शहरं
Join us  
Trending Stories
1
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
2
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
3
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
4
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
5
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
6
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
7
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
8
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
9
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
10
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
11
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
12
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
13
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण
14
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
15
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
16
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
17
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
18
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
19
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
20
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले

महाबळेश्वर, माथेरानला पर्यटनासाठी पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 00:28 IST

उन्हाळी पर्यटनासाठी सध्या नागरिक मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडले आहे. शालेय सुटीचा अद्याप महिना शिल्लक राहिल्याने नाशिककर कुटुंबासमवेत देशाटनासाठी बाहेर पडले आहे. महाबळेश्वर, पाचगणीसह माथेरानसारख्या थंड हवेच्या ठिकाणांना पर्यटनासाठी अधिक पसंती दिली जात आहे.

नाशिक : उन्हाळी पर्यटनासाठी सध्या नागरिक मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडले आहे. शालेय सुटीचा अद्याप महिना शिल्लक राहिल्याने नाशिककर कुटुंबासमवेत देशाटनासाठी बाहेर पडले आहे. महाबळेश्वर, पाचगणीसह माथेरानसारख्या थंड हवेच्या ठिकाणांना पर्यटनासाठी अधिक पसंती दिली जात आहे.  राज्य पर्यटन विकास महामंडळाकडे महाबळेश्वर, पाचगणीसह माथेरान व तारकर्लीसारख्या समुद्र किनाऱ्यांवरही भटकंतीची चौकशी व आगाऊ नोंदणी होत आहे. या पर्यटन स्थळांवरील रिसॉर्ट हाउसफुल्ल असून, खासगी निवासव्यवस्थाही या भागात महागली आहे. हंगाम कॅच करण्यासाठी या भागातील व्यावसायिक संपूर्णत: सज्ज असून, निवास, वाहतुकीसह भोजनव्यवस्थेचे दरही आकाशाला भिडले आहेत. शहरातून नाशिक-पुणे, नाशिक-सातारा, नाशिक-पुणेमार्गे थेट महाबळेश्वर या शिवशाही बसेसला गर्दी वाढली आहे. नाशिक-सातारा तसेच नाशिक-महाबळेश्वर बससेवा पहाटे असून, पुण्यासाठी दर अर्ध्या तासाला शिवशाही नाशिकमधून धावत आहे. एकूणच उन्हाळी सुटीमुळे पर्यटनासाठी नागरिक घराबाहेर पडल्याने वाहतुकीचा ताण निर्माण झाला आहे. नाशिक-पुणे महामार्गावर वाहनांची संख्या वाढली आहे. सार्वजनिक वाहतूकव्यवस्थेसह खासगी वाहनांनीदेखील लोक पर्यटनासाठी भटकंती करताना दिसून येत आहे. नाशिक ते महाबळेश्वरचा प्रवास माथेरानच्या तुलनेत अधिक लांबचा आहे. महाबळेश्वरचे नैसर्गिक सौंदर्य, तेथील डोंगरदºया व थंड हवामान पर्यटकांना आकर्षित करते. राज्यातील दुसरे थंड हवेचे ठिकाण व मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखले जाणारे नेरळजवळील माथेरानला ही नागरिकांकडून पसंती दिली जात आहे. ‘माथेरानची राणी’ रुळावर धावत असल्याने पर्यटकांची गर्दी वाढली आहे.काश्मीरकडे पर्यटकांचा कलकाश्मीरमधील सुरक्षाव्यवस्थेबाबत सातत्याने जरी चर्चा होत असली तरी उन्हाळ्यातील पर्यटनासाठी नाशिकमधून काश्मीरला अधिक पसंती मिळत असल्याचे पर्यटन व्यावसायिकांचे म्हणणे आहे. काश्मीरचे निसर्ग सौंदर्य, खाद्यसंस्कृती अनुभवण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने काश्मीर पर्यटनाला प्राधान्य देत असल्याचे टूर आॅपरेटर दत्ता भालेराव यांनी सांगितले. सर्वसामान्य नागरिकांकडून पर्यटकांचे आदरातिथ्यबाबत प्रचंड उत्सुकता व काळजी दाखविली जात असल्याचा पर्यटकांचा अनुभव त्यांनी सांगितला. जिल्हाभरातून सुमारे तीन ते चार हजार पर्यटक काश्मीरमध्ये पोहचले आहेत, तर काही पर्यटक परतीच्या प्रवासालाही लागले आहेत.

टॅग्स :tourismपर्यटन