शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नैसर्गिक जलस्रोत जिवंत; कारभाऱ्यांची इच्छाशक्ती मृत!

By अझहर शेख | Updated: March 22, 2023 15:21 IST

जागतिक जल दिन विशेष: नाशिकमधील पुरातन बारवांच्या वारसा धोक्यात!

नाशिक : आदिवासी भागातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शासनाकडून ‘जलजीवन मिशन’ आणि जलयुक्त शिवारसारखे अभियान राबविले जात असले तरी दुसरीकडे मात्र नैसर्गिक जिवंत जलस्रोत संवर्धनाबाबत प्रशासकीय पातळीवर कमालीची उदासीनता दिसून येते. अहिल्यादेवी होळकरांच्या काळात जिल्ह्यात विविध ठिकाणी साकारलेल्या ऐतिहासिक देखण्या बारवांचा वारसा धोक्यात आला आहे. या बारवांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यामधील भूजल पातळी आजही टिकून आहे. जागतिक जल दिनाच्या निमित्ताने या बारवांची स्वच्छता व जलसाठ्याचा पुनर्वापराचा संकल्प प्रशासनाने केल्यास खऱ्या अर्थाने जल दिन सार्थकी लागेल.

नाशिक शहरातील नांदुरनाकाजवळ महापालिका हद्दीत जुनी बारव आढळून येते. या बारवमधील भूजल पातळीदेखील शाबूत आहे. बारवची रचना उत्कृष्ट असून होळकरांच्या सत्ताकाळातील स्थापत्यशैलीचा अद्भूत नमुना या रूपाने बघावयास मिळतो. विटा व दगडांमध्ये चुनखडीचा वापर करून तयार करण्यात आलेली या मोठ्या बारवमध्ये उतरून जाण्यासाठी पायऱ्या आहेत. या बारवची रचना अत्यंत सुंदर व देखणी आहे; मात्र दुर्दैवाने महापालिका प्रशासनाची नजर अद्यापही या बारवकडे पडलेली नाही. बारवच्या रूपाने नैसर्गिक जिवंत जलस्रोतचा चांगला पर्याय महापालिकेला उपलब्ध होऊ शकतो. ‘पाणी वाचवा, जीवन वाचवा’ अशाप्रकारे लोकप्रबोधन करणाऱ्या मनपाने ही बारव वाचविली तरी मोठा जलस्रोताचे संवर्धन होईल, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

१) नाशिक ग्रामीण भागातसुद्धा अशाच प्रकारच्या जुन्या बारव बघावयास मिळतात. यामध्ये अंजनेरी गावाच्या शिवारातील जुनी दगडी बारवदेखील संवर्धनाच्या प्रतीक्षेत आहे. या बारवमधील जलस्रोत अजूनही सुस्थितीत आहे. गरज आहे, बारव संवर्धनाची. याकडे प्रशासनाने लक्ष दिल्यास चांगल्या प्रकारचा जलस्रोत अंजनेरी पंचक्रोशीसाठी उपयोगात आणता येऊ शकतो.

२) त्र्यंबकेश्वर तालुक्यातील मौजे तळवाडे शिवारातदेखील अशाचप्रकारे दगडी बांधकाम केलेली पायऱ्या असलेली जुनी बारव नजरेस पडते. या बारवमधील भूजल पातळी चांगली आहे. मात्र, याकडेही प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने संवर्धनाची प्रतीक्षा आहे.

३) गिरणारे गावातसुद्धा विटांचे बांधकाम असलेली भव्य जुनी बारव नजरेस पडते. या बारवचीही पाणीपातळी चांगली आहे. बारवची स्वच्छता अधूनमधून या भागातील ऐतिहासिक वारसाप्रेमींकडून केली जाते.

पाणीटंचाईच्या संकटावर होऊ शकते मात...!नाशिक जिल्ह्यात हंगामी पर्जन्यमानाची स्थिती गेल्यावर्षी समाधानकारक राहिली आहे. यामुळे अजूनही जिल्ह्यातील आदिवासी तालुक्यांमध्ये पाण्याचे टँकर सुरू करण्याची वेळ भासलेली नाही. एप्रिल उजाडणार असला तरी पाणीटंचाईने अद्याप डोके वर काढलेले नाही. कारण आदिवासी तालुक्यांना अवकाळी पावसानेही मागील आठवडाभरापासून चांगलेच झोडपून काढले आहे. जिल्हा प्रशासनाकडून जरी पाणीटंचाई कृती आराखडा तयार केला गेला असला तरी, दुसरीकडे मात्र नैसर्गिक जिवंत जलस्रोत संवर्धनाबाबतही पावले उचलण्याची गरज असल्याचे पर्यावरणप्रेमी व वारसाप्रेमी संस्थांचे म्हणणे आहे.

टॅग्स :NashikनाशिकWaterपाणी