शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

लोकसभा, विधानसभेसाठी पक्षाचा आदेश पाळणार :  माणिकराव कोकाटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 00:04 IST

कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या विषयी गैरसमज न ठेवता झोकून देऊन काम करण्याची गरज आहे. काळानुसार प्रत्येकाला योग्य ती संधी मिळणार आहे मात्र त्यासाठी तुम्ही सातत्य ठेवणे गरजेचे आहे. जनतेत राहून प्रत्येकाची मने जिंका. मी नेहमी सच्चा कायकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलेलो आहे. भविष्यात लोकसभा की विधानसभा हे पक्षाने दिलेल्या आदेशावरून ठरविण्यात येईल,

सिन्नर : कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या विषयी गैरसमज न ठेवता झोकून देऊन काम करण्याची गरज आहे. काळानुसार प्रत्येकाला योग्य ती संधी मिळणार आहे मात्र त्यासाठी तुम्ही सातत्य ठेवणे गरजेचे आहे. जनतेत राहून प्रत्येकाची मने जिंका. मी नेहमी सच्चा कायकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलेलो आहे. भविष्यात लोकसभा की विधानसभा हे पक्षाने दिलेल्या आदेशावरून ठरविण्यात येईल, असे सांगत माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी राजकारणात पुन्हा जोमाने सक्रिय होण्याचे संकेत दिले.  सिन्नर तालुक्यातील गोंदे फाटा येथील माउली लॉन्स येथे माजी आमदार कोकाटे यांच्या कार्यकर्त्यांच्या सुसंवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी कोकाटे यांनी कार्यकर्त्यांची मते जाणून घेतानाच भविष्यात आपण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचे सांगून पुन्हा एकदा लढण्यासाठी सज्ज झाल्याचे सांगितले. सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विनायक तांबे, सुनील नाईक, पांडुरंग वारुंगसे, रामा बुचुडे, नितीन शिंदे, शेखर चोथवे, योगेश माळी, वाळीबा बुरकुल, शशिकांत गाडे, बापू गोजरे या कार्यकर्त्यांनी कोकाटे समर्थकांच्या सुसंवाद मेळाव्याचे आयोजन केले होते.  सत्तेत असताना आपल्याला ज्या संस्था मिळाल्या त्या पुरेपूर तालुक्यातील जनतेसाठी वापरल्या, शेतीच्या प्रश्नाबरोबर बेरोजगारीचे प्रश्न सुटले पाहिजे, नवीन तरुण पिढीला रोजगार निर्माण झाला पाहिजे याचा विचार कायम केला. आज इंडिया बुल्स बंद पडली, अजूनही काही कंपन्या बंद पडल्या, मात्र सेनेचे उद्योगमंत्री गप्प असल्याचे ते म्हणाले. हे सगळे प्रश्न जर लोकप्रतिनिधी सोडवणार नसेल तर मग हे आपण कशाला निवडून देतो, असा सवाल कोकाटे यांनी उपस्थित केला. सिन्नर शहरात पाणीप्रश्न असताना लोक शांत का, असे सवाल त्यांनी उपस्थित केला.  या मेळाव्यात जयंत आव्हाड, सुधाकर शिंदे, सोमनाथ भिसे, देवा आवारे, उत्तम सानप, शिवाजी हलवर, विजय आव्हाड, आकाश सहाने, मारुती बिन्नर, रामदास जायभाये, जयराम थोरात, किसन शिंदे, सुधीर रावळे या कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त केले.मी संपूर्ण तालुक्याचा कुटुंबप्रमुख...गेल्या तीन वर्षात संपर्क कमी झाल्याने गैरसमजदेखील निर्माण झाले असतील, कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडलं ही भावनादेखील मनात येऊ शकते अन् काहीअंशी ते सत्यदेखील आहे. ज्या गोष्टी चुकल्या त्याची कबुली दिली पाहिजे अन् ज्या गोष्टी चांगल्या केल्या त्याचे समर्थनदेखील केले पाहिजे, अशी कबुलीदेखील कोकाटे यांनी यावेळी बोलताना दिली. विकासासाठी मुंबई-दिल्ली वाºया झाल्या त्यातून संपर्क कमी झाल्याने पराभव झाला. जनसंपर्क कमी होण्यात काही कौटुंबिक अडचणी होत्या. तथापि, मी माझ्या कुटुंबापुरता मर्यादित नसून संपूर्ण तालुक्याचा कुटुंबप्र्रमुख आहे. त्यामुळे या तालुक्याच्या प्रत्येक कुटुंबावर आलेले संकट हे आपले संकट आहे असे मी मानतो, असेही कोकाटे म्हणाले.

टॅग्स :Politicsराजकारण