शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?
2
“२६३३ दिवस अध्यक्ष, ७ वर्षांत एकही सुट्टी घेतली नाही, एक पाऊल मागे घेतोय, पण...”: जयंत पाटील
3
चार पॅराशूटच्या मदतीने यान समुद्रात उतरले, भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुखरूप परतले
4
1 कोटी Facebook अकाउंट्स ब्लॉक, Meta ने का केली इतकी मोठी कारवाई?
5
रोनाल्डोचा फॅन; सिराजनं बॅटिंग केली छान! पण फुटबॉल 'स्कील' जमलं नाही अन् चेंडू थेट... (VIDEO)
6
भारतीय लष्कराच्या मानहानी प्रकरणात राहुल गांधी लखनौ न्यायालयात सरेंडर, तत्काळ मिळाला जामीन; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
छांगूर बाबाच्या बेनामी मालमत्तेवर ED ची कारवाई; पुण्यात आढळली २०० कोटी रुपयांची जमीन
8
Arijit Singh: गायक अरिजीत सिंहची नवी इनिंग, 'या' सिनेमातून करणार दिग्दर्शनात पदार्पण
9
उद्धव ठाकरेंपाठोपाठ शरद पवारांनाही धक्का! भाजपामध्ये 'इनकमिंग' सुरूच; अनेकांचा पक्षप्रवेश
10
ऑलिम्पिक क्रिकेटसाठी केवळ ६ संघांना संधी, कशी ठरणार पात्रता, कोण घेणार निर्णय? नीट समजून घ्या
11
शाळा सोडली, स्वप्न थांबली, पण हार नाही मानली; आव्हानांना तोंड देत पार पाडतेय कर्तव्य
12
धक्कादायक! 'पंचायत' फेम आसिफ खानला हृदयविकाराचा झटका, म्हणाला- "एका क्षणात सगळं बदललं..."
13
एक कोटी रुपये कमाई, तरीही तो दु:खी, सोशल मीडियावर मांडली व्यथा, म्हणाला, पैसा आहे पण...   
14
५ लाखांपर्यंतचे उपचार मोफत! आयुष्मान कार्ड अंतर्गत नेमके कोणते आजार येतात? लगेच तपासा!
15
शुभांशू शुक्ला परतले, पंतप्रधान मोदींनी स्वागत केले; गगनयान मोहिमेचा उल्लेख करत म्हणाले...
16
Astro Tips: सगळं काही चांगलं आहे, तरी लग्न होत नाही; याला कारणीभूत ठरू शकते ग्रहदशा!
17
Olympics 2028: ऑलिंम्पिकचं वेळापत्रक जाहीर! कधी, कुठं रंगणार क्रिकेट सामने? A टू Z माहिती
18
फक्त २० रुपयांमध्ये २ लाखांचा विमा! मोदी सरकारची 'ही' योजना संकटात बनेल आधार! कसा करायचा अर्ज?
19
"मराठी माणसानेच मराठी भाषेचं नुकसान केलं...", आपल्याच भाषेबद्दल हे काय बोलून गेला आस्ताद काळे? भडकले चाहते
20
"खाण्यासाठीच कमावतोय..."; मॅनेजरने लंच ब्रेक घेण्यापासून रोखलं, कर्मचाऱ्याने सडेतोड उत्तर दिलं

जळगाव जिल्ह्यासाठी पाणी सोडण्याचा डाव हाणून पाडू

By admin | Updated: November 16, 2015 22:10 IST

राष्ट्रवादी कॉँग्रेस : गिरणा-मोसम खोऱ्यावर अन्याय

मालेगाव : गिरणा-मोसम खोऱ्यात अत्यल्प पावसामुळे पिण्याबरोबर सिंचनाचा पाणीप्रश्न बिकट बनला असून, कसमादेसह परिसरातील गावांना पाणीटंचाईची झळ जाणवत आहे. मात्र या वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करत शासनाने जळगाव जिल्ह्यासाठी चणकापूर, पूनंद, केळझर व हरणबारी धरणांतून गिरणा धरणात पाणी सोडण्याचा डाव रचला आहे. हा निर्णय कुठल्याही परिस्थितीत हाणून पाडला जाईल, अशी भूमिका राष्ट्रवादी कॉँग्रेसने घेतली आहे. प्रसंगी जनआंदोलन उभारण्यात येईल असाही इशारा पक्षातर्फे देण्यात शासनाला आला आहे.पालकमंत्री व महसूलमंत्री जळगाव जिल्ह्यातील असल्यानेच हा निर्णय शासनातर्फे घेतला जाणार असला तरी कसमादे भागातील जनता हक्काचे एक थेंब पाणी गिरणा धरणात जाऊ देणार नाही. मुंबई येथील महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण कार्यालयात गिरणा उपखोऱ्यातील लोकप्रतिनिधींची बैठक झाली. त्यात चाळीसगावचे आमदार उन्मेश पाटील यांनी गिरणा धरणातून पाण्याचे नियोजन व व्यवस्थापन करून समान पाणीवाटपाचे तत्त्व अंमलात आणावे, असे निवेदनाद्वारे सूचित केले होते. मात्र प्राधिकरणाने निवेदनास याचिका समजत यासंदर्भात मुंबईत सुनावणी आयोजित केली होती.पालकमंत्री हे नाशिक जिल्ह्याचे असले तरी ते कसमादे भागातील पाणीटंचाईवर दुर्लक्ष करून जळगावचाच विचार करत असल्याचे या प्रकरणावरून सिद्ध झाले असल्याची टीका पवार यांनी केली.गिरणा व मोसम खोऱ्यात १० वर्षांपासून पर्जन्याचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे सिंचन व पिण्याच्या पाणीप्रश्न दिवसागणिक बिकट होत चालला आहे. उपलब्ध पाणीसाठ्याचे जुलै २०१६ पर्यंत नियोजन झाले आहे. अशातच जर चणकापूर, केळझर, पूनंद व हरणभारी धरणांतून जळगावसाठी पाणी सोडल्यास कसमादे भागात पाणीटंचाईचे संकट उभे राहणार असल्याचे स्पष्ट आहे, असे राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते डॉ. जयंत पवार यांनी कळविले आहे. (प्रतिनिधी)