शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

महाराष्ट्राला दररोज आयात करावी लागतात एक कोटी अंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:13 IST

नाशिक : कोरोनामुळे अंड्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली असून, त्या तुलनेत उत्पादन कमी असल्यामुळे सध्या बाजारात अंड्याचे दरात वाढ ...

नाशिक : कोरोनामुळे अंड्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली असून, त्या तुलनेत उत्पादन कमी असल्यामुळे सध्या बाजारात अंड्याचे दरात वाढ झाली असून, उत्पादनातील तूट भरुन काढण्यासाठी महाराष्ट्राला परराज्यातून सुमारे एक कोटी अंडी आयात करावी लागत आहेत. अंडी उष्ण असल्यामुळे अनेक डॉक्टर अंडी खाण्याचा सल्ला रुग्णांना देतात. यामुळे अंड्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे अंड्यांचे दरही वाढले असून, सध्या फार्म लिफ्टींगला पाच रुपये १५ पैसे प्रतिनग इतका दर मिळत आहे तर किरकोळ बाजारात सहा ते सात रुपये प्रतिनग याप्रमाणे अंड्यांची विक्री होत आहे. ऊन्हाळ्यामुळे अनेक पोल्ट्री फार्मवर पाण्याची समस्या निर्माण होते. यामुळे अनेक पोल्ट्रीचालक उन्हाळ्यात पक्षी ठेवत नाहीत. याचा अंडी उत्पादनावर परिणाम होतो. महाराष्ट्राला साधारणत: दररोज तीन कोटी अंडी लागतात, त्यातील दोन लाखांपर्यंत महाराष्ट्रात उत्पादन होते तर आंध्र, तेलंगणा, गुजरात या राज्यांमधून साधारणत: एक कोटी अंडी आयात करावी लागतात. महाराष्ट्रात अंडी उत्पादन करणाऱ्या पोल्ट्री फार्मची संख्या कमी असल्यामुळे दरराेज अंड्यांची आयात करावी लागते. सध्या मागणी अधिकच असल्याने त्यात वाढ झाली आहे.

कोट -

मध्यंतरीच्या काळात पोल्ट्री व्यवसाय संकटात सापडला होता. याशिवाय कोंबडी खाद्याचे दरही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. १,३०० रुपये क्विंटल असलेला मका १,७०० रुपयांवर तर सोयामिल ४० हजारांवरुन ७० हजार रुपये टनापर्यंत पोहोचले आहे. ही दोन प्रमुख खाद्य महागल्याने अंडी उत्पादनाचा दरही महागला आहे. पूर्वी एका अंड्याच्या उत्पादनासाठी तीन रुपये खर्च येत होता तो आता चार रुपयांपर्यंत पोहोचला आहे.

- उद्धव आहिरे, राज्य सचिव, महाराष्ट्र पाेल्ट्री फार्म ब्रिडर्स असोसिएशन