शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

श्वानांच्या हल्ल्यातून हरणाला जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 16:08 IST

जळगाव नेऊर : धुळगाव येथील अनकाई रोडलगत भगवंत पाटील यांच्या शेतात भटकंती करणाऱ्या हरणावर भटक्या श्वानांनी हल्ला करून त्याला जखमी केले. मात्र वस्तीतील काही नागरिकांनी श्वानांच्या तावडीतून हरणाला सोडवून त्याचे प्राण वाचविले.

जळगाव नेऊर : धुळगाव येथील अनकाई रोडलगत भगवंत पाटील यांच्या शेतात भटकंती करणाऱ्या हरणावर भटक्या श्वानांनी हल्ला करून त्याला जखमी केले. मात्र वस्तीतील काही नागरिकांनी श्वानांच्या तावडीतून हरणाला सोडवून त्याचे प्राण वाचविले. मानवतेचे दर्शन घडविणारी ही घटना गुरु वारी सकाळी ८ वाजेच्या दरम्यान घडली.अन्नपाण्यासाठी आसुसलेले हरीण भगवंत पाटील यांच्या शेतात शिरले. त्याच्यावर भटक्या श्वानांनी हल्ला करून त्याला जखमी केले. अर्जुन गायकवाड, विलास पाटील, बाळासाहेब खोडके व इतर ग्रामस्थांनी वेळीच घटनास्थळी धाव घेत कुत्र्यांच्या तावडीतून त्याची सुटका केली. धुळगावपासून आठ ते दहा किमी अंतरावर असलेल्या नांदूर-सावरगावलगत वनविभागाचे मोठे जंगल आहे. त्यात हरीण, मोर यांसह इतर वन्य पशुपक्षी मोठ्या प्रमाणात आहे. जंगलात वन्य प्राण्यांसाठी पाण्याची व्यवस्था नाही. त्यामुळे अन्नपाण्यासाठी वन्यजीव अन्नपाण्याच्या शोधात मानव वस्तीकडे येत आहेत. त्यातच हे हरीण अनकाई रोडवर पाटील यांच्या शेतात भटकत असताना कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला केला. जीव वाचविण्यासाठी ते सैरावैरा पळत होते. मात्र श्वानांनी त्याचे लचके तोडण्यास सुरु वात केली. सुदैवाने ग्रामस्थांनी सुटका करून प्राण वाचविले. वनविभागाशी संपर्क साधत डॉ. बाऊस्कर यांनी जखमी हरणावर उपचार केले. यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी संजय भंडारी, वनरक्षक प्रसाद पाटील, गोपाळ हरगावकर, विकास देशमुख, सागर देशमुख यांच्याकडे सुपुर्द केले. यावेळी सुनील पाटील, पांडुरंग शेळके, प्रल्हाद मोरे, मनीष पाटील, दीपक खोडके, राजेंद्र खोडके, सम्राज्ञी पाटील, भार्गवी पाटील, वरद पाटील यांचे सहकार्य लाभले.

टॅग्स :Nashikनाशिक