शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
2
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
3
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
4
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
5
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
6
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
7
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
8
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
9
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
10
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
11
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
12
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
13
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
14
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
15
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
16
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
17
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
18
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
19
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
20
Crime: गे डेटिंग अपवर ओळख, ८ जण फ्लॅटवर पार्टीसाठी भेटले; पार्टीनंतर शुभमचा मृत्यू

साहित्यिकांची ‘स्वत:च्या जगण्याची गोष्ट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2020 00:02 IST

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात कुसुमाग्रज प्रतिष्ठान, नाशिक व विद्यापीठाच्या वामनदादा कर्डक अध्यासन यांच्या संयुक्त विद्यमाने तीनदिवसीय अक्षर साहित्य संमेलन उत्साहात झाले. या तीन दिवसात रंगनाथ पठारे, राजन खान, सुप्रसिद्ध कवयित्री नीरजा, शब्दालय प्रकाशनच्या सुमती लांडे, दीनानाथ मनोहर, अनंत सामंत, सतीश तांबे यांसारख्या दिग्गज साहित्यिकांनी स्वत:च्या जगण्याची गोष्ट सांगत अनुभवी तसेच नवलेखकांशी मनमोकळा संवाद साधला. प्रसिद्ध साहित्यिक राजन खान यांच्या समन्वयातून झालेल्या या संमेलनात विविध भागातील साहित्यिक सहभागी झाले होते.

ठळक मुद्देसांगता : तीन दिवसीय अक्षर साहित्य संमेलनाचा समारोप

नाशिक : येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात कुसुमाग्रज प्रतिष्ठान, नाशिक व विद्यापीठाच्या वामनदादा कर्डक अध्यासन यांच्या संयुक्त विद्यमाने तीनदिवसीय अक्षर साहित्य संमेलन उत्साहात झाले. या तीन दिवसात रंगनाथ पठारे, राजन खान, सुप्रसिद्ध कवयित्री नीरजा, शब्दालय प्रकाशनच्या सुमती लांडे, दीनानाथ मनोहर, अनंत सामंत, सतीश तांबे यांसारख्या दिग्गज साहित्यिकांनी स्वत:च्या जगण्याची गोष्ट सांगत अनुभवी तसेच नवलेखकांशी मनमोकळा संवाद साधला. प्रसिद्ध साहित्यिक राजन खान यांच्या समन्वयातून झालेल्या या संमेलनात विविध भागातील साहित्यिक सहभागी झाले होते.आमदार हेमंत टकले यांच्या हस्ते व कुलगुरू प्रा. डॉ. ई. वायुनंदन यांच्या अध्यक्षतेखाली या संमेलनाचे उद्घाटन झाले. समाजात सांस्कृतिक प्रदूषणाची जेव्हा भीती वाटत असते तेव्हा अक्षर मानवसारखी साहित्य संमेलने ही आश्वासक वाटतात, असे प्रतिपादन आमदार टकले यांनी उद्घाटनप्रसंगी केले. अध्यक्षस्थानावरून बोलताना कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन यांनी हे साहित्य संमेलन विद्यापीठात होणे म्हणजे विद्यापीठाच्या सामाजिक योगदानाचे प्रतीक असल्याचे सांगितले. सुप्रसिद्ध साहित्यिक रंगनाथ पठारे यांनी खरे साहित्यिक लेखन हे सहज प्रकारचे वा ‘स्वांत सुखाय’ असे लेखन नसून तो गंभीर लेखन प्रकार असल्याचे सांगितले. त्यात लेखकाच्या मनाची दीर्घकाळ गुंतवणूक असते, त्याची बौद्धिक व शारीरिक कसरत या काळात सुरू असते. साहित्यिकाने एकप्रकारच्या मरण यातना भोगल्यानंतरच अस्सल साहित्य जन्माला येत असते, असे पठारे म्हणाले.सत्रनिहाय विविध विषयांवर सहभागी साहित्यिकांनी आपापली मते मांडली. सुप्रसिद्ध कवयित्री नीरजा, शब्दालय प्रकाशनाच्या सुमती लांडे, दीनानाथ मनोहर, अनंत सामंत, सतीश तांबे, श्रीकांत चौगुले, रविप्रकाश कुलकर्णी, अशोक थोरात, संदीप खाडिलकर, सुबोध जावडेकर आदी साहित्यिकांच्या चर्चासत्रांनी संमेलनात विशेष रंग भरला.कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे लोकेश शेवडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. विद्यापीठाच्या वामनदादा कर्डक अध्यासनाचे प्रमुख प्रा. विजयकुमार पाईकराव यांनी अध्यासनाविषयी माहिती दिली. यावेळी दत्ता पाटील लिखित व सचिन शिंदे दिग्दर्शित ‘नेब्युला’ या नाटकाचा प्रयोग या संमेलनात सादर करण्यात आला. डॉ. मनीषा जगताप यांची निर्मिती असलेल्या या प्रायोगिक नाटकातराम दौंड, दीप्ती चंद्रात्रे, उर्वराज गायकवाड, एकता आढाव यांच्या भूमिका आहेत.टकले यांची मुलाखत रंगलीअक्षर मानव साहित्य संमेलनाचे प्रणेते व प्रख्यात साहित्यिक राजन खान यांनी आमदार हेमंत टकले यांची ‘लोकप्रतिनिधीमधील साहित्यिक’ याविषयी घेतलेली छोटेखानी मुलाखत विशेष ठरली. त्यात आमदार टकले यांनी कविश्रेष्ठ कुसुमाग्रज ते राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या समवेतच्या साहित्यिक, राजकीय आठवणींना उजाळा दिला.

टॅग्स :cultureसांस्कृतिक