शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

राज ठाकरे यांच्याकडून श्री काळारामाची महाआरती; ‘जनतेच्या मनातील मुख्यमंत्री’ फलकाने लक्ष वेधले

By suyog.joshi | Updated: March 8, 2024 13:20 IST

मंदिरात ठाकरे कुटुंबियांच्यावतीने गणपती पूजन, पुण्याहवाचन, अभिषेक करण्यात आला. त्यानंतर मंत्रपुष्पांजली म्हणण्यात आली. त्यानंतर अमित व मिताली ठाकरे यांनी मंदिराला प्रदक्षिणा मारली.

नाशिक (सुयोग जोशी) : सियावर रामचंद्र की जय, पवनसूत हनुमान की जय, ‘जय श्रीराम, जय जय श्रीराम’ च्या जयजयकारात अन पुरोहितांच्या मंत्रोच्चारात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, मुलगा अमित ठाकरे व स्नुषा मिताली ठाकरे यांच्या हस्ते शनिवारी सकाळी येथील प्रसिद्ध श्री काळारामाची महाआरती करण्यात आली. मंदिरात ठाकरे कुटुंबियांच्यावतीने गणपती पूजन, पुण्याहवाचन, अभिषेक करण्यात आला. त्यानंतर मंत्रपुष्पांजली म्हणण्यात आली. त्यानंतर अमित व मिताली ठाकरे यांनी मंदिराला प्रदक्षिणा मारली.

यावेळी मंगेश पुजारी, श्रीकांत पुजारी, नरेश पुजारी यांनी पौरोहित्य केले. विश्वस्तांच्या हस्ते राज ठाकरे यांचा मंदिराची प्रतिमा व शाल देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मंदिराभोवती पोलिसांची कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मंदिराच्या आतमध्ये तसेच पटांगणात ठराविक नागरिकांनाच प्रवेश देण्यात आला होता. प्रारंभी मंदिराच्या प्रवेशद्वारावर राज ठाकरे यांचे ढाेल पथकाच्या निनादात स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांच्यावर पुष्पांची उधळण करण्यात आली. त्यानंतर महिलांनीही ‘राम आयेंगे तो दिवाली मै मनाऊंगी’ सारखी रामाची गीते गात परिसर राममय केला होता. भजनी मंडळानेही रामाची भजने गायली. मंदिर पटांगणात राज ठाकरे यांनी नाशिक भिखू संघ, प्रजापिता ब्रह्मकुमारर्व्इश्वरीय विश्वविद्यालयाचे प्रतिनिधी, भजनी मंडळ तसेच चित्रकला महाविद्यालयाच्या मुलांची भेट घेत चौकशी केली.महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील मुख्यमंत्री

श्री काळारा मंदिराच्या प्रवेशद्वारावर राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी वेगवेगळ फलक लावण्यात आले होते. त्यातील मुख्य प्रवेशदवारावरील ‘महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील मुख्यमंत्री’ हा फलक लक्ष वेधून घेत होता. मंदिर परिसरात याच फलकाची जोरदार चर्चा रंगली होती.वर्धापनदिनी सभा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापनदिनानिमित्त शनिवार, दि. ९ रोजी येथील दादासाहेब गायकवाड सभागृहात सकाळी ९ वाजेपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात पदाधिकाऱ्यांच्या भेटीही राज ठाकरे घेणार आहेत. यावेळी दुपारी ११ वाजेच्यादरम्यान राज ठाकरे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी राज्याच्या विविध भागातून पदाधिकारी, कार्यकर्ते शहरात दाखल होण्यास सुरूवात झाली आहे.