शहरं
Join us  
Trending Stories
1
"याच्या तळाशी जाऊ, कोणालाही सोडणार नाही"; दिल्ली बॉम्बस्फोटाचा कट रचणाऱ्यांना पंतप्रधान मोदींचा स्पष्ट इशारा
2
सकाळीच दिल्ली गाठली, दिवसभर कारमध्ये बॉम्ब घेऊन फिरला; चौथा दहशतवादी डॉक्टर कुठे कुठे गेला...
3
विमानतळ, मेटल, रस्ते आणि डेटा सेंटर्स... अदानींची लवकरच आयपीओ लाँच करण्याची तयारी; कमाईची मिळणार संधी
4
दिल्ली हादरवणारे ४ डॉक्टर! तिघांनी वेळीच अटक केली तर चौथ्याने स्वत:ला उडवून हाहाकार माजवला
5
एसआयपीला मोठा धक्का! एकाच महिन्यात ४४ लाखांहून अधिक SIP बंद; गुंतवणुकदार का घेताहेत माघार?
6
भारतासाठी खुशखबर! डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले 50% टॅरिफ कमी करण्याचे संकेत, म्हणाले...
7
दिल्ली कार स्फोटाच्या धक्क्यानंतर लाल किल्ल्याबाबत घेण्यात आला 'हा' महत्त्वाचा निर्णय
8
Delhi Blast :"४ वर्षांपूर्वी घरातून निघून गेला, आम्हाला..."; अटक केलेल्या डॉक्टरच्या आईचा धक्कादायक खुलासा
9
"त्याच्या निधनानंतर माझ्यातली निरागसता...", सिद्धार्थ शुक्लाच्या आठवणीत शहनाज गिल भावुक
10
Delhi Blast : "आम्ही गेट उघडलं आणि पळत सुटलो..."; दिल्ली स्फोटादरम्यान प्रत्यक्षदर्शीने कसा वाचवला जीव?
11
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
12
लाल किल्ला बॉम्बस्फोटानंतर मोठा प्रश्न! सामान्य जीवन विमा पॉलिसीत दहशतवादी हल्ले कव्हर होतात का?
13
IPL Trade Rules: संजू-जड्डू जोडी अदलाबदलीच्या खेळामुळे चर्चेत! जाणून घ्या त्यासंदर्भातील नियम
14
प्रेमानंद महाराज सांगतात, 'बुधवारी केस कापल्याने येते धन-समृद्धी आणि टळतो अकाली मृत्यू!'
15
माधुरी दीक्षितची कार्बन कॉपी, आजही अगदी तशीच दिसते 90sची अभिनेत्री; ओळखलंत का?
16
बापमाणूस! ४ वर्षे जमा केली १०-१० रुपयांची नाणी; चहावाल्याने लेकीचं स्वप्न केलं पूर्ण, घेतली स्कूटी
17
दिल्ली लाल किल्ला स्फोट: कारमधून ब्लास्ट घडवून आणणाऱ्या उमरचा पहिला फोटो आला समोर
18
VIDEO: स्फोटकांनी भरलेली कार ३ तास एकाच ठिकाणी उभी; स्फोट घडवणाऱ्याने एका मिनिटासाठीही गाडी सोडली नाही
19
गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! निफ्टीमध्ये आणखी १४% तेजीची शक्यता; गोल्डमॅन सॅक्सने सांगितलं कारण
20
टॅरिफमुळे प्रत्येक अमेरिकन नागरिकाला मिळणार २००० डॉलर्स, याच्या विरोधात बोलणारा मुर्ख; काय म्हणाले ट्रम्प?

वाहनांची रांग; पुन्हा हिरव्या सिग्नलसाठी थांब !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2019 00:32 IST

नाशिक : शहरातील वाहतुकीचा प्रश्न दिवसागणिक अधिकच बिकट बनू लागला आहे. महानगरातील अनेक चौकांमध्ये वाहनचालकांना आता किमान दोन सिग्नल ...

नाशिक : शहरातील वाहतुकीचा प्रश्न दिवसागणिक अधिकच बिकट बनू लागला आहे. महानगरातील अनेक चौकांमध्ये वाहनचालकांना आता किमान दोन सिग्नल थांबावे लागत आहे. वाहतुकीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी केलेल्या महापालिकेच्या ट्रॅफीक सेलचे अस्तित्वच नामशेष झाल्याचे चित्र असून, निदान आता तरी नाशिकच्या प्रशासकीय यंत्रणेने जागे होणे आवश्यक असल्याचा सूर त्रस्त वाहनधारक व्यक्त करु लागले आहेत.नाशिकमधील वाहतूक समस्या मार्गी लावण्यासाठी उपयुक्त ठरू शकणाऱ्या ट्रॅफीक सेलचे अस्तित्वच नामशेष झाल्यासारखे भासत आहे. त्यामुळे नाशकातील सर्व प्रमुख रस्त्यांवर सकाळी आणि सायंकाळच्या गर्दीच्या वेळी वाहनधारकांना किमान दुसºया सिग्नलपर्यंत वाट पहावी लागत असल्याने वाहनधारक त्रस्त बनू लागले आहेत. पार्किंगच्या जागांचा सुरू असलेला व्यावसायिक वापर, पार्किंगने व्यापलेले रस्ते, व्यापाऱ्यांनी गिळंकृत केलेले फुटपाथ आणि वाहतुकीच्या समस्येला कारणीभूत ठरणाºया सर्व संबंधित समस्यांवर महापालिकेचा कानाडोळा नाशिककरांना प्रचंड तापदायक ठरत आहे.महापालिकेच्या या चुका दूर करताना शहर वाहतूक विभागालाही नाकीनव आले आहेत. अर्थात पायाभूत सुविधांचाच अभाव असल्याने, कारवाईशिवाय अन्य काही होत नाही. शहरात वाहतुकीच्या दृष्टीनेही नियोजन करतानाच त्यासाठी सुविधा उभारण्याची सर्वस्वी जबाबदारी महापालिकेची असतानाही, त्याकडे डोळेझाक केली जाते आहे. वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी रस्त्यावरील अतिक्र मणे तातडीने दूर करण्याबाबत महापालिकेचीअतिक्र मण निर्मूलन यंत्रणा थिटी पडत असल्याचे वारंवार निदर्शनास येते. याबाबत कारवाई होणे आवश्यक आहे.समन्वयाचाअभावमहापालिका हद्दीतील रस्त्यांची सुरु असलेली कामे, त्यांचा कालावधी, पर्यायी रस्ते, तेथील नियोजन, पर्यायी रस्ते छोटे असल्याने त्यांच्यावरील वाढता ताण या सर्व बाबींमध्ये महापालिका, ट्रॅफीक सेल, स्मार्ट सिटी, वाहतूक विभाग यांच्यात समन्वयाचा प्रचंड अभाव असल्यानेच नागरिकांना सिग्नलवर दीर्घकाळ मनस्ताप सहन करावा लागतो. याबाबत काही पर्याय उपलब्ध नसल्याचे दिसते.अतिक्रमणे काढल्यानंतर पुन्हा त्याच जागांवर, चौकांमध्ये, रस्त्यांवर विक्रेते काहीकाळानंतर परतत असल्याने वाहतुकीची समस्या ‘जैसे थे’ राहत आहे. मनपाने मागणी केल्यानंतर पोलीस कर्मचारी पुरविले जात असतानाही, मग अतिक्रमणे हटवून वाहतूक सुरळीत केली जात नाही. या सर्व प्रकरणात महापालिकेचेच मनोबल कमी पडत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. अशोक स्तंभाच्या भागात काम सुरूअसताना पर्यायी रस्त्यांवरील पदपथ विक्रेते, पार्किंग यांचे नियंत्रण आवश्यकता आहे.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीस