शहरं
Join us  
Trending Stories
1
आता ब्लू इकॉनॉमीकडे झेप, तब्बल १२ लाख कोटींचे करार; शिवछत्रपतींच्या विचारांनी भारत प्रगतीपथावर
2
राज ठाकरेही मेळाव्यात फोडणार मतचोरीचा बॉम्ब? बोगस नावे, मतचोरी, EVM घोटाळ्यांवर सादरीकरण
3
मुंबई पालिकेची निवडणूक जानेवारीच होणार? आरक्षण सोडत ११ नोव्हेंबरला, आयोगाकडून सूचना प्रसिद्ध
4
५ नोव्हेंबरपर्यंत पाऊसधारांचा अंदाज; कमी दाबाचा पट्टा ओमानकडे जाण्याऐवजी किनारपट्ट्यांवर रेंगाळला
5
सावध व्हा, ‘कॉल मर्जिंग स्कॅम’ धाेका ! नव्या पद्धतीने केवळ काही अवधीत लाखो रुपयांवर डल्ला
6
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
7
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
8
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
9
काँग्रेसमध्ये महापालिकेसाठी इच्छुकांची गर्दी; आले ४५० अर्ज, इच्छुकांकडून ५०० रुपये शुल्क
10
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
11
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
12
सेंट जॉर्जेस रुग्णालयातील मृत्यूदर का वाढला? दाखल रुग्णांपैकी २४ ते २५ टक्के जण दगावतात
13
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
14
अर्बन कंपनी सर्च केले आणि ऑनलाइन मेड मागविली; महिलेचे खातेच झाले रिकामे
15
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
16
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
17
संभाव्य दुबार मतदारांची तपासणी करा; राज्य निवडणूक आयोगाचे मतदार याद्यांबाबत आदेश
18
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
19
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
20
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!

साहित्य संमेलन स्थळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क: नाशिक : महाराष्ट्र निर्मितीच्या हिरक महोत्सवी वर्षात होणारे यंदाचे ९४ वे साहित्य संमेलन देशाच्या राजधानीत यमुनेच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क:

नाशिक : महाराष्ट्र निर्मितीच्या हिरक महोत्सवी वर्षात होणारे यंदाचे ९४ वे साहित्य संमेलन देशाच्या राजधानीत यमुनेच्या तीरावर भरवायचे की महाराष्ट्रात गोदावरी तीरावर नाशिकला भरवायचे? हा मोठा पेच साहित्य महामंडळाला पडला आहे. त्यामुळे या दोन्ही शहरांतील संस्थांमधून आलेल्या प्रस्तावांबाबत विचार विनिमय करून निर्णय घेण्यासाठी रविवारी साहित्य महामंडळाच्या औरंगाबादला झालेल्या बैठकीत स्थळ निवड समिती सदस्यांची नियुक्ती करण्यात आली.

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या या बैठकीनंतर जाहीर करण्यात आलेल्या कार्यकारिणीत महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्यासह कार्यवाह डॉ. दादा गोरे, कोषाध्यक्ष डॉ. रामचंद्र साळुंखे, प्रा. प्रतिभा सराफ, प्रदीप दाते, प्रकाश पायगुडे यांच्या नावांचा समावेश आहे. या बैठकीत पुढील रणनीती निश्चित करण्यात आली. तसेच स्थळनिश्चितीसाठीच्या तारखा निर्धारित करण्यात आल्या. नाशिकमध्ये सार्वजनिक वाचनालय संस्थेतील पदाधिकाऱ्यांचे अंतर्गत वादविवाद धर्मादाय आयुक्तांसमोर सुनावणीस आले असल्याने त्यांनी प्रस्तावित संमेलनासाठी पुढाकार घेण्याबाबत फारसा उत्साह दाखवला नाही. त्यामुळे नाशिकच्याच लोकहितवादी मंडळ या जुन्या संस्थेने नाशिकमध्ये साहित्य संमेलन भरवण्याचा प्रस्ताव महामंडळाला दिलेला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होणारे हे साहित्य संमेलन मर्यादित स्वरूपात भरवायचे असल्याने ते दिल्लीला भरवल्याने आपसूकच मर्यादित होईल, असा काहींचा सूर असून नाशिकला भरवल्यास ते राज्य निर्मितीच्या हिरक महोत्सवी वर्षात मराठी मातीत भरल्याचा टिळा भाळी लागणार असल्याने महामंडळाची ही निवड समितीच अद्याप व्दिधा मनस्थितीत असल्याचे दिसते आहे.

इन्फो

स्थळ पाहणीनंतर होणार निर्णय

महामंडळाने नियुक्त केलेली स्थळ निवड समिती येत्या ७ जानेवारीला नाशिक दौऱ्यावर येऊन स्थळ पाहणी करणार आहे. या निवड समितीला शहरातील गोखले एज्युकेशन सोसायटीचे एचपीटी कॅम्पस, व्ही. एन. नाईक संस्थेची जागा तसेच मुक्त विद्यापीठ परिसराची जागा दाखवली जाणार आहे. या जागा बघून मंडळाच्या स्थितीचा आढावा घेतल्यानंतर ८ तारखेला स्थळ निश्चितीबाबत निर्णय घेणार असल्याने बहुधा त्याच दिवशी संमेलनाच्या शहरावर शिक्कामोर्तब करण्यात येईल.

--इन्फो---

स्थळ पाहणी केवळ देखावाच

गतवर्षीदेखील महामंडळाच्या निवड समितीने नाशिकमधील विविध स्थळांची पाहणी करून सर्व स्थळांबाबत समाधान व्यक्त केले होते. तसेच उस्मानाबादपेक्षा नाशिकमध्ये अधिक सोयीसुविधा असल्याचेही कबूल केले होते. तरीदेखील उस्मानाबादला एकही संमेलन झालेले नसल्याचे कारण देत उस्मानाबादचीच निवड केल्याने गतवर्षीच स्थळ पाहणी हा केवळ देखावाच असल्याचा अनुभव नाशिककरांनी घेतला होता. समिती आधीच निर्णय घेते आणि स्थळ पाहणीचा केवळ देखावाच करते, अशी चर्चा साहित्य वर्तुळात गतवर्षापासूनच रंगलेली आहे.