शहरं
Join us  
Trending Stories
1
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
2
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
3
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
4
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
5
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
6
Foldable Smartphones: सॅमसंग गॅलेक्सी ते गुगल पिक्सेलपर्यंत, यावर्षी लॉन्च झालेले प्रीमियम फोल्डेबल स्मार्टफोन!
7
"त्याला वर्षभर संधी, मला २-३ मॅचनंतर बाहेर काढलं..."; शुबमन गिलला संघाबाहेर न केल्याचा संताप
8
धोक्याची घंटा! फोन वाजला, उचलला पण समोरुन आवाजच नाही आला; Silent Calls चा नवा स्कॅम
9
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
10
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
11
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
12
वयोवृद्ध जोडपं दहशतवाद्याशी भिडलं, अखेरीस एकमेकांच्या मिठीत सोडले प्राण, बोरिस आणि सोफियाची थरारक कहाणी
13
मेस्सीचा इव्हेंट फसला, स्टेडियममध्ये मोठा गोंधळ झाला होता; बंगालच्या क्रीडामंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला
14
IPL 2026 Auction: विस्फोटक फलंदाज आयपीएल २०२६ च्या मेगा ऑक्शनमध्ये अनसोल्ड, नाव ऐकून चकीत व्हाल!
15
बाई, हा काय प्रकार... LinkedIn वर फुल-टाइम गर्लफ्रेंडची व्हॅकन्सी, लोक विचारतात सॅलरी किती?
16
सोनं १३०६ रुपयांनी स्वस्त, चांदीही घसरली; पटापट चेक करा कॅरेटनिहाय लेटेस्ट रेट
17
Jara Hatke: अजब प्रथा: 'या' गावात लग्नाआधी तोडले जातात वधूचे दात; पण का??? वाचा 
18
मनोज जरांगे पाटील यांनी दिल्ली गाठली; अमित शाह यांच्याकडे केली मोठी मागणी, नेमके काय घडतेय?
19
IPL Auction 2026 LIVE: नवोदित कार्तिक शर्मा, प्रशांत वीर, अकिब जावेदवर पैशांचा पाऊस, लागल्या विक्रमी बोली
20
Budh Pradosh 2025: इंग्रजी वर्ष २०२५ मधील शेवटचे प्रदोष व्रत; कर्जमुक्ती, संतान प्राप्तीसाठी करा 'हे' उपाय
Daily Top 2Weekly Top 5

कमी दाबाचा पट्टा, मानवी हस्तक्षेप पुराची प्रमुख कारणे : डॉ. प्रमोद हिरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2021 01:25 IST

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होताच गंगापूर धरणातून विसर्ग केल्यास गोदावरीला येणारा पूर टाळता येऊ शकतो. त्यामुळे ऐनवेळी पाण्याचा विसर्ग करण्याची वेळ येणार नाही. चक्रीवादळे आणि कमी दाबाचा पट्टा निर्माण होणे ही पूरस्थितीची प्रमुख कारणे असून, काही मानवनिर्मित कारणेदेखील असल्याचे मत डॉ. प्रमोद हिरे यांनी व्यक्त केले. तसेच गोदावरीला आलेल्या पुराच्या पातळीविषयी डॉ. हिरे यांनी माहिती दिली.

ठळक मुद्दे नदी महोत्सवाची जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सांगता
नाशिक : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होताच गंगापूर धरणातून विसर्ग केल्यास गोदावरीला येणारा पूर टाळता येऊ शकतो. त्यामुळे ऐनवेळी पाण्याचा विसर्ग करण्याची वेळ येणार नाही. चक्रीवादळे आणि कमी दाबाचा पट्टा निर्माण होणे ही पूरस्थितीची प्रमुख कारणे असून, काही मानवनिर्मित कारणेदेखील असल्याचे मत डॉ. प्रमोद हिरे यांनी व्यक्त केले. तसेच गोदावरीला आलेल्या पुराच्या पातळीविषयी डॉ. हिरे यांनी माहिती दिली.नदी महोत्सवात ‘ऊर्ध्व गोदावरी नदीवरील आधुनिक पूर : कारणे आणि परिणाम’ या विषयावर ते बोलत होते. मंगळवारी (दि. २१) दरबार हॉल, सरकारवाडा येथे या महोत्सवाची सांगता झाली. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास पुरातत्त्व विभागाच्या साहाय्यक संचालक आरती आळे, उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे, योगेश कासार उपस्थित होते.डॉ. हिरे म्हणाले, ज्या पुरांचे मोजमाप करण्यात आले त्यास ‘आधुनिक पूर’ म्हणतात; तर मोजमाप नसलेले पूर ऐतिहासिक पूर आहेत. नोंदी नसलेल्या प्राचीन पुरांचा अभ्यास सुरू आहे. नाशिकमध्ये दुतोंड्या मारुती पूर मोजण्याचे प्रमाण मानले जाते. मात्र तो शास्त्रीय आधार नाही. भारतात ५०० वर्षांपूर्वीच्या पुराची नोंद आढळत नाही. सक्रिय आणि जोमदार मान्सून, कमी दाबाचे पट्टे ही पुराची प्रमुख कारणे आहेत. पूर ही नैसर्गिक प्रक्रिया असली तरी मानवनिर्मित कारणांमुळे पुराचे प्रमाण वाढले आहे. १९६९ च्या तुलनेत गोदावरी व गिरणा नद्यांना मोठा पूर आले नसल्याचा दावा त्यांनी केला. गोदावरीला १९१९ मध्ये पूर विसर्गाने मोठा होता. तर १९६९ मध्ये पाण्याची पातळी मोठी असल्याचे त्यांनी सांगितले.--दुष्काळ अधिक त्रासदायक : जिल्हाधिकारीबंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होताच धरणातून विसर्ग केल्यास पुराचे नियंत्रण करता येऊ शकते, असे मत डॉ. हिरे यांनी मांडले. मात्र, कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला तर पाऊस येईलच असे नसल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले. दुष्काळाच्या तुलनेत पुराचा सामना करणे सोपे असते. दुष्काळ जास्त त्रासदायक असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. पूर आटोक्यात आणण्यासाठीचे पर्याय आणि उपाययोजनांची जिल्हाधिकाऱ्यांनी चाचपणी केली.
टॅग्स :Nashikनाशिकcollectorजिल्हाधिकारी