नितीन गायकवाड विंचूरगेल्या महिन्याभरापूर्वी हंडाभर पाण्यासाठी टँकरची वाट पाहणाऱ्या येथील नागरिकांवर आता सोळा गाव पाणी योजनेचे शुद्धीकरण झालेले पाणी रस्त्यावरून वाहतानाचे चित्र पाहण्याची वेळ आली आहे. तोंडचे पाणी पळाल्याशिवाय शहाणपण येत नाही, असं म्हटलं जातं. मात्र, यंदा उन्हाळ्याच्या प्रारंभीच भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागलेले असतानाही आठ दिवसांपासून शुद्धीकरण झालेल्या हजारो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. नाशिक-औरंगाबाद महामार्गावर पाणीच पाणी झाल्याने दुचाकी घसरून अपघात होत असून, सोळा गाव पाणीपुरवठा योजनेची गळती तत्काळ थांबवावी, अशी जोरदार मागणी नागरिकांनी केली आहे.नांदूरमधमेश्वर धरणातून सोळा गाव योजनेद्वारे पाणीपुरवठा केला जातो. लासलगावकडे जाणाऱ्या जलवाहिनीला येथील जिल्हा परिषदेच्या शाळेसमोर मोठी गळती लागली असून, गेल्या आठ दिवसांपासून रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे. सततच्या वाहत्या पाण्यामुळे रस्त्याच्या मधोमध मोठमोठे खड्डे तयार झाले असून, या खड्ड्यात पाणी साचत असून, तुंबलेले पाणी महामार्गावरून वाहत आहे. नाशिक - औरंगाबाद महामार्गावर चालकांना रस्त्यावरील पाण्यामुळे वाहन घसरायला नको म्हणून कसरत करावी लागत आहे. जुनाट गळती असल्याने महामार्गाची वाट लागली आहे.पाणी साचल्याने वाहन खड्ड्यातून गेल्यास पादचाऱ्याच्या अंगावर पाणी उडत आहे. काही अंतरावरच वळण असल्याने वाहनधारकांची पाणी अन् त्यातील खड्ड्यांमुळे चांगलीच भंबेरी उडत आहे. काही दिवसांनंतर गळतीची समस्या जैसे थे असल्याने त्यावर उपाय म्हणून काम करण्यात आले. मात्र गेल्या आठ दिवसांपासून येथे गळती सुरू झाली आहे.ऐन उन्हाळ्यात सर्वत्र पाणी टंचाईचे सावट असतानाही रसत्यावरु न वाहणा-या पाण्याकडे पाहून स्थानिक तसेच प्रवासी वर्गाकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. जलवाहिनीचे लिकेज गेल्या अनेक वर्षांपासून असूनही त्यावर कायमस्वरु पी तोडगा न काढल्याने दर दोन तीन मिहन्यानंतर हजारो लिटर शुद्धीकरण झालेल्या पाण्याचा अपव्यय होत असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
हजारो लिटर पाण्याची नासाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2016 22:25 IST