शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

नैसर्गिक जलस्रोत जिवंत; कारभाऱ्यांची इच्छाशक्ती मृत!

By अझहर शेख | Updated: March 22, 2023 15:21 IST

जागतिक जल दिन विशेष: नाशिकमधील पुरातन बारवांच्या वारसा धोक्यात!

नाशिक : आदिवासी भागातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शासनाकडून ‘जलजीवन मिशन’ आणि जलयुक्त शिवारसारखे अभियान राबविले जात असले तरी दुसरीकडे मात्र नैसर्गिक जिवंत जलस्रोत संवर्धनाबाबत प्रशासकीय पातळीवर कमालीची उदासीनता दिसून येते. अहिल्यादेवी होळकरांच्या काळात जिल्ह्यात विविध ठिकाणी साकारलेल्या ऐतिहासिक देखण्या बारवांचा वारसा धोक्यात आला आहे. या बारवांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यामधील भूजल पातळी आजही टिकून आहे. जागतिक जल दिनाच्या निमित्ताने या बारवांची स्वच्छता व जलसाठ्याचा पुनर्वापराचा संकल्प प्रशासनाने केल्यास खऱ्या अर्थाने जल दिन सार्थकी लागेल.

नाशिक शहरातील नांदुरनाकाजवळ महापालिका हद्दीत जुनी बारव आढळून येते. या बारवमधील भूजल पातळीदेखील शाबूत आहे. बारवची रचना उत्कृष्ट असून होळकरांच्या सत्ताकाळातील स्थापत्यशैलीचा अद्भूत नमुना या रूपाने बघावयास मिळतो. विटा व दगडांमध्ये चुनखडीचा वापर करून तयार करण्यात आलेली या मोठ्या बारवमध्ये उतरून जाण्यासाठी पायऱ्या आहेत. या बारवची रचना अत्यंत सुंदर व देखणी आहे; मात्र दुर्दैवाने महापालिका प्रशासनाची नजर अद्यापही या बारवकडे पडलेली नाही. बारवच्या रूपाने नैसर्गिक जिवंत जलस्रोतचा चांगला पर्याय महापालिकेला उपलब्ध होऊ शकतो. ‘पाणी वाचवा, जीवन वाचवा’ अशाप्रकारे लोकप्रबोधन करणाऱ्या मनपाने ही बारव वाचविली तरी मोठा जलस्रोताचे संवर्धन होईल, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

१) नाशिक ग्रामीण भागातसुद्धा अशाच प्रकारच्या जुन्या बारव बघावयास मिळतात. यामध्ये अंजनेरी गावाच्या शिवारातील जुनी दगडी बारवदेखील संवर्धनाच्या प्रतीक्षेत आहे. या बारवमधील जलस्रोत अजूनही सुस्थितीत आहे. गरज आहे, बारव संवर्धनाची. याकडे प्रशासनाने लक्ष दिल्यास चांगल्या प्रकारचा जलस्रोत अंजनेरी पंचक्रोशीसाठी उपयोगात आणता येऊ शकतो.

२) त्र्यंबकेश्वर तालुक्यातील मौजे तळवाडे शिवारातदेखील अशाचप्रकारे दगडी बांधकाम केलेली पायऱ्या असलेली जुनी बारव नजरेस पडते. या बारवमधील भूजल पातळी चांगली आहे. मात्र, याकडेही प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने संवर्धनाची प्रतीक्षा आहे.

३) गिरणारे गावातसुद्धा विटांचे बांधकाम असलेली भव्य जुनी बारव नजरेस पडते. या बारवचीही पाणीपातळी चांगली आहे. बारवची स्वच्छता अधूनमधून या भागातील ऐतिहासिक वारसाप्रेमींकडून केली जाते.

पाणीटंचाईच्या संकटावर होऊ शकते मात...!नाशिक जिल्ह्यात हंगामी पर्जन्यमानाची स्थिती गेल्यावर्षी समाधानकारक राहिली आहे. यामुळे अजूनही जिल्ह्यातील आदिवासी तालुक्यांमध्ये पाण्याचे टँकर सुरू करण्याची वेळ भासलेली नाही. एप्रिल उजाडणार असला तरी पाणीटंचाईने अद्याप डोके वर काढलेले नाही. कारण आदिवासी तालुक्यांना अवकाळी पावसानेही मागील आठवडाभरापासून चांगलेच झोडपून काढले आहे. जिल्हा प्रशासनाकडून जरी पाणीटंचाई कृती आराखडा तयार केला गेला असला तरी, दुसरीकडे मात्र नैसर्गिक जिवंत जलस्रोत संवर्धनाबाबतही पावले उचलण्याची गरज असल्याचे पर्यावरणप्रेमी व वारसाप्रेमी संस्थांचे म्हणणे आहे.

टॅग्स :NashikनाशिकWaterपाणी