शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

गंभीर स्थिती असलेले जिल्हे सोडून लॉकडाउन उठवावा : मेधा पाटकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 23:29 IST

नाशिक : ज्या जिल्ह्यांमध्ये गंभीर स्थिती आहे तो परिसर वगळून इतर ठिकाणी लॉकडाउन उठवावा. त्याचबरोबर पायी गावाकडे निघालेल्या नागरिकांच्या जाण्याची शासनाने सोय करावी, दारू दुकान तत्काळ बंद करावीत, अशा मागण्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी केल्या.

नाशिक : ज्या जिल्ह्यांमध्ये गंभीर स्थिती आहे तो परिसर वगळून इतर ठिकाणी लॉकडाउन उठवावा. त्याचबरोबर पायी गावाकडे निघालेल्या नागरिकांच्या जाण्याची शासनाने सोय करावी, दारू दुकान तत्काळ बंद करावीत, अशा मागण्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी केल्या.कोरोना, लॉकडाउन आणि इतर विविध प्रश्नांवर मेधा पाटकर यांनी झूम अ‍ॅपद्वारे पत्रकारांशी संवाद साधला. देशात श्रमिक, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट असून, लॉकडाउनमुळे अनेकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउन आवश्यक होता, मात्र एकदम सगळं बंद करण्यापेक्षा क्रमाक्रमाणे त्याबाबत निर्णय घेणे आवश्यक होते. आता लॉकडाउनची आवश्यकता नसून गंभीर स्थिती असलेला भाग वगळून इतर ठिकाणी लॉकडाउन मागे घ्यायला हवा. असे करत असतानाच लॉकडाउनमुळे गोरगरिबांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई द्यायला हवी, असे त्या म्हणाल्या.धुळे आणि मालेगावचे रुग्ण नाशिकला आणू नये असे वक्तव्य करणारे नाशिकचे महापौर आणि दोन आमदार व खासदारांविरुध्द सामाजिक समरसतेच्या दृष्टिकोनातून आपण आवाज उठविला पाहिजे, असे पाटकर यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. लॉकडाउनच्या काळात अनेक कामगार कायदे बदलण्यात आले असून, यातून उद्योगपतींना सवलती देण्यात आल्या तसेच केंद्र शासन श्रमिकांना सर्व टॅक्स माफी देणार का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

टॅग्स :Nashikनाशिक