शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
3
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
4
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
5
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
6
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
7
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
8
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
9
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
10
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
11
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
12
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
13
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
14
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
16
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
17
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
18
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
19
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
20
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका

गोदाकाठच्या शेतकऱ्यांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2020 18:28 IST

चांदोरी : नाशिक जिल्ह्यासह अहमदनगर तसेच मराठवाड्यातील जिल्ह्याची जीवनदायनी असलेली गोदावरी नदीचे पात्र दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्यामुळे चांदोरी परिसरातील शेतकऱ्यांच्या शेताचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

ठळक मुद्देमाती वाहून गेल्याने गोदेचे पात्र रु ंदावले

चांदोरी : नाशिक जिल्ह्यासह अहमदनगर तसेच मराठवाड्यातील जिल्ह्याची जीवनदायनी असलेली गोदावरी नदीचे पात्र दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्यामुळे चांदोरी परिसरातील शेतकऱ्यांच्या शेताचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.बारामाही म्हणून ओळखली जाणाºया गोदावरी नदीचे पात्र दिवसेंदिवस वाढत चालले असल्याचे अनेक स्थानिक नागरिक व अभ्यासक सांगत आहे. तसेच या नदीपात्र वाढीमुळे नदीकाठी असलेल्या शेतजमिनी तसेच नदीकाठी असलेल्या गावांना व वस्त्यांना धोका निर्माण झाला आहे.तसेच त्र्यंबकेश्वर, इगतपुरी या धरण क्षेत्रात जोरदार पाऊस होत असतो या मुळे दारणा व गंगापूर या धरणातून मोठया प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जातो. त्यामुळे गोदावरी दुथडी भरून वाहते. तर काही वेळा पुर सदृश्य स्थिती निर्माण होते. व पाणी पात्राच्या बाहेर पडते व या मुळे नदीकाठावरील असलेल्या शेत जमिनीतील मातीचे सखलन होते असे अनेक वर्षापासून सुरू आहे.आॅगस्ट २०१९ वर्षी गंगापूरसह दारणाधरण समूहातून करण्यात येणाºया पाण्याच्या विसर्गामुळे चांदोरीस पुराचा विळखा बसला होता. महापुराने पिके गेली शिवाय जोरदार प्रवाहामुळे नदीच्या दोन्ही काठाची मोठ्याप्रमाणात झीज झाली आहे. मळीचा भाग वाहून गेल्याने शेतकºयांचे नुसकान झाले आहे. शेतकºयांची एकूण शेती क्षेत्रात असलेली मोजणी व प्रत्यक्ष क्षेत्र यांचा मेळ घालणे कठीण होत चालले आहे. शिवाय माती वाहून गेल्याने पिकांचेही क्षेत्र घटले आहे.गोदावरी नदीस येणाºया पुरामुळे पिकांच्या नुसकानी बरोबरच सुपीक शेती योग्य माती वाहून जाते. मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक कचरा राहतो. पुन्हा क्षेत्र तयार करण्यास वेळे लागतो. व खर्चही वाढतो अशी प्रतिक्रि या शेतकरी व्यक्त करत आहे.काय उपाय करता येऊ शकतासायखेडा-चांदोरी येथे गोदावरी नदीला वळण आहे यामुळे पुरस्थितीत नदीचे पाणी थेट गावात व नदी काठालगतच्या वस्त्यात शिरते व तसेच पुर पाण्याने शेत जमिनीचे सखलन होत असलेल्या ज्या ठिकाणी सखलन होण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यासाठी नदी पात्राला संरक्षक भिंत बांधावी. 

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती