शहरं
Join us  
Trending Stories
1
फलटण प्रकरणाचा होणार एसआयटीमार्फत तपास; मुख्यमंत्री फडणवीस यांचे पोलिस महासंचालकांना आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०१ नोव्हेंबर २०२५: अचानक धनलाभ, प्रिय व्यक्तींचा सहवास; मन प्रसन्न राहील
3
विरोधकांचा आज मुंबईत निघणार 'सत्याचा मोर्चा'; निवडणूक आयोगाविरोधात करणार कोर्टात याचिका
4
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
5
जिल्हा परिषदांऐवजी आधी नगरपालिकांची निवडणूक; आयोगाकडून घोषणा पुढील आठवड्यात
6
हात बांधले, बंदूक रोखली अन्.. ओलीस नाट्याचा तीन महिन्यांपासून कट; चार दिवसांपासून सुरू होती रंगीत तालीम
7
'दीपक केसरकरांनी अन्याय केला'; आम्ही फेक सीन करत होतो, तो मात्र ते वास्तवात आणत होता...
8
तिसरे अपत्य लपविणाऱ्यास निवडणुकीत बसणार चाप! सप्टेंबर २००१ नंतर जन्मलेले तिसरे अपत्य ठरवेल उमेदवाराला अपात्र
9
अडीच लाख अन् महिन्याच्या रेशनसाठी चिमुकलीचे शोषण; आईच तिला रोज रात्री नराधमाकडे सोपवायची
10
रोहित आर्याने पोलिसांवर गोळी झाडलीच नाही...; गुन्हे शाखेकडून तपास सुरू, अपघाती मृत्यू म्हणून नोंद
11
लोकल प्रवाशांचा उद्या तिन्ही मार्गावर होणार खोळंबा; देखभालीसाठी मध्य, पश्चिम व हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
12
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
13
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
14
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
15
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
16
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
17
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
18
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
19
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
20
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश

कमी दाबाचा पट्टा, मानवी हस्तक्षेप पुराची प्रमुख कारणे : डॉ. प्रमोद हिरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2021 01:25 IST

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होताच गंगापूर धरणातून विसर्ग केल्यास गोदावरीला येणारा पूर टाळता येऊ शकतो. त्यामुळे ऐनवेळी पाण्याचा विसर्ग करण्याची वेळ येणार नाही. चक्रीवादळे आणि कमी दाबाचा पट्टा निर्माण होणे ही पूरस्थितीची प्रमुख कारणे असून, काही मानवनिर्मित कारणेदेखील असल्याचे मत डॉ. प्रमोद हिरे यांनी व्यक्त केले. तसेच गोदावरीला आलेल्या पुराच्या पातळीविषयी डॉ. हिरे यांनी माहिती दिली.

ठळक मुद्दे नदी महोत्सवाची जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सांगता
नाशिक : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होताच गंगापूर धरणातून विसर्ग केल्यास गोदावरीला येणारा पूर टाळता येऊ शकतो. त्यामुळे ऐनवेळी पाण्याचा विसर्ग करण्याची वेळ येणार नाही. चक्रीवादळे आणि कमी दाबाचा पट्टा निर्माण होणे ही पूरस्थितीची प्रमुख कारणे असून, काही मानवनिर्मित कारणेदेखील असल्याचे मत डॉ. प्रमोद हिरे यांनी व्यक्त केले. तसेच गोदावरीला आलेल्या पुराच्या पातळीविषयी डॉ. हिरे यांनी माहिती दिली.नदी महोत्सवात ‘ऊर्ध्व गोदावरी नदीवरील आधुनिक पूर : कारणे आणि परिणाम’ या विषयावर ते बोलत होते. मंगळवारी (दि. २१) दरबार हॉल, सरकारवाडा येथे या महोत्सवाची सांगता झाली. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास पुरातत्त्व विभागाच्या साहाय्यक संचालक आरती आळे, उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे, योगेश कासार उपस्थित होते.डॉ. हिरे म्हणाले, ज्या पुरांचे मोजमाप करण्यात आले त्यास ‘आधुनिक पूर’ म्हणतात; तर मोजमाप नसलेले पूर ऐतिहासिक पूर आहेत. नोंदी नसलेल्या प्राचीन पुरांचा अभ्यास सुरू आहे. नाशिकमध्ये दुतोंड्या मारुती पूर मोजण्याचे प्रमाण मानले जाते. मात्र तो शास्त्रीय आधार नाही. भारतात ५०० वर्षांपूर्वीच्या पुराची नोंद आढळत नाही. सक्रिय आणि जोमदार मान्सून, कमी दाबाचे पट्टे ही पुराची प्रमुख कारणे आहेत. पूर ही नैसर्गिक प्रक्रिया असली तरी मानवनिर्मित कारणांमुळे पुराचे प्रमाण वाढले आहे. १९६९ च्या तुलनेत गोदावरी व गिरणा नद्यांना मोठा पूर आले नसल्याचा दावा त्यांनी केला. गोदावरीला १९१९ मध्ये पूर विसर्गाने मोठा होता. तर १९६९ मध्ये पाण्याची पातळी मोठी असल्याचे त्यांनी सांगितले.--दुष्काळ अधिक त्रासदायक : जिल्हाधिकारीबंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होताच धरणातून विसर्ग केल्यास पुराचे नियंत्रण करता येऊ शकते, असे मत डॉ. हिरे यांनी मांडले. मात्र, कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला तर पाऊस येईलच असे नसल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले. दुष्काळाच्या तुलनेत पुराचा सामना करणे सोपे असते. दुष्काळ जास्त त्रासदायक असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. पूर आटोक्यात आणण्यासाठीचे पर्याय आणि उपाययोजनांची जिल्हाधिकाऱ्यांनी चाचपणी केली.
टॅग्स :Nashikनाशिकcollectorजिल्हाधिकारी