शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

हजारो लिटर पाण्याची नासाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2016 22:25 IST

सोळा गाव पाणी योजनेला गळती : टंचाई काळात होणाऱ्या अपव्ययाने नागरिक संतप्त

नितीन गायकवाड विंचूरगेल्या महिन्याभरापूर्वी हंडाभर पाण्यासाठी टँकरची वाट पाहणाऱ्या येथील नागरिकांवर आता सोळा गाव पाणी योजनेचे शुद्धीकरण झालेले पाणी रस्त्यावरून वाहतानाचे चित्र पाहण्याची वेळ आली आहे. तोंडचे पाणी पळाल्याशिवाय शहाणपण येत नाही, असं म्हटलं जातं. मात्र, यंदा उन्हाळ्याच्या प्रारंभीच भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागलेले असतानाही आठ दिवसांपासून शुद्धीकरण झालेल्या हजारो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. नाशिक-औरंगाबाद महामार्गावर पाणीच पाणी झाल्याने दुचाकी घसरून अपघात होत असून, सोळा गाव पाणीपुरवठा योजनेची गळती तत्काळ थांबवावी, अशी जोरदार मागणी नागरिकांनी केली आहे.नांदूरमधमेश्वर धरणातून सोळा गाव योजनेद्वारे पाणीपुरवठा केला जातो. लासलगावकडे जाणाऱ्या जलवाहिनीला येथील जिल्हा परिषदेच्या शाळेसमोर मोठी गळती लागली असून, गेल्या आठ दिवसांपासून रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे. सततच्या वाहत्या पाण्यामुळे रस्त्याच्या मधोमध मोठमोठे खड्डे तयार झाले असून, या खड्ड्यात पाणी साचत असून, तुंबलेले पाणी महामार्गावरून वाहत आहे. नाशिक - औरंगाबाद महामार्गावर चालकांना रस्त्यावरील पाण्यामुळे वाहन घसरायला नको म्हणून कसरत करावी लागत आहे. जुनाट गळती असल्याने महामार्गाची वाट लागली आहे.पाणी साचल्याने वाहन खड्ड्यातून गेल्यास पादचाऱ्याच्या अंगावर पाणी उडत आहे. काही अंतरावरच वळण असल्याने वाहनधारकांची पाणी अन् त्यातील खड्ड्यांमुळे चांगलीच भंबेरी उडत आहे. काही दिवसांनंतर गळतीची समस्या जैसे थे असल्याने त्यावर उपाय म्हणून काम करण्यात आले. मात्र गेल्या आठ दिवसांपासून येथे गळती सुरू झाली आहे.ऐन उन्हाळ्यात सर्वत्र पाणी टंचाईचे सावट असतानाही रसत्यावरु न वाहणा-या पाण्याकडे पाहून स्थानिक तसेच प्रवासी वर्गाकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. जलवाहिनीचे लिकेज गेल्या अनेक वर्षांपासून असूनही त्यावर कायमस्वरु पी तोडगा न काढल्याने दर दोन तीन मिहन्यानंतर हजारो लिटर शुद्धीकरण झालेल्या पाण्याचा अपव्यय होत असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.