शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
3
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
4
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
5
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
6
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
7
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
8
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
9
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
10
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
11
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
12
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
13
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
14
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
15
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
16
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
17
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी
18
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
19
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
20
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!

द्राक्ष बागायतदारांचे कोट्यवधींचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2020 22:38 IST

नाशिक : कोरोनामुळे देशभरात सुरू असलेल्या संचारबंदीचा सर्वाधिक फटका राज्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना बसला असून, राज्यभरात सुमारे अडीच ते ...

ठळक मुद्देउत्पादक संकटात : अडीच ते तीन लाख टन माल पडून

नाशिक : कोरोनामुळे देशभरात सुरू असलेल्या संचारबंदीचा सर्वाधिक फटका राज्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना बसला असून, राज्यभरात सुमारे अडीच ते तीन लाख टन माल पडून आहे. स्थानिक बाजारात सरासरी ३० रुपये किलोचा दर जरी गृहीत धरला तरी सुमारे ९०० कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.राज्यात नाशिक, सोलापूर, सांगली या जिल्ह्यांत प्रामुख्याने द्राक्ष पीक घेतले जाते. याशिवाय पुणे जिल्ह्याचा काही भाग आणि लातूर व उस्मानाबाद या जिल्ह्यात थोड्याफार प्रमाणात द्राक्ष पीक घेतले जाते. राज्यातील एकूण द्राक्ष उत्पादनात नाशिक जिल्ह्याचा सुमारे ८० टक्के वाटा आहे. जिल्हानिहाय थोडा मागेपुढे होत असला तरी राज्यात साधारणत: मे महिन्याच्या अखेरीपर्यंत द्राक्ष हंगाम सुरू असतो. दरवर्षी हे चक्र नियमित सुरू असते. यावर्षी मात्र त्यास खीळ बसली आहे.द्राक्ष हंगाम ऐन बहरात असताना कोरोनामुळे देशभरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले. अनेक शेतकºयांच्या बागेत माल असताना मजूर निघून गेले. माल वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला, यामुळे आज अनेकांचा माल शेतातच पडून आहे. याविषयी बोलताना सह्याद्री फार्म्स प्रोड्यूसर कंपनीचे तुषार जगताप म्हणाले, राज्यातील एकूण २५ ते ३० हजार एकर क्षेत्रावर अंदाजे अडीच ते तीन लाख टन माल तयार आहे, मात्र तो माल आज अडकून पडला आहे. माल काढला तरी त्याला दर मिळत नाही. खुल्या बाजारात ३० रुपये किलोचा दर मिळाला असतातरी सुमारे ९०० कोटींचे उत्पन्न शेतकºयांना मिळाले असते.द्राक्षाला ५ ते १0 रुपये प्रतिकिलो दरमानोरी : येवला तालुक्यासह सर्वत्र दीड महिन्यांपूर्वी निर्यातक्षम द्राक्षाला १०० ते १२५ रु पये प्रतिकिलो इतका उच्चांकी दर मिळत असल्याने शेतकºयांमध्ये आनंदाचे वातावरण असताना चीनमधून अन्य देशात प्रसार झालेल्या कोरोना व्हायरसचा परिणाम शेतमालाच्या दरावरदेखील पडू लागल्याने द्राक्ष आता सरासरी ५ ते १० रु पये प्रतिकिलो दराने विकली जात आहेत. अनेक ठिकाणी तर निर्यातक्षम द्राक्ष खरेदीला व्यापारीच मिळत नसल्याने हजारो हेक्टरवर असलेल्या द्राक्षबागा कोरोनामुळे धोक्यात आल्या असल्याचे दिसून येत असून, द्राक्ष उत्पादक शेतकºयांच्या चिंतेत मोठी भर पडली आहे. मागील १५ दिवसांपासून सर्वत्र लॉकडाउन परिस्थिती असल्याने द्राक्ष निर्यातीला फटका बसला असून, अद्यापही हजारो क्विंटल द्राक्ष तोडणीअभावी तसेच पडून असून, एक्स्पोर्ट द्राक्ष निर्मितीसाठी केलेला लाखो रु पयांचा खर्च वाया जाण्याची भीती शेतकºयांमध्ये निर्माण झाली आहे. परिसरातील आठवडे बाजारही ठरावीक वेळ सुरू राहत असून, काही ठिकाणी तर बंदच असल्याने हतबल झालेल्या शेतकºयांनी आपल्या शेतातच द्राक्ष विक्र ी सुरू केली आहे.निर्यात पूर्णपणे थांबलीमागील वर्षी सह्याद्री फार्म्स प्रोड्यूसर कंपनीने सुमारे १५०० कंटेनर द्राक्ष निर्यात केली होती. यावर्षी १२०० ते १३०० कंटेनर द्राक्ष निर्यातीचे उद्दिष्ट होते. त्यापैकी कंपनीने ८५० कंटेनर माल परदेशात पाठविला आहे. त्यानंतर कोरोनाचे संकट उभे रहिल्याने कंपनीची निर्यात पूर्णपणे थांबली आहे, अशी माहिती जगताप यांनी दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAgriculture Sectorशेती क्षेत्र