शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावतीच्या धारणी तालुक्यात भूकंपाचा सौम्य धक्का; ३.८ रिक्टर स्केलची नोंद
2
"शब्दच नाही, अस्वस्थ झालोय..." ; चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेवर विराट कोहली भावूक
3
"माझी जगायची इच्छा संपली..."; आयटी अभियंता तरुणीने २१व्या मजल्यावरून मारली उडी
4
कराड-लातूर एसटी बस उलटली, १७ प्रवाशी जखमी; ५३ जण सुखरुप, लातूर-मुरुड मार्गावरील घटना
5
"तामिळ माझं जीवन, माझं अस्तित्व..."; मी माफी मागणार नाही, 'त्या' विधानावर कमल हासन ठाम
6
"३५ हजार क्षमता, ३ लाख लोक आले...": चेंगराचेंगरीच्या घटनेवर कर्नाटकचे मुख्यमंत्री काय बोलले?
7
स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरीत लोकांचा जीव गेला, आतमध्ये १० मिनिटांत RCB खेळाडूंचा सत्कार उरकला
8
IPL चॅम्पियन्सना बघण्याच्या नादात रक्त सांडलं! RCB च्या विजयी मिरवणुकीदरम्यान नेमकं काय घडलं? VIDEO
9
चायनामन प्रेमात पडला अन् गुपचूप साखरपुडा उरकला; कुलदीप यादवची होणारी पत्नी LIC कर्मचारी...  
10
Video: अख्ख बंगळुरू 'हाऊसफुल', मेट्रो स्टेशनवर प्रचंड गर्दी; पाय ठेवायलाही जागा नाही
11
Bengaluru stampede: बंगळुरू चेंगराचेंगरीत आरसीबीच्या चाहत्यांचा मृत्यू, पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक
12
Bengaluru Stampede: आरसीबीच्या विजयी मिरवणुकीदरम्यान बंगळुरूत चेंगराचेंगरी; ११ जण ठार, ३३ जखमी!
13
₹350 पार जाणार अंबानींचा हा शेअर! कंपनीनं नव्या उद्योगात केलीय 'एंट्री'
14
Mumbai Fire: शॉर्ट सर्किटमुळे झेप्टोच्या गोदामात भीषण आग, सर्व सामान जळून खाक! 
15
एकतर्फी प्रेमात वेडसर झाला युवक; युवतीच्या हत्येनंतर प्रायव्हेट पार्टसह शरीरावर ४५ चाकूचे वार
16
कुटुंबासह अयोध्येत पोहोचले इलॉन मस्क यांचे वडील, प्रभू श्रीराम यांच्या नावानं दुमदुमलं विमानतळ
17
याला म्हणतात परतावा...! शत्रूंचे ड्रोन पाडणारी 'सिस्टिम' तयार करते ही कंपनी, एका महिन्यात ६१% नं वाढला शेअर; ५ वर्षांत दिला ५१५३% परतावा
18
आणखी एक पुरावा; 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये ठार झालेल्या २१ दहशतवाद्यांच्या कबरीचे फोटो समोर
19
"हे देशद्रोहापेक्षा कमी नाही..."; राहुल गांधींवर का संतापले भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा?
20
वयाच्या ५७ व्या वर्षी अरबाज खान होणार बाबा! पत्नी शूरा प्रेग्नंट, बेबी बंपने वेधलं लक्ष

हजारो लिटर पाण्याची नासाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2016 22:25 IST

सोळा गाव पाणी योजनेला गळती : टंचाई काळात होणाऱ्या अपव्ययाने नागरिक संतप्त

नितीन गायकवाड विंचूरगेल्या महिन्याभरापूर्वी हंडाभर पाण्यासाठी टँकरची वाट पाहणाऱ्या येथील नागरिकांवर आता सोळा गाव पाणी योजनेचे शुद्धीकरण झालेले पाणी रस्त्यावरून वाहतानाचे चित्र पाहण्याची वेळ आली आहे. तोंडचे पाणी पळाल्याशिवाय शहाणपण येत नाही, असं म्हटलं जातं. मात्र, यंदा उन्हाळ्याच्या प्रारंभीच भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागलेले असतानाही आठ दिवसांपासून शुद्धीकरण झालेल्या हजारो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. नाशिक-औरंगाबाद महामार्गावर पाणीच पाणी झाल्याने दुचाकी घसरून अपघात होत असून, सोळा गाव पाणीपुरवठा योजनेची गळती तत्काळ थांबवावी, अशी जोरदार मागणी नागरिकांनी केली आहे.नांदूरमधमेश्वर धरणातून सोळा गाव योजनेद्वारे पाणीपुरवठा केला जातो. लासलगावकडे जाणाऱ्या जलवाहिनीला येथील जिल्हा परिषदेच्या शाळेसमोर मोठी गळती लागली असून, गेल्या आठ दिवसांपासून रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे. सततच्या वाहत्या पाण्यामुळे रस्त्याच्या मधोमध मोठमोठे खड्डे तयार झाले असून, या खड्ड्यात पाणी साचत असून, तुंबलेले पाणी महामार्गावरून वाहत आहे. नाशिक - औरंगाबाद महामार्गावर चालकांना रस्त्यावरील पाण्यामुळे वाहन घसरायला नको म्हणून कसरत करावी लागत आहे. जुनाट गळती असल्याने महामार्गाची वाट लागली आहे.पाणी साचल्याने वाहन खड्ड्यातून गेल्यास पादचाऱ्याच्या अंगावर पाणी उडत आहे. काही अंतरावरच वळण असल्याने वाहनधारकांची पाणी अन् त्यातील खड्ड्यांमुळे चांगलीच भंबेरी उडत आहे. काही दिवसांनंतर गळतीची समस्या जैसे थे असल्याने त्यावर उपाय म्हणून काम करण्यात आले. मात्र गेल्या आठ दिवसांपासून येथे गळती सुरू झाली आहे.ऐन उन्हाळ्यात सर्वत्र पाणी टंचाईचे सावट असतानाही रसत्यावरु न वाहणा-या पाण्याकडे पाहून स्थानिक तसेच प्रवासी वर्गाकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. जलवाहिनीचे लिकेज गेल्या अनेक वर्षांपासून असूनही त्यावर कायमस्वरु पी तोडगा न काढल्याने दर दोन तीन मिहन्यानंतर हजारो लिटर शुद्धीकरण झालेल्या पाण्याचा अपव्यय होत असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.