शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक जिल्ह्यातील ५५ हजार शेतक-यांची कर्जमाफी यादी जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 14:57 IST

राज्य सरकारने जुन महिन्यात कर्जदार शेतक-यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज स्वाभीमान योजना जाहीर केली असली तरी, प्रत्यक्षात शेतक-याच्या बॅँक खात्यात कर्जाची रक्कम अद्यापही पडू शकलेली नाही. आॅक्टोंबर महिन्यात शासनाने कर्जमाफीस पात्र ठरणाºया शेतक-यांच्या याद्या जाहीर करण्यास सुरूवात केली.

ठळक मुद्देसुटीच्या दिवशीही बॅँका सुरू : युद्धपातळीवर याद्यांची छाननीयादीची बॅँक शाखा पातळीवर छाननी करून २४५ कोटी निधीसाठी तसा प्रस्ताव शासन दरबारी पाठविण्याच्या सुचना

नाशिक : शेतक-यांना कर्जमाफीच्या प्रश्नांवरून विरोधकांकडून सातत्याने सत्ताधा-यांना धारेवर धरले जात असल्याच्या पार्श्वभुमीवर नाशिक जिल्ह्यातील आणखी ५५ हजार कर्जदार शेतक-यांची ग्रीन यादी राज्य सरकारने जाहीर केली असून, जिल्हा बॅँकेच्या माध्यमातून या यादीची युद्धपातळीवर छाननी केली जात आहे, त्यासाठी शनिवार व रविवार अशा दोन्ही दिवस बॅँकेच्या आठशे कर्मचा-यांमार्फत दोनशे शाखांमध्ये रात्रंदिवस काम सुरू आहे.राज्य सरकारने जुन महिन्यात कर्जदार शेतक-यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज स्वाभीमान योजना जाहीर केली असली तरी, प्रत्यक्षात शेतक-याच्या बॅँक खात्यात कर्जाची रक्कम अद्यापही पडू शकलेली नाही. आॅक्टोंबर महिन्यात शासनाने कर्जमाफीस पात्र ठरणाºया शेतक-यांच्या याद्या जाहीर करण्यास सुरूवात केली. त्यासाठी नाशिक जिल्ह्यातील ८७९ शेतकºयांची पहिली यादी जाहीर करण्यात आली. या यादीच्या आधारे त्या त्या बॅँकेच्या शाखेत याद्यांची तपासणी करण्यात आली. त्यात प्रामुख्याने कर्जदार शेतक-याने भरलेल्या माहितीची पडताळणी करण्यात आली आहे. या शेतक-यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरूवात झाली आहे. तथापि, शासनाने दिलेली नोव्हेंबर अखेरची मुदत टळून गेल्याने आता ११ डिसेंबरपासून सुरू होणा-या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात याच प्रश्नावरून विरोधकांकडून सत्ताधारी पक्षााला धारेवर धरण्याचे तसेच संपुर्ण कर्जमाफीची घोषणा होईपर्यंत अधिवेशन न चालू देण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे सरकारने शेतकरी कर्जमाफी प्रकरणाला अधिक प्राधान्य दिले. दोन दिवसांपुर्वीच नाशिक जिल्ह्यातील सुमारे ५५ हजार शेतक-यांची ग्रीन यादी जाहीर करण्यात आली आहे. ही यादी जिल्हा बॅँकेला प्राप्त झाली आहे. या यादीची बॅँक शाखा पातळीवर छाननी करून २४५ कोटी निधीसाठी तसा प्रस्ताव शासन दरबारी पाठविण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. शासनाला अधिवेशनापुर्वी शेतकरी कर्जमाफीची अंमलबजावणी करायची असल्याकारणाने सहकार विभागाने जिल्हा बॅँकेला अहोरात्र काम करून कोणत्याही परिस्थितीत कर्जमाफी मिळालेल्या शेतक-यांची संख्या वाढवायची आहे. त्यामुळे अगोदरच दिवस-रात्र काम करणा-या जिल्हा बॅँकेच्या कर्मचा-यांची शनिवार व रविवारची शासकीय सुटी रद्द करण्यात आली आहे.शनिवारी जिल्हा बॅँकेच्या जिल्ह्यातील दोनशे शाखांमध्ये फक्त शेतकरी कर्जमाफीचे काम करण्यात आले. शाखा पातळीवर आलेल्या पात्र शेतक-यांची यादी शाखा व्यवस्थापक, सोसायटी सचिव, लेखा परिक्षक व बॅँकेचे संबंधित कर्मचा-यांमार्फत या याद्यांची छाननी करण्यात आली. रविवारी देखील सर्वच शाखा सुरू राहतील असे बॅँकेचे कार्यकारी संचालक राजेंद्र बकाल यांनी सांगितले.

टॅग्स :agricultureशेतीNashikनाशिक