शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
6
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
7
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
8
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
9
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
10
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
11
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
12
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
13
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
14
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
15
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
16
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
17
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
18
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
19
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
20
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?

पावसामुळे पिकांची हानी

By admin | Updated: March 5, 2016 22:00 IST

कळवण : राष्ट्रवादी कॉँग्रेसचे निवेदन, नुकसानभरपाईची मागणी

 कळवण : शहर व तालुक्यासह जिल्ह्यात सुरू असलेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतमालाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. महसूल, कृषी विभागाने दिरंगाई न करता युद्धपातळीवर सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी व कृषिपंपांचे कनेक्शन तोडू नये, अशी मागणी कळवण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसने तहसीलदार अनिल पुरे यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असताना शेतकऱ्याने कर्ज काढून कशीबशी लागवड केली होती. मात्र काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने बळीराजाचे कंबरडेच मोडले आहे. पिकांवर तेल्या, प्लेग, मर, डावणी, भुरी, करपा आदि रोगांमुळे जिल्ह्यातील शेतकरी आधीच हतबल झाला आहे. त्यात अवकाळी पावसाने द्राक्ष, भात, टमाटा, डाळिंब, द्राक्ष आदि हातातोंडाशी आलेल्या पिकांचे प्रचंड नुकसान केले आहे. तसेच रब्बीची कांदा, गहू, हरबरा व भाजीपाला ही पिकेही उद्ध्वस्त झाली आहेत. नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी कॉँग्रसने एका निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, जिल्हा उपाध्यक्ष नारायण हिरे, जिल्हा परिषद सदस्य रवींद्र देवरे, जिल्हा बँक संचालक धनंजय पवार, कळवण नगरपंचायत गटनेते कौतिक पगार, तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, जिल्हा उपाध्यक्ष नारायण हिरे, जिल्हा परिषद सदस्य रवींद्र देवरे, जिल्हा बँक संचालक धनंजय पवार, गटनेते कौतिक पगार, राजेंद्र पवार, मजूर संघाचे संचालक हरिभाऊ वाघ , राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रवीण रौंदळ, नगरसेवक जयेश पगार, सुभाष शिरोरे, विठोबा पाटील विलास रौंदळ, रामा पाटील, सागर खैरनार, उमेश सोनवणे आदि उपस्थित होते.