शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपासोबत युती तुटताच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचालींना वेग; बैठका सुरू
2
विश्वचषक विजेत्या श्रीलंकन कर्णधाराला अटक होणार; अर्जुन रणतुंगा पेट्रोलियम घोटाळ्याप्रकरणी अडचणीत
3
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८३,६५२ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीमचे डिटेल्स
4
Yamuna Expressway Accident: ७ बस, ३ कारचा थरकाप उडवणारा अपघात! चार प्रवाशांचा जळून मृत्यू
5
Stock Market Today: शेअर बाजाराच्या कामकाजाची मोठ्या घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ३०० तर निफ्टी १०० अंकांनी घसरला
6
महायुती तुटली! पुण्यात भाजपा-NCP वेगळे लढणार; अजित पवार म्हणाले, "मी माझं सर्वस्व..."
7
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
8
Plane Crash Mexico Video: इमर्जन्सी लँडिंगआधीच विमान कोसळले; भयंकर अपघातात १० जण ठार
9
TV खरेदीचा विचार करत असाल तर आत्ताच करा, जानेवारीपासून किंमत वाढवण्याची तयारी; कारण काय?
10
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
11
धनुर्मासारंभ: ९ राशींना शुभ काळ, सूर्यकृपेने दुप्पट लाभ; पद-पैसा वाढ, धनुसंक्रांती ठरेल खास!
12
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
13
कोट-पँट घालून फिरलात तर अटक अटळ! शिक्षा लेखी नाही, पण चाबकाचे फटकारे अन्...
14
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
15
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
16
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
17
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
18
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
19
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
20
शत्रूला दिसणारच नाही भारताचे लढाऊ विमान, जळगावच्या बहिणाबाई विद्यापीठाचे संशोधन
Daily Top 2Weekly Top 5

गिरीश कर्नाड  यांच्या निधनाने साहित्य, नाट्यक्षेत्राची मोठी हानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 01:37 IST

ज्येष्ठ साहित्यिक व नाटककार गिरीश कर्नाड यांचे निधन झाले. त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झाला होता. त्यांच्या निधनाने साहित्य आणि चित्रपट तसेच नाट्यक्षेत्राची मोठी हानी झाली आहे, अशी प्रतिक्रिया विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी व्यक्त केली आहे.

नाशिक : ज्येष्ठ साहित्यिक व नाटककार गिरीश कर्नाड यांचे निधन झाले. त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झाला होता. त्यांच्या निधनाने साहित्य आणि चित्रपट तसेच नाट्यक्षेत्राची मोठी हानी झाली आहे, अशी प्रतिक्रिया विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी व्यक्त केली आहे.गिरीश कर्नाड यांनी सातत्याने लोकशाही धर्मनिरपेक्षता, सामाजिक सलोखा याबाबतीमध्ये आग्रही भूमिका घेतली. त्यांच्या साहित्यामध्ये नाट्यकृतीमध्ये या मूल्यांचा पुरस्कार केलेला दिसतो. डाव्या चळवळीतर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो असे सीटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांनी म्हटले़गिरीश कर्नाड यांच्या जाण्याने मराठी भाषेसह अनेक भारतीय भाषेवर प्रभुत्व असलेला साहित्यिक आणि विचारवंत हरपला आहे. ते एक श्रेष्ठ नाटककार आणि दिग्दर्शक आहेत. हिंदी तसेच मराठी नाटक आणि चित्रपटात त्यांनी काम केले आहे. प्रायोगिक रंगभूमीला पुढे नेण्यात त्यांचा मोठा वाटा होता. भारतीय साहित्यातही त्यांनी मोलाची भर घातली आहे.- किशोर पाठक, ज्येष्ठ कवीप्रगल्भ विचारांचा रसिक आणि कलावंत म्हणून गिरीश कर्नाड यांचे भारतीय रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रात काम मोठे होते. तसेच भारतीय वाङ्मयात त्यांनी मोलाची भर घातली आहे. आपल्या लेखनातून आणि नाटकातून त्यांचे साहित्य सृष्टीत समीक्षकांनी कौतुक केले. त्यांच्या सामाजिक भूमिकेबद्दल तसेच नाटकांतील भूमिकेबद्दल सर्वांना आदर वाटत असे.- नरेश महाजन, ज्येष्ठ कवीज्येष्ठ नाटककार आणि दिग्दर्शक म्हणून नावलौकिक मिळविलेले गिरीश कर्नाड हे आपल्यात नाहीत. त्यांची उणीव भारतीय रंगभूमीला नेहमी भासत राहील. एक विलक्षण ताकदीचा नाटककार हरपला आहे. त्यांच्या भूमिका या काळजाला भिडणाऱ्या होत्या. तसेच त्याचे साहित्य वाचनीय होते. नाशिकला ज्ञानपीठ पुरस्कार सोहळ्याप्रसंगी त्यांचे भाषण गाजले होते़- जयप्रकाश जातेगावकर,नाट्य व्यावसायिकनाटककार, दिग्दर्शक, लेखक, कलावंत आणि विचारवंत अशा विविध पैलू असलेले गिरीश कर्नाड हे प्रभावी व्यक्तिमत्व होते. नाशिक येथे ज्ञानपीठ पुरस्कार सोहळ्याप्रसंगी त्यांनी मांडलेले अत्यंत परखड आणि तर्कशुद्ध विचार सर्वांना भावले. भारताला आताच्या स्थितीत त्यांच्या विचारांची गरज होती. त्यांच्या जाण्याने नाट्य व वाङ्मय क्षेत्राची हानी झाली आहे.- लोकेश शेवडे, माजी कार्यवाह कुसुमाग्रज प्रतिष्ठानज्येष्ठ लेखक भालचंद्र नेमाडे यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार प्रदान करण्यासाठी नाटककार गिरीश कर्नाड नाशिक येथे आले होते. भारतीय रंगभूमी समृद्ध करण्यात कर्नाड यांचा मोलाचा वाटा आहे. राजकीय व सामाजिक परिस्थितीचे त्यांना तीव्र भान होते. रंगभूमी आणि त्यासंबंधीचे सादरीकरण याची त्यांनी अभ्यासपूर्ण मांडणी केली होती.- विश्वास ठाकूर,यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान

टॅग्स :Girish Karnadगिरिश कर्नाडDeathमृत्यू