शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

महाराष्ट्र संघाची बडोद्यावर 'अबकी बार चारसो पार' ने मात

By धनंजय रिसोडकर | Updated: January 26, 2025 17:08 IST

तब्बल सात वर्षानंतर येथील अनंत कान्हेरे मैदानावर झालेल्या रणजी सामन्यात महाराष्ट्राने बडोद्याचा 429 धावांनी दणदणीत पराभव केला.

नाशिक : तब्बल सात वर्षानंतर येथील अनंत कान्हेरे मैदानावर झालेल्या रणजी सामन्यात महाराष्ट्राने बडोद्याचा 429 धावांनी दणदणीत पराभव केला. सामनावीर म्हणून पहिल्या डावात अर्धशतक तर दुसऱ्या डावात शतकवीर ठरलेला सौरभ नवले याला गौरवण्यात आले. उपहारानंतर तासाभरातच बडोद्याच्या सर्व खेळाडूंना तंबूत पाठवत महाराष्ट्राचा खेळाडूंनी एकच जल्लोष केला.महाराष्ट्राने कालच्या 7 बाद 464 धावसंख्येवर आपला दुसरा डाव घोषित केला. पहिल्या डावाची आघाडी धरून महाराष्ट्राने बडोद्यासमोर विजयासाठी तब्बल 616 धावांचे आव्हान दिले. त्यामुळे सकाळीच बडोद्याच्या सलामीवीरांनी बडोद्याच्या डावाची सुरुवात केली. सलामीवीर शिवालीक शर्मा हा झटपट बाद झाला त्यावेळी 1 बाद 16 अशी झाली होती. त्यानंतर ठराविक क्रमाने बडोद्याचे गडी बाद होत गेले.

नाशिकचा लोकल बाॅय अर्थात रामकृष्ण घोष याने पुन्हा एकदा गोलंदाजीची चमक दाखवत दोन फलंदाजांना तंबूत पाठवले. विशेषत्वे बडोद्याचा कर्णधार कृणाल पांड्या याला दुसऱ्या डावातदेखील त्यानेच तंबूची वाट धरायला  लावली. रामकृष्णने 16 धावात 2 गडी बाद केले. बडोदाचे फलंदाज एकापाठोपाठ बाद होत गेले तोच तसा महाराष्ट्राचा विजय समीप येत गेला. महाराष्ट्राच्या या विजयाने बडोद्याच्या संघ गुणतालिकेत फरक पडला असून जम्मू काश्मीर प्रथम स्थानावर पोहोचले आहे. 

सेल्फीसह ऑटोग्राफवाल्यांची निराशा

 कुणाल पांड्या व ऋतुराज गायकवाड यांच्याबरोबर सेल्फी काढता यावी किंवा किमान एक सही तरी मिळावी या अपेक्षेने नाशिककर क्रिकेटप्रेमींनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. सामना संपल्यानंतरही जवळजवळ दोन तास या  खेळाडूंची वाट पहाण्यासाठी थांबले होते. अनेकांनी प्रतीक्षा करूनही त्यांना कुणाल पांड्या व ऋतुराज गायकवाड यांना भेटता न आल्यामुळे नाराज होऊन परतावे लागले.गोलंदाजांच्या क्षमतेवर होता विश्वास

पत्रकारांशी झालेल्या संवादात महाराष्ट्राचा कर्णधार  ऋतुराज गायकवाड याने विजयाबद्दल आनंद व्यक्त करत पुढील सामन्यातही विजयी घोडदौड सुरूच ठेवणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. तसेच बडोद्याच्या संपूर्ण संघाला दिवसभरात आमचे गोलंदाज नक्कीच बाद करतील हा विश्वास होता. त्यामुळेच तिसऱ्या दिवसाच्या अखेरपर्यंत आम्ही खेळून काढत डाव घोषित करण्याची घाई केली नाही. नाशिकचे वातावरण आणि प्रेक्षकांचा पाठिंबा देखील खूप चांगला लाभला. त्यामुळे नाशिकला खेळताना आनंद मिळाला असल्याचे ऋतुराज गायकवाड याने नमूद केले.