शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

द्राक्ष बागांमध्ये शेकोट्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 15:28 IST

सायखेडा : निफाड तालुक्यात सलग चौथ्या दिवशी चार अंश सेल्सियस तापमान असल्याने वाढत्या थंडीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून द्राक्ष उत्पादक शेतकरी धास्तावला आहे.

सायखेडा : निफाड तालुक्यात सलग चौथ्या दिवशी चार अंश सेल्सियस तापमान असल्याने वाढत्या थंडीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून द्राक्ष उत्पादक शेतकरी धास्तावला आहे. अति प्रमाणात थंडी असल्याने मन्यांना तडे जात आहे. हाती आलेला बाग वाचविण्यासाठी शेतकºयांची धडपड सुरू आहे. आपल्या बागेत उष्णता निर्माण व्हावी, आर्द्रतेचे प्रमाण कमी होऊन मन्यांना नरमपणा यावा यासाठी शेतात शेकोटे पेटवली जात आहे. धूर आणि उष्णतेच्या झळा घडांना लागल्यास घड सैल होऊन तडे जाणार नाही असे अभ्यासकांचे मत असल्याने मध्यरात्री, पहाटे बागेत शेकोट्या पेटलेल्या दिसत आहे. राज्यात सर्वात कमी तापमानाची नोंद निफाड तालुक्यात झाली. गोदावरी आणि कादवा नदीचे खोरे, पाणथळ शिवार, हिरवीगार शेत, तालुक्यातून वाहणारे कालवे ,उपसा सिंचन प्रकल्प यामुळे तालुक्यातील ऐंशी टक्के भूभाग ओलिता खाली येत असल्याने बºयाचवेळा थंडी मोठ्या प्रमाणावर असते. यंदा मात्र थंडीने नीचांक गाठला आहे. वाढत्या थंडीचा फटका सर्वाधिक द्राक्ष उत्पादक शेतकºयांना बसत आहे. द्राक्ष हे वर्षातून एकदा घेतले जाणारे पीक आहे. शिवाय इतर सर्व पिकांपेक्षा जास्त खर्च होतो. भांडवल जास्त लागते त्यामुळे पीक चांगले यावे आणि आर्थिक फायदा व्हावा यासाठी शेतकरी मोठी कसरत करत असतो. सोने गहाण ठेऊन पिकासाठी भांडवल उभे करतो. अनेक पतपेढी, बँक यांचे शेती कर्ज काढून पीक जोमात आणतो मात्र हाती आलेले पीक कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटांनी वाया जाते. शेतकरी आर्थिक संकटांचा सामना करत पीक वाचविण्याचा प्रयत्न सुरू ठेवतो. थंडीचा परिणाम जाणवू लागला आहे, मन्यांना तडे जात आहे. शिवाय भुरी रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे शेतात धूर करून थंडी आटोक्यात ठेवण्याचा प्रयत्न शेतकरी करतांना दिसत आहे. अनेक शेतकरी पहाटे बागेला ठिबकद्वारे पाणी देऊन झाडांमध्ये उष्णता निर्माण करत आहे.

टॅग्स :Nashikनाशिक