शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
4
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
5
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
6
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
7
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
8
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
9
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
10
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
11
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
12
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
13
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
14
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
15
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
16
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
17
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
18
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
19
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
20
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा

साहित्यिकांची ‘स्वत:च्या जगण्याची गोष्ट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2020 00:02 IST

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात कुसुमाग्रज प्रतिष्ठान, नाशिक व विद्यापीठाच्या वामनदादा कर्डक अध्यासन यांच्या संयुक्त विद्यमाने तीनदिवसीय अक्षर साहित्य संमेलन उत्साहात झाले. या तीन दिवसात रंगनाथ पठारे, राजन खान, सुप्रसिद्ध कवयित्री नीरजा, शब्दालय प्रकाशनच्या सुमती लांडे, दीनानाथ मनोहर, अनंत सामंत, सतीश तांबे यांसारख्या दिग्गज साहित्यिकांनी स्वत:च्या जगण्याची गोष्ट सांगत अनुभवी तसेच नवलेखकांशी मनमोकळा संवाद साधला. प्रसिद्ध साहित्यिक राजन खान यांच्या समन्वयातून झालेल्या या संमेलनात विविध भागातील साहित्यिक सहभागी झाले होते.

ठळक मुद्देसांगता : तीन दिवसीय अक्षर साहित्य संमेलनाचा समारोप

नाशिक : येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात कुसुमाग्रज प्रतिष्ठान, नाशिक व विद्यापीठाच्या वामनदादा कर्डक अध्यासन यांच्या संयुक्त विद्यमाने तीनदिवसीय अक्षर साहित्य संमेलन उत्साहात झाले. या तीन दिवसात रंगनाथ पठारे, राजन खान, सुप्रसिद्ध कवयित्री नीरजा, शब्दालय प्रकाशनच्या सुमती लांडे, दीनानाथ मनोहर, अनंत सामंत, सतीश तांबे यांसारख्या दिग्गज साहित्यिकांनी स्वत:च्या जगण्याची गोष्ट सांगत अनुभवी तसेच नवलेखकांशी मनमोकळा संवाद साधला. प्रसिद्ध साहित्यिक राजन खान यांच्या समन्वयातून झालेल्या या संमेलनात विविध भागातील साहित्यिक सहभागी झाले होते.आमदार हेमंत टकले यांच्या हस्ते व कुलगुरू प्रा. डॉ. ई. वायुनंदन यांच्या अध्यक्षतेखाली या संमेलनाचे उद्घाटन झाले. समाजात सांस्कृतिक प्रदूषणाची जेव्हा भीती वाटत असते तेव्हा अक्षर मानवसारखी साहित्य संमेलने ही आश्वासक वाटतात, असे प्रतिपादन आमदार टकले यांनी उद्घाटनप्रसंगी केले. अध्यक्षस्थानावरून बोलताना कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन यांनी हे साहित्य संमेलन विद्यापीठात होणे म्हणजे विद्यापीठाच्या सामाजिक योगदानाचे प्रतीक असल्याचे सांगितले. सुप्रसिद्ध साहित्यिक रंगनाथ पठारे यांनी खरे साहित्यिक लेखन हे सहज प्रकारचे वा ‘स्वांत सुखाय’ असे लेखन नसून तो गंभीर लेखन प्रकार असल्याचे सांगितले. त्यात लेखकाच्या मनाची दीर्घकाळ गुंतवणूक असते, त्याची बौद्धिक व शारीरिक कसरत या काळात सुरू असते. साहित्यिकाने एकप्रकारच्या मरण यातना भोगल्यानंतरच अस्सल साहित्य जन्माला येत असते, असे पठारे म्हणाले.सत्रनिहाय विविध विषयांवर सहभागी साहित्यिकांनी आपापली मते मांडली. सुप्रसिद्ध कवयित्री नीरजा, शब्दालय प्रकाशनाच्या सुमती लांडे, दीनानाथ मनोहर, अनंत सामंत, सतीश तांबे, श्रीकांत चौगुले, रविप्रकाश कुलकर्णी, अशोक थोरात, संदीप खाडिलकर, सुबोध जावडेकर आदी साहित्यिकांच्या चर्चासत्रांनी संमेलनात विशेष रंग भरला.कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे लोकेश शेवडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. विद्यापीठाच्या वामनदादा कर्डक अध्यासनाचे प्रमुख प्रा. विजयकुमार पाईकराव यांनी अध्यासनाविषयी माहिती दिली. यावेळी दत्ता पाटील लिखित व सचिन शिंदे दिग्दर्शित ‘नेब्युला’ या नाटकाचा प्रयोग या संमेलनात सादर करण्यात आला. डॉ. मनीषा जगताप यांची निर्मिती असलेल्या या प्रायोगिक नाटकातराम दौंड, दीप्ती चंद्रात्रे, उर्वराज गायकवाड, एकता आढाव यांच्या भूमिका आहेत.टकले यांची मुलाखत रंगलीअक्षर मानव साहित्य संमेलनाचे प्रणेते व प्रख्यात साहित्यिक राजन खान यांनी आमदार हेमंत टकले यांची ‘लोकप्रतिनिधीमधील साहित्यिक’ याविषयी घेतलेली छोटेखानी मुलाखत विशेष ठरली. त्यात आमदार टकले यांनी कविश्रेष्ठ कुसुमाग्रज ते राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या समवेतच्या साहित्यिक, राजकीय आठवणींना उजाळा दिला.

टॅग्स :cultureसांस्कृतिक