शहरं
Join us  
Trending Stories
1
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
2
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
3
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
4
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
5
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
6
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
7
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
8
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
9
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
10
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक
11
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
12
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील
13
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
14
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
15
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
16
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
17
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
18
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
19
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
20
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू

कमी दाबाचा वीजपुरवठा

By admin | Updated: September 27, 2016 00:34 IST

शेतकरी संतप्त : सिंगल फेज योजना राबविण्याची मागणी

द्याने : वीज वितरण कंपनीकडून होणाऱ्या असंतुलित व कमी दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे शेतकऱ्यांना आपले वीजपंप सलग चालविता येत नाही तसेच पंप जळण्याच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. काही भागात सिंगलफेज योजना कार्यान्वित न झाल्यामुळे शेतशिवारात राहणाऱ्या शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. परिसरात सिंगल फेज योजना त्वरित राबवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशा मागणीचे निवेदन वीज वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले.वीज वितरण कंपनीने ठरवून दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे विजेचा पुरवठा होत नसून, विद्युतवाहक तारांचा एकमेकांना स्पर्श होऊन विद्युत जणित्रावरील डी.ओ. जाणे, फ्यूज ना दुरुस्त होणे, डी.पी जळणे अशा प्रकारच्या घटना सातत्याने घडत आहेत. स्थानिक पातळीवर कोणत्याही प्रकारची तत्पर यंत्रणा नसल्यामुळे लोडशेडिंग संपल्यावरच संबंधित देखभाल व दुरूस्तीचे काम होते किंवा त्या कामाला दोन ते तीन दिवस विलंब होतो. यात सुधारणा होणे गरजेचे आहे, अशी मागणी करण्यात आली आहे.यावेळी बागलाण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र भामरे, अशोक सावंत, नामदेव सावंत, संजय भामरे, दिनेश सावळा, बापू जगताप मधुकर कापडणीस, गिरीश भामरे, नितीन काकडे, सम्राट काकडे, शशिकांत कोर, योगेश बोरसे, विजय कोर, सुनील सोनवणे, योगेश मोरे, रविकांत कोर, योगेश पगार, नितीन मोरे, रोहिदास जाधव, विशाल मोरे आदि कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)वीजजोडणी तत्काळ देण्याची मागणीतालुक्यातील अनेक गावांमध्ये ओव्हरलोड विद्युत जनित्र आहेत. ते अण्डरलोड करावेत. वितरण कंपनीच्या ‘मागेल त्याला वीजजोडणी’ या ब्रीदवाक्याप्रमाणे कंपनीने वंचित शेतकऱ्यांना तत्काळ वीजजोडणी देऊन दिलासा द्यावा. मुल्हेर सबस्टेशनच्या लोडशेडिंग वेळापत्रकातील बदलामुळे मजुरांना पिण्याचे पाणी भरण्यासाठी सकाळी ११ वाजेपर्यंत घरी थांबावे लागते. त्यामुळे रोजगार बुडून परिणामी त्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे स्थानिक स्तरावर पूर्वीचेच वेळापत्रक ठेवावे, अशा उपरोक्त मागण्यांचे निवेदन वीज वितरण कंपनीचे सहायक अभियंता चंद्रसिंग इंगळे यांना देण्यात आले.