शहरं
Join us  
Trending Stories
1
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
2
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
3
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
4
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
5
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
6
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
7
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 
8
दोन मुलांची आई १७ वर्षांच्या तरुणाच्या प्रेमात पडली, वर्ष झालं पिच्छा सोडेना, अखेर तरुणाने 'असा' शिकवला धडा! 
9
खळबळजनक! ४ लाख फॉलोअर्स असलेल्या महिला इन्फ्लुएन्सरचा कारमध्ये सापडला मृतदेह
10
WTC Final : शमीला मागे टाकत स्टार्कनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; त्यात टीम इंडियाचा मोठा हातभार
11
"पाकिस्तान्यांचा नानांना भलताच कळवळा?, तुमचा आणि तुमच्या मालकाचा डीएनए एकच...देशद्रोह"
12
Astro Tips: शुक्र केतू युती सुखाने जगू देत नाही; आयुष्यात होते मोठे नुकसान!
13
पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!
14
'आता आणखी खेळाडू निवृत्त होतील...'; वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने केला धक्कादायक दावा
15
"लिव्ह इनमध्ये राहण्याचा खूप फायदा", मराठी अभिनेत्रीने मांडले विचार; म्हणाली, "आपले खरे रंग..."
16
आरोग्य विमा घेताना फसगत नको! 'हे' ६ प्रश्न विचाराच, अन्यथा पैसे वाया जातील!
17
लग्नाच्या ३ वर्षांनंतर आलिया भटने नावात केला मोठा बदल; हॉटेलमधील 'त्या' फोटोमुळे चर्चांना उधाण
18
डिसेंबरपासून बंद पडलंय 'या' शेअरचं ट्रेडिंग; किंमत फक्त १० रुपये, आता समोर आली मोठी अपडेट 
19
IND vs ENG : टीम इंडियातील या स्टार खेळाडूसाठी गांगुलीनं घेतला BCCI निवडकर्त्यांशी पंगा! म्हणाला...

भाजपाच्या काळात लोकशाही मृत्युशय्येवर : कन्हैया कुमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 01:45 IST

नाशिक : लोकशाहीचा पाया असलेल्या जनतेला भ्रमिष्ट करून या पायावर आधारलेल्या चारही मुख्य स्तंभ या सरकारने खिळखिळीकेली आहेत. जनतेसाठी ही मोठी चिंतेची बाब असून लोकशाही मृतशय्येवर पोहचली असताना तिच्या हत्येचे साक्षीदार आपण होता कामा नये. सद्विवेकबुद्धी जागृत ठेवून सरकारच्या आश्वासनांवर गांभीर्याने मनुष्य म्हणून विचार करावा तरच भारत सक्षम होईल. सत्ताधारी ...

नाशिक : लोकशाहीचा पाया असलेल्या जनतेला भ्रमिष्ट करून या पायावर आधारलेल्या चारही मुख्य स्तंभ या सरकारने खिळखिळीकेली आहेत. जनतेसाठी ही मोठी चिंतेची बाब असून लोकशाही मृतशय्येवर पोहचली असताना तिच्या हत्येचे साक्षीदार आपण होता कामा नये. सद्विवेकबुद्धी जागृत ठेवून सरकारच्या आश्वासनांवर गांभीर्याने मनुष्य म्हणून विचार करावा तरच भारत सक्षम होईल. सत्ताधारी भाजपा सरकारला प्रश्न विचारण्याचे धाडस केलेच पाहिजे, तरच भारताची लोकशाही जीवंत राहील, असे प्रतिपादन अखिल भारतीय विद्यार्थी फेडरेशनचा नेता कन्हैया कुमार याने केले.  शहरातील पुरोगामी, सामाजिक संघटनांच्या वतीने सोमवारी (दि.२०) परशुराम साईखेडकर नाट्यगृहात डॉ. नरेंद्र दाभोलकर विवेक व्याख्यानमालेत कन्हैया प्रमुख वक्ता म्हणून बोलत होता. ‘युवाओं निर्भय बनो...सवाल पुछो’ या विषयावर कन्हैयाने व्याख्यानमालेचे ५६वे पुष्प गुंफले. यावेळी मंचावर पल्लवी चिंचवाडे, समाधान बागुल उपस्थित होते. कन्हैया याने आपल्या खास शैलित निर्भिडपणे सरकारवर हल्लाबोल केला. सुरुवातीला त्याने मराठीवर प्रभुत्व नसल्याची खंत व्यक्त करीत उपस्थितांची माफी मागितली आणि हिंदी भाषेतून आपल्या व्याख्यानाला प्रारंभ केला. यावेळी कन्हैया म्हणाला, या सरकारकडून देशातील जनतेपुढे जे चित्र रंगविले जात आहे ते अत्यंत खोटे आणि दिशाभूल करणारे आहे. देशाच्या मूलभूत प्रश्नांवर समाजातून एल्गार पुकारला गेला की, हे सरकार त्यांची दिशाभूल करण्यासाठी तयार असते, अशी टीका कन्हैयाने यावेळी केली. या देशात बलात्कार, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, समाजघटकांचे संप सुरू असतानाही माध्यमांमध्ये चर्चा केवळ जाती-धर्माच्या प्रश्नांवर केली जाते किं बहूना ती घडवून आणली जाते हे लोकशाहीचे दुर्दैवच आहे. प्रास्ताविक सागर निकम यांनी केले. सुत्रसंचालन सचिन मालेगावकर यांनी केले.भाजपामध्ये भ्रष्टाचा-यांचे ‘वेलकम’‘सभी भ्रष्टाचारीयो को जेल में डालेंगे’ असे आश्वासन देशाला देणारे मोदी यांनी सर्व कॉँग्रेसी भ्रष्टाचारी नेत्यांचे भाजपामध्ये ‘वेलकम’ केले. हे सरकार जनतेला मुर्ख समजण्याची मोठी चूक करीत आहेत. जेव्हा भारतीयांच्या संयमाचा अन्् सहनशीलतेचा अंत होईल, तेव्हा लोकशाहीच्या संरक्षणार्थ मोठी क्रांती या देशात घडून येईल, असा विश्वासही कन्हैयाने बोलताना व्यक्त केला.एकात्मता टिकवून ठेवण्याचे आव्हानजाती-धर्माच्या उन्मादात भारताच्या लोकशाही अन् माणुसकीचा बळी दिला जात आहे. त्यामुळे भारतीयांनी आपली एकात्मता टिकवून ठेवली पाहिजे. कारण हा देश सर्व जाती-धर्माचा आहे. त्यामुळे या देशात सर्वांना समान हक्क व अधिकार या संविधानाने दिले आहे, हे आपण विसरून चालणार नाही, कारण आपल्याला आपल्या जाती-धर्मापेक्षा देश महत्त्वाचा आहे, असे कन्हैयाने यावेळी आवर्जून सांगितले....तर लोकशाहीचा अंतप्रत्येक भारतीयाने आपल्या डोळ्यांची झापडे काढून फेकण्याची गरज आहे. विवेकबुद्धीने तर्कशुद्ध विचाराने या सरकारला आपल्या मूलभूत समस्यांविषयी प्रश्न विचारण्याचे धाडस केले पाहिजे, असे कन्हैया म्हणाला. ज्या व्यक्तीमध्ये धाडस आहे, तोच प्रश्न विचारू शकतो, हे लक्षात घ्यावे. जनतेने प्रश्न विचारणे बंद केले तर मृतशय्येवर पोहचलेल्या लोकशाहीचा अंत झाल्याशिवाय राहणार नाही. लोकांना मानसिक गुलामगिरीतून स्वतंत्र होण्याची गरज आहे. जे आपल्यासमोर दाखविले जाते किंवा आणले जाते ते सत्यच असते, असा अंधविश्वास दूर करावा.

टॅग्स :kanhaiya kumarकन्हैय्या कुमार