शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यासाठी पाणी सोडण्याचा डाव हाणून पाडू

By admin | Updated: November 16, 2015 22:10 IST

राष्ट्रवादी कॉँग्रेस : गिरणा-मोसम खोऱ्यावर अन्याय

मालेगाव : गिरणा-मोसम खोऱ्यात अत्यल्प पावसामुळे पिण्याबरोबर सिंचनाचा पाणीप्रश्न बिकट बनला असून, कसमादेसह परिसरातील गावांना पाणीटंचाईची झळ जाणवत आहे. मात्र या वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करत शासनाने जळगाव जिल्ह्यासाठी चणकापूर, पूनंद, केळझर व हरणबारी धरणांतून गिरणा धरणात पाणी सोडण्याचा डाव रचला आहे. हा निर्णय कुठल्याही परिस्थितीत हाणून पाडला जाईल, अशी भूमिका राष्ट्रवादी कॉँग्रेसने घेतली आहे. प्रसंगी जनआंदोलन उभारण्यात येईल असाही इशारा पक्षातर्फे देण्यात शासनाला आला आहे.पालकमंत्री व महसूलमंत्री जळगाव जिल्ह्यातील असल्यानेच हा निर्णय शासनातर्फे घेतला जाणार असला तरी कसमादे भागातील जनता हक्काचे एक थेंब पाणी गिरणा धरणात जाऊ देणार नाही. मुंबई येथील महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण कार्यालयात गिरणा उपखोऱ्यातील लोकप्रतिनिधींची बैठक झाली. त्यात चाळीसगावचे आमदार उन्मेश पाटील यांनी गिरणा धरणातून पाण्याचे नियोजन व व्यवस्थापन करून समान पाणीवाटपाचे तत्त्व अंमलात आणावे, असे निवेदनाद्वारे सूचित केले होते. मात्र प्राधिकरणाने निवेदनास याचिका समजत यासंदर्भात मुंबईत सुनावणी आयोजित केली होती.पालकमंत्री हे नाशिक जिल्ह्याचे असले तरी ते कसमादे भागातील पाणीटंचाईवर दुर्लक्ष करून जळगावचाच विचार करत असल्याचे या प्रकरणावरून सिद्ध झाले असल्याची टीका पवार यांनी केली.गिरणा व मोसम खोऱ्यात १० वर्षांपासून पर्जन्याचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे सिंचन व पिण्याच्या पाणीप्रश्न दिवसागणिक बिकट होत चालला आहे. उपलब्ध पाणीसाठ्याचे जुलै २०१६ पर्यंत नियोजन झाले आहे. अशातच जर चणकापूर, केळझर, पूनंद व हरणभारी धरणांतून जळगावसाठी पाणी सोडल्यास कसमादे भागात पाणीटंचाईचे संकट उभे राहणार असल्याचे स्पष्ट आहे, असे राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते डॉ. जयंत पवार यांनी कळविले आहे. (प्रतिनिधी)