शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
2
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अज्ञातावर खुनाचा गुन्हा, तपास सीआयडीकडे
4
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
5
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
6
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
7
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
8
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
9
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
10
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
11
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
12
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
13
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
14
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
15
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
16
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
17
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
18
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
19
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
20
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती

सभोवतालच्या जीवसृष्टीवर प्रेम करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 00:46 IST

समाज घडविण्याचे काम खऱ्या अर्थाने संतांनी केले असून, समाजावर त्यांचे अनंत उपकार आहेत. प्रत्येक व्यक्तीने आपल्या सभोवतालच्या जीवसृष्टीवर प्रेम करावे, असे प्रतिपादन बाबूराव महाराज शास्त्री यांनी केले. येवला तालुक्यातील देवदरी येथे संत बहिणाबाई महाराज यांचा फिरता नारळी सप्ताह सुरू असून, चौथ्या दिवसाची कीर्तन सेवा पंढरपूर येथील बाबूराव शास्त्री यांनी संत बहिणाबाई महाराज यांच्या अभंगावर दिली.

ठळक मुद्देबाबूराव शास्त्री : देवदरी येथे संत बहिणाबाई महाराज यांचा फिरता नारळी सप्ताह

ममदापूर : समाज घडविण्याचे काम खऱ्या अर्थाने संतांनी केले असून, समाजावर त्यांचे अनंत उपकार आहेत. प्रत्येक व्यक्तीने आपल्या सभोवतालच्या जीवसृष्टीवर प्रेम करावे, असे प्रतिपादन बाबूराव महाराज शास्त्री यांनी केले. येवला तालुक्यातील देवदरी येथे संत बहिणाबाई महाराज यांचा फिरता नारळी सप्ताह सुरू असून, चौथ्या दिवसाची कीर्तन सेवा पंढरपूर येथील बाबूराव शास्त्री यांनी संत बहिणाबाई महाराज यांच्या अभंगावर दिली.शास्त्री महाराजांनी ‘संतकृपा झाली, इमारत फळा आली ज्ञानदेव रचिला पाया। उभारीला देवालया। जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत ज्ञानदेव रचिला पाया। नामात याच्या किकिर त्याने केला विस्तार ज्ञानदेव रचिला पाया। हा बहिणाबाई महाराज याचा अभंग सेवेसाठी घेतला. शास्त्री महाराज पुढे म्हणाले, ज्ञानोबारायांनी सामाजिक समरसतेचा पाया घातला. त्यांनी कान्होपात्रा, गोरोबा कुंभार, चोखामेळा, संत सेना महाराज, सावता महाराज असे सर्व समाजाचे संत वाळवंटात एकत्र करून खºया अर्थाने पाया रचला. वारकरी धर्माचा प्रचार नामदेव महाराज यांनी केला. बहिणाबाई महाराज म्हणतात, ज्ञानदेव महाराज यांनी पाया रचला तर याचा कळस तुकाराम महाराज यांनी केला. भूतलावावर जेवढे जीव आसतील त्यावर निरपेक्ष प्रेम करा, असे शास्त्री महाराज यांनी सांगितले.याप्रसंगी बहिणाबाई महाराज संस्थानचे अध्यक्ष मधुसूदन महाराज, मोगल बाळासाहेब दाणे, संपत आहेर, भास्कर दाणे, मच्छिंद्र गुडघे, बाळासाहेब थोरात, गोपीनाथ दाणे, ज्ञानेश्वर काळे, अर्जुन दाणे, विनायक थोरात, रवींद्र दाणे, राजेंद्र दाणे, नवनाथ दाणे रखमा दाणे, सुनील गुडघे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. सप्ताहाला ग्रामस्थांनी उपस्थितराहून कीर्तनाचा आनंद घ्यावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.औरंगाबाद जिल्ह्यातील भाविकांचा समावेशबहिणाबाई महाराज यांचा सप्ताह मधुसूधन महाराज मोगल यांनी ३९ वर्षांपूर्वी सुरू केला आहे. देवदरी येथे दररोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत महाप्रसादाचे वाटप करण्यात येत आहे. दोन ट्रॉली बाजरीच्या भाकरी व आमटी प्रसाद म्हणून देण्यात येत आहे. येथे ममदापूर, खरवंडी, देवदरी, राजापूर, कोळगाव, भारम, वाघाळा, रेडाळा, सोमठाण जोश या गावातील तसेच औरंगाबाद जिल्ह्यातील भाविक ज्ञानामृताचा लाभ घेत आहेत.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रम