शहरं
Join us  
Trending Stories
1
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
2
Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर केला गोळीबार, २ जण जखमी
3
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
4
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
5
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?
6
बापरे! सासू अन् जावयानंतर आता विवाहित महिला १५ वर्षाच्या मुलासोबत फरार, प्रकरण काय?
7
सोन्यानं पार केला १ लाखांचा टप्पा, शक्ती कपूरनं ३५ वर्षांपूर्वीच केलेली भविष्यवाणी; व्हिडीओ व्हायरल
8
'२३७ जागा मिळल्याचा माज करू नका, शिंदेंमुळे त्या मिळाल्या', शिवसेना आमदार कदमांचा अतुल सावेंवर पलटवार
9
रतन टाटांच्या आवडत्या कंपनीला मोठा धक्का? मार्केट कॅप २००९ नंतर पहिल्यांदाच नीचांकी पातळीवर
10
सोनं १ लाखांपार, का उदय कोटक यांनी भारतीय महिलांना जगातील सर्वोत्तम फंड मॅनेजर म्हटलं?
11
डॉ. शिरीष वळसंगकरांनी काही दिवसांपूर्वीच बनवलं होतं मृत्यूपत्र; धक्कादायक माहिती उघड
12
'या' ज्येष्ठ नागरिकांना आयकरात मिळते ५ लाखांची सवलत; आयटीआर भरण्याची प्रक्रिया जाणून घ्या
13
वहिनीच्या बेडरूममधून येत होते चित्रविचित्र आवाज, दिराला आला संशय, दरवाजा उघडताच... 
14
छत्रपती संभाजीनगरच्या 'तेजस्वी'चे यूपीएससीत झळाळते यश; तिसऱ्याच प्रयत्नात ९९ वी रँक
15
राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाले...
16
Astro Tips: अनेक जोडप्यांची इच्छा असूनही त्यांना संतती सौख्य लाभत नाही, असे का? जाणून घ्या!
17
UPSC परीक्षेचा निकाल जाहीर; पुण्याचा अर्चित डोंगरे देशात तिसरा, प्रयागराजची शक्ती दुबे पहिल्या स्थानी
18
९ दिवसांत ३ शहरं! "व्हायरल झालो, आमच्याच बातम्या सर्वत्र"; जावयासह पळून गेलेली सासू म्हणाली...
19
Maharashtra Politics :'उद्धव ठाकरे युतीसाठी कमालीचे सकारात्मक, कटुता नाही'; संजय राऊतांनी एकत्र येण्याबाबत पुन्हा दिले संकेत
20
१००-२०० नाही तर ट्रम्प यांनी थेट ३५२१% लावलं टॅरिफ, पण भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर बनले रॉकेट

‘कळसुबाई’चा हरविलेला रानगवा पुन्हा गवसला...!

By अझहर शेख | Updated: October 28, 2021 01:00 IST

वन्यजीव विभागाच्या नियंत्रणाखाली असलेल्या कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यात तीन ते चार वर्षांपूर्वी रानगवा अधूनमधून स्थानिकांच्या नजरेस पडत होता; मात्र कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून तो अभयारण्यातून गायबच झाला होता. मंगळवारी (दि.२७) दुपारच्या सुमारास रानगव्याने स्थानिक युवकासह वन्यजीव विभागाच्या कर्मचाऱ्यांना घाटघरच्या गवती कुरणामध्ये दर्शन दिले.

ठळक मुद्देवन्यजीव विभाग सतर्क : घाटघरजवळील गवताळ कुरणामध्ये घडले दर्शन

नाशिक : वन्यजीव विभागाच्या नियंत्रणाखाली असलेल्या कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यात तीन ते चार वर्षांपूर्वी रानगवा अधूनमधून स्थानिकांच्या नजरेस पडत होता; मात्र कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून तो अभयारण्यातून गायबच झाला होता. मंगळवारी (दि.२७) दुपारच्या सुमारास रानगव्याने स्थानिक युवकासह वन्यजीव विभागाच्या कर्मचाऱ्यांना घाटघरच्या गवती कुरणामध्ये दर्शन दिले.

कळसुबाई-हरिश्चंद्रगड वन्यजीव अभयारण्यामध्ये पुन्हा रानगवा ऐन दीपावलीच्या तोंडावर परतल्याने आनंदाचे वातावरण पसरले आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या सुरुवातीला रानगव्याच्या हालचाली अभयारण्यातील राजूर वनपरिक्षेत्रात तसेच भंडारदरा वनपरिक्षेत्रात पाहावयास मिळत होत्या; मात्र कोरोनापासून रानगव्याच्या अस्तित्वाच्या खुणा फारशा कोठेही दिसल्या नाहीत; मात्र मंगळवारी संपूर्ण वाढ झालेला व अंदाजे तीन ते चार वर्षे वयाचा रानगवा (नर) घाटगर वनपरिमंडळातील जंगलात दिसल्याचे वनक्षेत्रपाल अमोल आडे यांनी सांगितले. घाटघर परिसरातील रहिवासी युवक विजय गांगड याने सर्वप्रथम गव्याला बघितले आणि तातडीने त्याच्याजवळील मोबाइलमध्ये छायाचित्रे टिपली. वनमजुराला विजयने कळविताच भंडारदरा वनक्षेत्रपाल कार्यालयातून गस्ती पथक घाटघरच्या दिशेने रवाना झाले. यावेळी वनरक्षक महेंद्र पाटील यांनाही वाटेत रानगव्याने दर्शन दिले. रानगवा असल्याची खात्री पटल्यानंतर तत्काळ सहायक वनसंरक्षक गणेश रणदिवे, अमोल आडे, रवींद्र सोनार आदींनी स्थानिक गावकऱ्यांसह टेंट कॅम्पेनिंग करणाऱ्या युवकांची बुधवारी (दि.२८) बैठक बोलविली. बैठकीत रानगवा संवर्धनासह सुरक्षिततेच्या दृष्टीने घ्यावयाच्या खबरदारीबाबत विविध सूचना रणदिवे यांनी दिल्या आहेत.

--इन्फो--

रानगव्यासाठी पोषक वातावरण

अभयारण्य क्षेत्रात रानगव्याकरिता पोषक असा अधिवास उपलब्ध झाला आहे. अभयारण्यामधील इकोसिटी घाटघर, उडदावणे, पांजरे, रतनवाडी या भागात चारादेखील चांगला वाढला आहे. तसेच साम्रद, रतनवाडी, पांजरे भागात बेर या स्थानिक गवताच्या प्रजातीसह पवण्या, मारवेल या गवताच्या प्रजातींचीही लागवड यावर्षी वन्यजीव विभागाने केली आहे. पावसाळ्यात गवत वाढले आहे. अभयारण्यात रानगव्यासाठी चारा व उत्तम निवारा तयार झाला आहे. त्यामुळे रानगवा या भागात आता कधीपर्यंत मुक्काम ठोकतो, याकडे भंडारदरा-राजूर वनपरिक्षेत्रातील वन्यजीव विभागाच्या वनअधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी लक्ष केंद्रित केले आहे.

--कोट--

अभयारण्य क्षेत्रातील भंडारदरा रेंजमधील सर्व गावांतील सरपंच, ग्रामपरिस्थितीकीय विकास समितीचे पदाधिकारी तसेच तंबू कॅम्पेनिंग करणारे युवक यांची संयुक्त बैठक घेतली आहे. रानगव्याबाबत त्यांना कल्पना देण्यात आली आहे. हा वन्यप्राणी कुठल्याही प्रकारे मनुष्यासाठी उपद्रवी नाही, त्यामुळे कोणीही घाबरून जाण्याचे कारण नाही. रानगवा अभयारण्यात येणे हे शुभवर्तमान आहे. गवा कोणालाही दिसल्यास त्याला कुठलाही त्रास देऊ नये.

- गणेश रणदिवे, सहायक वनसंरक्षक

टॅग्स :Nashikनाशिकforest departmentवनविभाग