शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

आमदार बाळासाहेब सानप यांच्यावर लोकप्रतिनिधींची कुरघोडी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 14:24 IST

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिपककुमार मीना यांच्या कामकाजावर लोकप्रतिनिधींसह जिल्हा परिषदेचे अधिकारी, कर्मचारी, ग्रामसेवकांमध्ये तीव्र स्वरूपाची नाराजी होती. सत्ताधारी भाजप व सेनेच्या जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी देखील मीना यांच्याविरोधात तक्रारी केलेल्या असताना आमदार बाळासाहेब सानप यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात मीना यांच्या बाजुने अधिका-यांची बैठक घेवून

ठळक मुद्देमीना प्रकरण : राजकीय वजन कमी झाल्याची चर्चालोकप्रतिनिधींना कायम डावलण्यात आमदार बाळासाहेब सानप अग्रेसर

नाशिक : कुठल्याही शासकीय अधिका-याची बदली असो वा नियुक्ती जणू काही आपले प्रथम कर्तव्यच असल्याचे समजून स्वत:ला त्यात झोकून घेण्याबरोबरच अन्य लोकप्रतिनिधींना कायम डावलण्यात अग्रेसर असलेले आमदार बाळासाहेब सानप यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिपककुमार मीना यांच्या पाठीशी उभे केलेले बळ मोडून काढण्यात जिल्ह्यातील अन्य आमदारांना यश मिळाले आहे. सानप यांनी प्रयत्न करूनही मीना यांची बदली ते रोखू न शकल्याने सानप यांचे राजकीय वजन घटल्याचा अर्थ काढला जात असून, काही दिवसांपुर्वी मुख्यमंत्र्यांकडे स्वकीय आमदारांनी केलेल्या तक्रारीतूनच हे घडल्याचे बोलले जात आहे.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिपककुमार मीना यांच्या कामकाजावर लोकप्रतिनिधींसह जिल्हा परिषदेचे अधिकारी, कर्मचारी, ग्रामसेवकांमध्ये तीव्र स्वरूपाची नाराजी होती. सत्ताधारी भाजप व सेनेच्या जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी देखील मीना यांच्याविरोधात तक्रारी केलेल्या असताना आमदार बाळासाहेब सानप यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात मीना यांच्या बाजुने अधिका-यांची बैठक घेवून त्यांच्यात समझोता घडविण्याचा प्रयत्न केला होता. विशेष म्हणजे मीना यांची बदली करण्यासाठी सेना-भाजप व कॉँग्रेस आघाडीच्या दहा आमदारांनी व ३७ जिल्हा परिषद सदस्यांनी मुख्यमंत्री, ग्रामविकासमंत्र्यांकडे लेखी स्वरूपाच्या तक्रारी केलेल्या असतानाही सानप यांनी या तक्रारींकडे बेफिकीरीने पहात मीना यांच्या बाजुने समर्थन उभे केले होते. त्याच्या या कृतीबद्दल ग्रामीण भागातील आमदारांनी तीव्र संताप व्यक्त करून, सानप यांच्या मध्यस्थीबद्दलच शंका घेतली होती. शासकीय अधिकाºयांच्या बदल्या व नियुक्त्यांमध्ये ‘रस’ असलेल्या सानप यांचे अभय मिळाल्याचे समजून मीना यांनी आपल्या वर्तुणूकीत बदल करण्याऐवजी उलट या वादात वरिष्ठ अधिका-यांनाच गोवण्याचा प्रयत्न केल्यामुळे जिल्ह्यातील अन्य लोकप्रतिनिधींमध्ये संताप व्यक्त करण्यात आला होता. त्यामुळे मीना यांच्या आडून सानप यांना धडा शिकविण्यासाठी काही आमदारांनी गेल्या चार दिवसांपासून मुंबईत तळ ठोकून मीना यांची बदली करण्यास मुख्यमंत्र्यांना भाग पाडल्याचे आता बोलले जात आहे. लोकप्रतिनिधींच्या तक्रारीची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी मीना यांची बदली करून आणण्यात सानप विरोधी आमदार यशस्वी झाल्यामुळे त्यांचे बळ वाढले असून या प्रकरणामुळे सानप यांचे राजकीय वजन कमी झाल्याची चर्चा पक्षांतर्गंत केली जात आहे. खुद्द सानप यांच्यासाठी देखील हा मोठा धक्का मानला जात आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिक