शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
2
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
3
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
4
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
5
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
6
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
7
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
8
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
9
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान
10
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
11
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
12
"जे काही होतं सगळं जवळच्यांना दिलं, आता मला...", अभिषेक बच्चनची 'ती' पोस्ट चर्चेत, नेमकं म्हणायचंय काय?
13
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
14
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
15
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
16
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
17
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
18
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
19
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
20
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश

शेतमाल शेतातच लॉकडाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:15 IST

पाटोदा (गोरख घुसळे) : कोरोनाच्या कडक निर्बंधांमुळे बाजार समित्या तसेच आठवडे बाजार बंद असल्यामुळे शेतमाल शेतातच लॉकडाऊन झाल्याने बळीराजा ...

पाटोदा (गोरख घुसळे) : कोरोनाच्या कडक निर्बंधांमुळे बाजार समित्या तसेच आठवडे बाजार बंद असल्यामुळे शेतमाल शेतातच लॉकडाऊन झाल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. शेतमाल विक्री केला नाही तर खरिपाला भांडवल कसे उपलब्ध करावे, या विवंचनेत शेतकरी वर्ग आहे. ऐन खरिपाच्या तोंडावर कोरोना लॉकडाऊनमुळे आर्थिक कोंडी झाली आहे. कृषी सेवा केंद्रांनाही सकाळी अकरा वाजेपर्यंत सवलत देण्यात आली आहे, या बंधनामुळे अवघ्या काही दिवसांवर आलेल्या खरीप हंगामाच्या तयारीवर परिणाम होत आहे.

मागील वर्षापासून कोरोना संकटामुळे शेतकरी वर्ग अगोदरच मेटाकुटीस आलेला असताना रासायनिक खतांच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे. अशाही परिस्थितीत शेतकरी वर्ग निमुटपणे मिळेल त्या भावात खते, बी-बियाणे खरेदी करीत आहे.

खरीप हंगामाच्या लागवडीकरिता भांडवल उभे करण्याचा हा काळ आहे. मात्र खरिपाच्या पूर्वतयारीसाठी शेतकऱ्यांना शेतमाल विक्री, बी-बियाणे, रासायनिक खते, पीककर्ज उपलब्ध करणे ही महत्त्वाची कामे पार पाडावी लागतात. मृग नक्षत्रापूर्वी शेतकरी वर्ग या सर्व बाबींची जुळवाजुळव करण्यात व्यस्त असतो. मात्र कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे बँकांना सकाळी दहा ते दोन वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. खते, बियाणे खरेदी-विक्रीच्या दुकानांवर बंधने घालण्यात आली असून त्यांना केवळ सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंतच ही कृषी सेवा केंद्र उघडी ठेवण्यासाठी सवलत देण्यात आल्याने शेतकरी दुकानापर्यंत येता येता वेळ संपत असल्याने शेतकऱ्यांचे खरीप हंगामाचे नियोजन बिघडले आहे.

खरीप हंगामाचे नियोजन हे खरीप हंगामात होणाऱ्या शेतमालाच्या तसेच भाजीपाल्याच्या विक्रीवर होत असते. या शेतमालाच्या विक्रीतून मिळणाऱ्या मोबदल्यावर खरीप हंगामाची दिशा ठरत असते. मात्र बाजार समित्या बंद असल्याने शेतमाल विक्रीवर परिणाम झाला आहे. येत्या काही दिवसात बाजार समित्या सुरू झाल्यावर मोठ्या प्रमाणावर शेतमाल विक्रीला येणार असल्याने बाजारभावात कमालीची घट येणार असल्याने शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागणार आहे. तर आठवडे बाजार बंद असल्याने व गावगावांतही शेतकऱ्यांना भाजीपाला विक्रीस मज्जाव केला जात असल्याने अनेक भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांनी भाजीपाला जनावरांना खाऊ घालून ते आर्थिक नुकसान सहन करीत आहेत. यामुळे शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे.

.................................................................

‘रासायनिक खतांच्या किमती मागे घ्या’

खरीपाच्या तोंडावर खत उत्पादक कंपन्यांनी खतांच्या किमतीत ६० टक्के दरवाढ केली आहे. मागील वर्षापासून कोरोना महामारीचे संकट सुरू आहे. शेतकऱ्यांनी नव्या उमेदीने शेतीची कामे सुरु केलेली असतानाच खत उत्पादक कंपन्यांनी भरमसाट किमती वाढविल्या आहेत. यामुळे आधीच आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांची परवड झाली आहे.

- भागीनाथ शेळके, शेतकरी ठाणगाव

..............................................................

शेतमालाला हमीभाव मिळावा

बाजार समित्या बंद असल्याने शेतमाल शेतात पडून आहे, तर भाजीपाला सडून चालला आहे. शेतमालाला हमी भाव मिळावा म्हणून गेल्या अनेक महिन्यांपासून शेतकरी आंदोलन करीत आहेत. आधीच अस्मानी व सुलतानी संकटामुळे शेतकरी बरबाद झाला आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी खतांच्या किमतीत भाववाढ करून शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.

- गोरख निर्मळ, शेतकरी, पाटोदा

.........................................................

‘बाजार समिती व्यवहार सुरू करा’

कोरोना प्रभावामुळे बाजार समिती व्यवहार बंद असल्यामुळे शेतमाल व भाजीपाला विक्री बंद झाली आहे. खरीप हंगामासाठी भांडवल उभे करण्यासाठी शेतमाल बेभावात विकावा लागत आहे. कोरोना नियमांचे पालन करीत बाजार समिती व्यवहार सुरू करून शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी सवलत द्यावी. जेणेकरून शेतमाल विकून खरीप हंगामासाठी भांडवल उभे करता येईल.

- ज्ञानेश्वर बोरनारे, शेतकरी, पाटोदा

……………………………………………………………..

‘कृषी सेवा केंद्र सुरू ठेवावे’

लॉकडाऊन कृषी सेवा केंद्र सकाळी अकरा वाजेपर्यंतच सुरू असल्यामुळे बाहेरगावच्या शेतकऱ्यांना वेळेत पोहचता येत नाही. तसेच कमी वेळेमुळे दुकानामध्ये शेतकरी वर्गाची गर्दी होत असल्याने सोशल डिस्टन्सिंग आणि नियमांचे उल्लंघन होत असल्याने कृषी दुकानांना सकाळी सात ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची सवलत द्यावी.

- सतीश वाघ, कृषी सेवा संचालक, पाटोदा