शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
काय आहे 'सर क्रिक' वाद? ज्यावरून भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची पाकिस्तानला थेट धमकी
3
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
4
भारत गाझामध्ये सैन्य पाठवणार? संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांची परिषद बोलावली, चीन आणि पाकिस्तानला बोलावले नाही
5
IND vs WI: वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात शुभमन गिलच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद!
6
Archana Puran Singh : एकेकाळी जेवणासाठी अभिनेत्रीकडे होते फक्त ११ रुपये; संघर्षाचे दिवस आठवून झाली भावुक
7
IND vs WI : DSP सिराजची 'दबंगगिरी'! कमबॅकमध्ये दिग्गज स्टारच्या पोराच्या पदरी 'भोपळा'
8
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
9
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
10
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम
11
एलन मस्क बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! संपत्ती ५०० बिलियन डॉलरवर, इतकी कमाई आली कोठून?
12
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
13
Success Story: १९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
14
वडील करणार होते पाचव्यांदा लग्न; संपत्तीसाठी लेकाने काढला काटा, पोलिसांची केली दिशाभूल अन्...
15
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
16
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
17
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
18
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
19
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
20
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली

जळगाव जिल्ह्यासाठी पाणी सोडण्याचा डाव हाणून पाडू

By admin | Updated: November 16, 2015 22:10 IST

राष्ट्रवादी कॉँग्रेस : गिरणा-मोसम खोऱ्यावर अन्याय

मालेगाव : गिरणा-मोसम खोऱ्यात अत्यल्प पावसामुळे पिण्याबरोबर सिंचनाचा पाणीप्रश्न बिकट बनला असून, कसमादेसह परिसरातील गावांना पाणीटंचाईची झळ जाणवत आहे. मात्र या वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करत शासनाने जळगाव जिल्ह्यासाठी चणकापूर, पूनंद, केळझर व हरणबारी धरणांतून गिरणा धरणात पाणी सोडण्याचा डाव रचला आहे. हा निर्णय कुठल्याही परिस्थितीत हाणून पाडला जाईल, अशी भूमिका राष्ट्रवादी कॉँग्रेसने घेतली आहे. प्रसंगी जनआंदोलन उभारण्यात येईल असाही इशारा पक्षातर्फे देण्यात शासनाला आला आहे.पालकमंत्री व महसूलमंत्री जळगाव जिल्ह्यातील असल्यानेच हा निर्णय शासनातर्फे घेतला जाणार असला तरी कसमादे भागातील जनता हक्काचे एक थेंब पाणी गिरणा धरणात जाऊ देणार नाही. मुंबई येथील महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण कार्यालयात गिरणा उपखोऱ्यातील लोकप्रतिनिधींची बैठक झाली. त्यात चाळीसगावचे आमदार उन्मेश पाटील यांनी गिरणा धरणातून पाण्याचे नियोजन व व्यवस्थापन करून समान पाणीवाटपाचे तत्त्व अंमलात आणावे, असे निवेदनाद्वारे सूचित केले होते. मात्र प्राधिकरणाने निवेदनास याचिका समजत यासंदर्भात मुंबईत सुनावणी आयोजित केली होती.पालकमंत्री हे नाशिक जिल्ह्याचे असले तरी ते कसमादे भागातील पाणीटंचाईवर दुर्लक्ष करून जळगावचाच विचार करत असल्याचे या प्रकरणावरून सिद्ध झाले असल्याची टीका पवार यांनी केली.गिरणा व मोसम खोऱ्यात १० वर्षांपासून पर्जन्याचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे सिंचन व पिण्याच्या पाणीप्रश्न दिवसागणिक बिकट होत चालला आहे. उपलब्ध पाणीसाठ्याचे जुलै २०१६ पर्यंत नियोजन झाले आहे. अशातच जर चणकापूर, केळझर, पूनंद व हरणभारी धरणांतून जळगावसाठी पाणी सोडल्यास कसमादे भागात पाणीटंचाईचे संकट उभे राहणार असल्याचे स्पष्ट आहे, असे राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते डॉ. जयंत पवार यांनी कळविले आहे. (प्रतिनिधी)