, पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त असावा हे महात्मा बसवेश्वरांचे जीवनसूत्र होते.-अनिल लक्ष्मण कोठुळे-उत्तर महाराष्ट्र प्रमुख :अखिल भारतीय वीरशैव युवक संघटना