शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

सभोवतालच्या जीवसृष्टीवर प्रेम करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 00:46 IST

समाज घडविण्याचे काम खऱ्या अर्थाने संतांनी केले असून, समाजावर त्यांचे अनंत उपकार आहेत. प्रत्येक व्यक्तीने आपल्या सभोवतालच्या जीवसृष्टीवर प्रेम करावे, असे प्रतिपादन बाबूराव महाराज शास्त्री यांनी केले. येवला तालुक्यातील देवदरी येथे संत बहिणाबाई महाराज यांचा फिरता नारळी सप्ताह सुरू असून, चौथ्या दिवसाची कीर्तन सेवा पंढरपूर येथील बाबूराव शास्त्री यांनी संत बहिणाबाई महाराज यांच्या अभंगावर दिली.

ठळक मुद्देबाबूराव शास्त्री : देवदरी येथे संत बहिणाबाई महाराज यांचा फिरता नारळी सप्ताह

ममदापूर : समाज घडविण्याचे काम खऱ्या अर्थाने संतांनी केले असून, समाजावर त्यांचे अनंत उपकार आहेत. प्रत्येक व्यक्तीने आपल्या सभोवतालच्या जीवसृष्टीवर प्रेम करावे, असे प्रतिपादन बाबूराव महाराज शास्त्री यांनी केले. येवला तालुक्यातील देवदरी येथे संत बहिणाबाई महाराज यांचा फिरता नारळी सप्ताह सुरू असून, चौथ्या दिवसाची कीर्तन सेवा पंढरपूर येथील बाबूराव शास्त्री यांनी संत बहिणाबाई महाराज यांच्या अभंगावर दिली.शास्त्री महाराजांनी ‘संतकृपा झाली, इमारत फळा आली ज्ञानदेव रचिला पाया। उभारीला देवालया। जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत ज्ञानदेव रचिला पाया। नामात याच्या किकिर त्याने केला विस्तार ज्ञानदेव रचिला पाया। हा बहिणाबाई महाराज याचा अभंग सेवेसाठी घेतला. शास्त्री महाराज पुढे म्हणाले, ज्ञानोबारायांनी सामाजिक समरसतेचा पाया घातला. त्यांनी कान्होपात्रा, गोरोबा कुंभार, चोखामेळा, संत सेना महाराज, सावता महाराज असे सर्व समाजाचे संत वाळवंटात एकत्र करून खºया अर्थाने पाया रचला. वारकरी धर्माचा प्रचार नामदेव महाराज यांनी केला. बहिणाबाई महाराज म्हणतात, ज्ञानदेव महाराज यांनी पाया रचला तर याचा कळस तुकाराम महाराज यांनी केला. भूतलावावर जेवढे जीव आसतील त्यावर निरपेक्ष प्रेम करा, असे शास्त्री महाराज यांनी सांगितले.याप्रसंगी बहिणाबाई महाराज संस्थानचे अध्यक्ष मधुसूदन महाराज, मोगल बाळासाहेब दाणे, संपत आहेर, भास्कर दाणे, मच्छिंद्र गुडघे, बाळासाहेब थोरात, गोपीनाथ दाणे, ज्ञानेश्वर काळे, अर्जुन दाणे, विनायक थोरात, रवींद्र दाणे, राजेंद्र दाणे, नवनाथ दाणे रखमा दाणे, सुनील गुडघे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. सप्ताहाला ग्रामस्थांनी उपस्थितराहून कीर्तनाचा आनंद घ्यावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.औरंगाबाद जिल्ह्यातील भाविकांचा समावेशबहिणाबाई महाराज यांचा सप्ताह मधुसूधन महाराज मोगल यांनी ३९ वर्षांपूर्वी सुरू केला आहे. देवदरी येथे दररोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत महाप्रसादाचे वाटप करण्यात येत आहे. दोन ट्रॉली बाजरीच्या भाकरी व आमटी प्रसाद म्हणून देण्यात येत आहे. येथे ममदापूर, खरवंडी, देवदरी, राजापूर, कोळगाव, भारम, वाघाळा, रेडाळा, सोमठाण जोश या गावातील तसेच औरंगाबाद जिल्ह्यातील भाविक ज्ञानामृताचा लाभ घेत आहेत.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रम