शहरं
Join us  
Trending Stories
1
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
2
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
3
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
4
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
5
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
6
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
7
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
8
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
9
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
10
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
11
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
12
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
13
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
14
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
15
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
16
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
17
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
18
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
19
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
20
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
Daily Top 2Weekly Top 5

आभाळ पडनं....ऐन दिवाळीमा लक्ष्मी गयी...आते आम्ही जगानं कसं.?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 13:30 IST

सटाणा : शेकडो शेतकऱ्यांनी लाखो रु पये खर्च करून पिकविलेल्या द्राक्ष पिकाचे शंभर ,सव्वाशे रु पयांनी सौदे झालेले .....डाळिंब देखील बांधावर शंभर रु पये किलोने विकले जात होते .मका ,बाजरी,सोयाबीन ,भात ,नागली ,भुईमुग काढणीवर आलेले पिक पाहून गेल्या तीन वर्षांपासून दुष्काळाच्या झळांनी होरपळणारा बळीराजा यंदा आपल्या कुटुंबात लक्ष्मी नांदेल आणि सर्व अंधार दिवाळीने उजळून निघेल ही स्वप्न बघत असतांना यावर आभाळच कोसळलं..आणि बळीराजाच्या स्वप्नांवर पाणी फिरलं ....सर्व काही उद्ध्वस्त झाले .

सटाणा : शेकडो शेतकऱ्यांनी लाखो रु पये खर्च करून पिकविलेल्या द्राक्ष पिकाचे शंभर ,सव्वाशे रु पयांनी सौदे झालेले .....डाळिंब देखील बांधावर शंभर रु पये किलोने विकले जात होते .मका ,बाजरी,सोयाबीन ,भात ,नागली ,भुईमुग काढणीवर आलेले पिक पाहून गेल्या तीन वर्षांपासून दुष्काळाच्या झळांनी होरपळणारा बळीराजा यंदा आपल्या कुटुंबात लक्ष्मी नांदेल आणि सर्व अंधार दिवाळीने उजळून निघेल ही स्वप्न बघत असतांना यावर आभाळच कोसळलं..आणि बळीराजाच्या स्वप्नांवर पाणी फिरलं ....सर्व काही उद्ध्वस्त झाले .कर्ज काढून पोटच्या गोळ्या सारख पिकविलेल सोन डोळ्या देखत गेल्याचे पाहून ‘आभाळ पडनं..ऐन दिवाळीमा लक्ष्मी गयी..आते आम्ही जगानं कसे ..?’असा हंबरडा फोडला तर अनेकांच्या डोळ्यातील अश्रूच आटले असल्याचे भयावह वास्तव चित्र परतीच्या पावसाने आज बागलाणमध्ये बघायला मिळत आहे.बागलाण तालुक्यात ऐन दिवाळीत आभाळच कोसळलं. विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर शाल ,सत्कार न स्वीकारता आमदार दिलीप बोरसे यांनी नुकसानीची पाहणी करत शेतकऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर नेते , पुढारी आणि शासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली .तत्पूर्वी बोरसे यांनी सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना दिल्यानंतर तहसीलदार जितेंद्र इंगळे पाटील यांनी पहिल्याच दिवसी साडे आठशे हेक्टर द्राक्ष बागांचे पंचनामे पूर्ण केले. शासकीय यंत्रणा कामाला लागल्यामुळे बागलाण पंचनामे करण्यात अव्वल ठरला असला तरी मदतीचे काय असा सवाल आता बळीराजा करत असल्याचे बघायला मिळत आहे .बागलाण तालुक्यात सुमारे दोन हजार ५६ हेक्टर क्षेत्रावरील द्राक्ष पिक पूर्णपणे बाधित झाले आहे .११२७ हेक्टर क्षेत्रावरील डाळिंब पिक बाधित झाले आहे .नागली ४२ हेक्टर ,भात ७३५ हेक्टर ,बाजरी ५ हजार २४८ हेक्टर ,सोयाबीन ९८६ हेक्टर ,भुईमुग २१ हेक्टर ,मका २१ हजार ३५२ हेक्टर ,कापूस ६५ हेक्टर , भाजीपाला २१० हेक्टर असे एकूण ४१ हजार हेक्टर क्षेत्रावरील ५३ हजार ३०४ शेतकºयांचे पिक बाधित होऊन नुकसान झाले आहे .याचा संपूर्ण अहवाल जिल्हाधिकार्यांकडे पाठविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले .--------------------------पाच ते सहा हजार कोटींची उलाढाल ठप्प......बागलाण हा द्राक्ष हंगामासाठी प्रसिद्ध टापू आहे.या भागाचे मुख्य पिक डाळिंब असले तरी तेल्या रोगामुळे डाळिंब पिकाला भवितव्य नसल्यामुळे बहुतांश शेतकºयांनी डाळींब पिकाला पर्याय म्हणून द्राक्ष पिकाला पसंती दिली आहे .त्यामुळे साहजिकच डाळिंब पिकाची जागा द्राक्षाने घेतली आहे.उच्च शिक्षण घेऊनही नोकºया नसल्यामुळे अनेक तरु णांनी नोकरीची वाट न पाहता व्यावसायिक शेतीत रमणे पसंत केले.कर्ज काढून द्राक्ष बागा उभ्या केल्या .अनेक धोके झेलत निर्यातक्षम अर्ली द्राक्ष पिक काढले .यामुळे दरवर्षी सुमारे दहा हजार कोटी रु पयांची उलाढाल एकट्या बागलाण मधून होते .यामुळे देशाला परकीय चलन देखील मिळते .यंदा मात्र परतीच्या पावसाने द्राक्षाचे शिवाराच उद्धवस्त झाले .एकरी अडीच लाख रु पये भांडवल टाकून सुमारे साडे सातशे तरु ण शेतकर्यांनी निर्यातक्षम द्राक्ष पिकविले होते .अनेकांनी शंभर , सव्वाशे ,दीडशे रु पयांनी सौदे देखील केले होते .मात्र रात्रीतून आभाळ कोसळलं आणि होत्याच नव्हत झाला .यंदा या अस्मानी संकटामुळे तब्बल पाच हजार कोटींची उलाढाल ठप्प होऊन देश परकीय चलनाला मुकणार आहे .

टॅग्स :Nashikनाशिक