शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
2
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
3
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
4
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
5
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल चामखीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
Plane Crash: उड्डाणानंतर काही मिनिटांतच विमान कोसळलं; भयानक घटना कॅमेऱ्यात कैद!
8
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
9
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
10
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
11
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
12
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
13
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
14
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
15
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
16
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
17
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
18
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
19
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
20
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...

महाराष्ट्र संघाची बडोद्यावर 'अबकी बार चारसो पार' ने मात

By धनंजय रिसोडकर | Updated: January 26, 2025 17:08 IST

तब्बल सात वर्षानंतर येथील अनंत कान्हेरे मैदानावर झालेल्या रणजी सामन्यात महाराष्ट्राने बडोद्याचा 429 धावांनी दणदणीत पराभव केला.

नाशिक : तब्बल सात वर्षानंतर येथील अनंत कान्हेरे मैदानावर झालेल्या रणजी सामन्यात महाराष्ट्राने बडोद्याचा 429 धावांनी दणदणीत पराभव केला. सामनावीर म्हणून पहिल्या डावात अर्धशतक तर दुसऱ्या डावात शतकवीर ठरलेला सौरभ नवले याला गौरवण्यात आले. उपहारानंतर तासाभरातच बडोद्याच्या सर्व खेळाडूंना तंबूत पाठवत महाराष्ट्राचा खेळाडूंनी एकच जल्लोष केला.महाराष्ट्राने कालच्या 7 बाद 464 धावसंख्येवर आपला दुसरा डाव घोषित केला. पहिल्या डावाची आघाडी धरून महाराष्ट्राने बडोद्यासमोर विजयासाठी तब्बल 616 धावांचे आव्हान दिले. त्यामुळे सकाळीच बडोद्याच्या सलामीवीरांनी बडोद्याच्या डावाची सुरुवात केली. सलामीवीर शिवालीक शर्मा हा झटपट बाद झाला त्यावेळी 1 बाद 16 अशी झाली होती. त्यानंतर ठराविक क्रमाने बडोद्याचे गडी बाद होत गेले.

नाशिकचा लोकल बाॅय अर्थात रामकृष्ण घोष याने पुन्हा एकदा गोलंदाजीची चमक दाखवत दोन फलंदाजांना तंबूत पाठवले. विशेषत्वे बडोद्याचा कर्णधार कृणाल पांड्या याला दुसऱ्या डावातदेखील त्यानेच तंबूची वाट धरायला  लावली. रामकृष्णने 16 धावात 2 गडी बाद केले. बडोदाचे फलंदाज एकापाठोपाठ बाद होत गेले तोच तसा महाराष्ट्राचा विजय समीप येत गेला. महाराष्ट्राच्या या विजयाने बडोद्याच्या संघ गुणतालिकेत फरक पडला असून जम्मू काश्मीर प्रथम स्थानावर पोहोचले आहे. 

सेल्फीसह ऑटोग्राफवाल्यांची निराशा

 कुणाल पांड्या व ऋतुराज गायकवाड यांच्याबरोबर सेल्फी काढता यावी किंवा किमान एक सही तरी मिळावी या अपेक्षेने नाशिककर क्रिकेटप्रेमींनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. सामना संपल्यानंतरही जवळजवळ दोन तास या  खेळाडूंची वाट पहाण्यासाठी थांबले होते. अनेकांनी प्रतीक्षा करूनही त्यांना कुणाल पांड्या व ऋतुराज गायकवाड यांना भेटता न आल्यामुळे नाराज होऊन परतावे लागले.गोलंदाजांच्या क्षमतेवर होता विश्वास

पत्रकारांशी झालेल्या संवादात महाराष्ट्राचा कर्णधार  ऋतुराज गायकवाड याने विजयाबद्दल आनंद व्यक्त करत पुढील सामन्यातही विजयी घोडदौड सुरूच ठेवणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. तसेच बडोद्याच्या संपूर्ण संघाला दिवसभरात आमचे गोलंदाज नक्कीच बाद करतील हा विश्वास होता. त्यामुळेच तिसऱ्या दिवसाच्या अखेरपर्यंत आम्ही खेळून काढत डाव घोषित करण्याची घाई केली नाही. नाशिकचे वातावरण आणि प्रेक्षकांचा पाठिंबा देखील खूप चांगला लाभला. त्यामुळे नाशिकला खेळताना आनंद मिळाला असल्याचे ऋतुराज गायकवाड याने नमूद केले.