शहरं
Join us  
Trending Stories
1
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
2
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
3
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
4
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
5
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
6
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
7
जबरदस्तीची मिठी अन् दोन वेळा Kiss...! प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलाचं घाणेरड कृत्य; व्हिडिओ व्हायरल
8
भारताचा लाजिरवाणा पराभव! आफ्रिकेने हरवल्यानंतर उपकर्णधार पंत म्हणतो- "आज झालेला पराभव...
9
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
10
IND vs SA : आम्ही जिंकलो असतो तर...! लाजिरवाण्या पराभवानंतर नेमकं काय म्हणाले कोच गौतम गंभीर?
11
‘वंदे भारत’च्या मदतीला TATA कंपनी? ट्रेन बांधणीत ठरणार गेम चेंजर! ‘मेक इन इंडिया’ वेग घेणार
12
टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेची कमाल! 'लो स्कोअरिंग' टेस्टमध्ये बेस्ट कामगिरीसह मारली बाजी
13
“काही ठिकाणी महायुती झाली, कुठे नाही, परवापर्यंत सगळे समजेल”: CM फडणवीसांनी केले स्पष्ट
14
Rohini Acharya : "मला घाणेरड्या शिव्या दिल्या, मारायला चप्पल उचलली, आई-वडिलांना..."; रोहिणी यांची भावुक पोस्ट
15
प्यार किया तो डरना क्या! ८३ वर्षीय आजीच्या प्रेमात वेडा झाला २३ वर्षांचा तरुण, कुटुंबाने दिली साथ
16
याला म्हणतात धमाका शेअर...! फक्त 2 वर्षांत दिला 16000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल आता 5 बोनस शेअर वाटणार कंपनी
17
जैश टेरर मॉड्यूलवर मोठी कारवाई: अनंतनागमध्ये छाप्यानंतर हरियाणाची महिला डॉक्टर ताब्यात
18
अ‍ॅसिड फेकलं, छतावरुन ढकललं; 'तो' वाद टोकाला गेला, नवरा थेट बायकोच्या जीवावर उठला
19
Mumbai: वाकोला ते बीकेसी उन्नत मार्गाचे ८० टक्के काम पूर्ण; लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार!
20
गोरखपूरमध्ये उभारलं जातंय जागतिक दर्जाचे विज्ञान उद्यान; योगी सरकारने घेतला मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

द्राक्ष बागांमध्ये शेकोट्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 15:28 IST

सायखेडा : निफाड तालुक्यात सलग चौथ्या दिवशी चार अंश सेल्सियस तापमान असल्याने वाढत्या थंडीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून द्राक्ष उत्पादक शेतकरी धास्तावला आहे.

सायखेडा : निफाड तालुक्यात सलग चौथ्या दिवशी चार अंश सेल्सियस तापमान असल्याने वाढत्या थंडीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून द्राक्ष उत्पादक शेतकरी धास्तावला आहे. अति प्रमाणात थंडी असल्याने मन्यांना तडे जात आहे. हाती आलेला बाग वाचविण्यासाठी शेतकºयांची धडपड सुरू आहे. आपल्या बागेत उष्णता निर्माण व्हावी, आर्द्रतेचे प्रमाण कमी होऊन मन्यांना नरमपणा यावा यासाठी शेतात शेकोटे पेटवली जात आहे. धूर आणि उष्णतेच्या झळा घडांना लागल्यास घड सैल होऊन तडे जाणार नाही असे अभ्यासकांचे मत असल्याने मध्यरात्री, पहाटे बागेत शेकोट्या पेटलेल्या दिसत आहे. राज्यात सर्वात कमी तापमानाची नोंद निफाड तालुक्यात झाली. गोदावरी आणि कादवा नदीचे खोरे, पाणथळ शिवार, हिरवीगार शेत, तालुक्यातून वाहणारे कालवे ,उपसा सिंचन प्रकल्प यामुळे तालुक्यातील ऐंशी टक्के भूभाग ओलिता खाली येत असल्याने बºयाचवेळा थंडी मोठ्या प्रमाणावर असते. यंदा मात्र थंडीने नीचांक गाठला आहे. वाढत्या थंडीचा फटका सर्वाधिक द्राक्ष उत्पादक शेतकºयांना बसत आहे. द्राक्ष हे वर्षातून एकदा घेतले जाणारे पीक आहे. शिवाय इतर सर्व पिकांपेक्षा जास्त खर्च होतो. भांडवल जास्त लागते त्यामुळे पीक चांगले यावे आणि आर्थिक फायदा व्हावा यासाठी शेतकरी मोठी कसरत करत असतो. सोने गहाण ठेऊन पिकासाठी भांडवल उभे करतो. अनेक पतपेढी, बँक यांचे शेती कर्ज काढून पीक जोमात आणतो मात्र हाती आलेले पीक कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटांनी वाया जाते. शेतकरी आर्थिक संकटांचा सामना करत पीक वाचविण्याचा प्रयत्न सुरू ठेवतो. थंडीचा परिणाम जाणवू लागला आहे, मन्यांना तडे जात आहे. शिवाय भुरी रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे शेतात धूर करून थंडी आटोक्यात ठेवण्याचा प्रयत्न शेतकरी करतांना दिसत आहे. अनेक शेतकरी पहाटे बागेला ठिबकद्वारे पाणी देऊन झाडांमध्ये उष्णता निर्माण करत आहे.

टॅग्स :Nashikनाशिक