शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

भाजपाच्या काळात लोकशाही मृत्युशय्येवर : कन्हैया कुमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 01:45 IST

नाशिक : लोकशाहीचा पाया असलेल्या जनतेला भ्रमिष्ट करून या पायावर आधारलेल्या चारही मुख्य स्तंभ या सरकारने खिळखिळीकेली आहेत. जनतेसाठी ही मोठी चिंतेची बाब असून लोकशाही मृतशय्येवर पोहचली असताना तिच्या हत्येचे साक्षीदार आपण होता कामा नये. सद्विवेकबुद्धी जागृत ठेवून सरकारच्या आश्वासनांवर गांभीर्याने मनुष्य म्हणून विचार करावा तरच भारत सक्षम होईल. सत्ताधारी ...

नाशिक : लोकशाहीचा पाया असलेल्या जनतेला भ्रमिष्ट करून या पायावर आधारलेल्या चारही मुख्य स्तंभ या सरकारने खिळखिळीकेली आहेत. जनतेसाठी ही मोठी चिंतेची बाब असून लोकशाही मृतशय्येवर पोहचली असताना तिच्या हत्येचे साक्षीदार आपण होता कामा नये. सद्विवेकबुद्धी जागृत ठेवून सरकारच्या आश्वासनांवर गांभीर्याने मनुष्य म्हणून विचार करावा तरच भारत सक्षम होईल. सत्ताधारी भाजपा सरकारला प्रश्न विचारण्याचे धाडस केलेच पाहिजे, तरच भारताची लोकशाही जीवंत राहील, असे प्रतिपादन अखिल भारतीय विद्यार्थी फेडरेशनचा नेता कन्हैया कुमार याने केले.  शहरातील पुरोगामी, सामाजिक संघटनांच्या वतीने सोमवारी (दि.२०) परशुराम साईखेडकर नाट्यगृहात डॉ. नरेंद्र दाभोलकर विवेक व्याख्यानमालेत कन्हैया प्रमुख वक्ता म्हणून बोलत होता. ‘युवाओं निर्भय बनो...सवाल पुछो’ या विषयावर कन्हैयाने व्याख्यानमालेचे ५६वे पुष्प गुंफले. यावेळी मंचावर पल्लवी चिंचवाडे, समाधान बागुल उपस्थित होते. कन्हैया याने आपल्या खास शैलित निर्भिडपणे सरकारवर हल्लाबोल केला. सुरुवातीला त्याने मराठीवर प्रभुत्व नसल्याची खंत व्यक्त करीत उपस्थितांची माफी मागितली आणि हिंदी भाषेतून आपल्या व्याख्यानाला प्रारंभ केला. यावेळी कन्हैया म्हणाला, या सरकारकडून देशातील जनतेपुढे जे चित्र रंगविले जात आहे ते अत्यंत खोटे आणि दिशाभूल करणारे आहे. देशाच्या मूलभूत प्रश्नांवर समाजातून एल्गार पुकारला गेला की, हे सरकार त्यांची दिशाभूल करण्यासाठी तयार असते, अशी टीका कन्हैयाने यावेळी केली. या देशात बलात्कार, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, समाजघटकांचे संप सुरू असतानाही माध्यमांमध्ये चर्चा केवळ जाती-धर्माच्या प्रश्नांवर केली जाते किं बहूना ती घडवून आणली जाते हे लोकशाहीचे दुर्दैवच आहे. प्रास्ताविक सागर निकम यांनी केले. सुत्रसंचालन सचिन मालेगावकर यांनी केले.भाजपामध्ये भ्रष्टाचा-यांचे ‘वेलकम’‘सभी भ्रष्टाचारीयो को जेल में डालेंगे’ असे आश्वासन देशाला देणारे मोदी यांनी सर्व कॉँग्रेसी भ्रष्टाचारी नेत्यांचे भाजपामध्ये ‘वेलकम’ केले. हे सरकार जनतेला मुर्ख समजण्याची मोठी चूक करीत आहेत. जेव्हा भारतीयांच्या संयमाचा अन्् सहनशीलतेचा अंत होईल, तेव्हा लोकशाहीच्या संरक्षणार्थ मोठी क्रांती या देशात घडून येईल, असा विश्वासही कन्हैयाने बोलताना व्यक्त केला.एकात्मता टिकवून ठेवण्याचे आव्हानजाती-धर्माच्या उन्मादात भारताच्या लोकशाही अन् माणुसकीचा बळी दिला जात आहे. त्यामुळे भारतीयांनी आपली एकात्मता टिकवून ठेवली पाहिजे. कारण हा देश सर्व जाती-धर्माचा आहे. त्यामुळे या देशात सर्वांना समान हक्क व अधिकार या संविधानाने दिले आहे, हे आपण विसरून चालणार नाही, कारण आपल्याला आपल्या जाती-धर्मापेक्षा देश महत्त्वाचा आहे, असे कन्हैयाने यावेळी आवर्जून सांगितले....तर लोकशाहीचा अंतप्रत्येक भारतीयाने आपल्या डोळ्यांची झापडे काढून फेकण्याची गरज आहे. विवेकबुद्धीने तर्कशुद्ध विचाराने या सरकारला आपल्या मूलभूत समस्यांविषयी प्रश्न विचारण्याचे धाडस केले पाहिजे, असे कन्हैया म्हणाला. ज्या व्यक्तीमध्ये धाडस आहे, तोच प्रश्न विचारू शकतो, हे लक्षात घ्यावे. जनतेने प्रश्न विचारणे बंद केले तर मृतशय्येवर पोहचलेल्या लोकशाहीचा अंत झाल्याशिवाय राहणार नाही. लोकांना मानसिक गुलामगिरीतून स्वतंत्र होण्याची गरज आहे. जे आपल्यासमोर दाखविले जाते किंवा आणले जाते ते सत्यच असते, असा अंधविश्वास दूर करावा.

टॅग्स :kanhaiya kumarकन्हैय्या कुमार