शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
2
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
3
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
4
कोण आहे अविष्कार राऊत?; नेपाळमधील Gen Z आंदोलनापूर्वी केलेले जोरदार भाषण व्हायरल
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार ही कंपनी; ३ महिन्यांत पैसे केले डबल, कंपनीत स्टेट बँकेचीही गुंतवणूक
6
Infosys चं बायबॅक 'शॉपिंग'; १९% प्रीमिअमवर खरेदी करणार आपलेच शेअर्स, स्टॉक सुस्साट
7
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
8
उमेश-प्रियाची 'बिन लग्नाची गोष्ट', १३ वर्षांनी पडद्यावर आली रिअल लाईफ जोडी; कसा आहे सिनेमा? वाचा रिव्ह्यू
9
पितृपक्ष २०२५: पितृअष्टमीला करा गजलक्ष्मी व्रत; लक्ष्मीपूजनाएवढेच महत्त्व, सुख संपत्तीने नांदतात सर्व!
10
Pitru Paksha 2025: पितृपक्षाचा एक आठवडा शिल्लक; पितृदोष कसा ओळखावा? उपाय कोणते? ते पाहू
11
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
12
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
13
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
14
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
15
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
16
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
17
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
18
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
19
आसुरी अहंकार नको, संस्कृतीसोबत सत्कृतीही जोपासायला हवी : मोरारीबापू
20
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले

तडजोडीतच जीवनाच्या सुखाचा मार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 01:01 IST

आयुष्यात प्रत्येकाला जडजोडी कराव्याच लागतात. परंतु दिव्यांगाला जाणीवपूर्वक अशा तडजोडी स्वीकारून आयुष्याची वाटचाल करावी लागते. स्वीकारलेल्या जोडीदाराच्या सर्व मर्यादा मान्य करून त्यांच्याबरोबरच संसार करावा लागतो. अशा तडजोडी स्वीकारल्यामुळेच आज इतक्या वर्षांत संसार सुरळीत सुरू असल्याच्या भावना दिव्यांग जोडीदारांनी व्यक्त केल्या.

नाशिक : आयुष्यात प्रत्येकाला जडजोडी कराव्याच लागतात. परंतु दिव्यांगाला जाणीवपूर्वक अशा तडजोडी स्वीकारून आयुष्याची वाटचाल करावी लागते. स्वीकारलेल्या जोडीदाराच्या सर्व मर्यादा मान्य करून त्यांच्याबरोबरच संसार करावा लागतो. अशा तडजोडी स्वीकारल्यामुळेच आज इतक्या वर्षांत संसार सुरळीत सुरू असल्याच्या भावना दिव्यांग जोडीदारांनी व्यक्त केल्या.  जनलक्ष्मी बॅँकेच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात तुळसाआई बहुद्देशीय संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्ताने पाच दिव्यांग जोडप्यांचा सत्कार करण्यात आला. यावळी या दिव्यांगांनी आपल्या भावना प्रकट केल्या. तडजोडी स्वीकारल्यास दिव्यांना जीवन जगणे सुलभ होते. दोघांनी एकमेकांना समजून घेणे महत्त्वाचे असून, सर्वात महत्त्वाचे म्हणजे साथ दिली पाहिजे, अशा भावना अंध दिव्यांग बांधवांनी व्यक्त केल्या. यावेळी एनजीओ फोरमचे अध्यक्ष मुक्तेश्वर मुनशेट्टीवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. दिव्यांग व्यक्तींचे जीवन जगणे आणि त्यांना जगविणे फार कठीण काम असते. दिव्यांगांचे विवाह जुळविताना तर अनेक अडचणी येतात. त्यावर मात करीत हा प्रश्न तडीस न्यावा लागतो. सामाजिक भावनेचा प्रश्न अशा संस्थांसमोर नेहमी असतो, असे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी डॉ. सिंधू काकडे यांनीही मार्गदर्शन केले. दिव्यांगांच्या प्रश्नांवर प्रसंगी लढा उभारण्याची वेळ आल्यानंतर सर्वांनी त्यासाठी पुढे आले पाहिजे, असेही मुनशेट्टीवार यांनी सांगितले. यावेळी संगीता बुथकर, किशोर काळे, कैलास गोडसे, डॉ. संगीता पवार, किरण तुपलोंढे, शशांक हिरे उपस्थित होते. याप्रसंगी साळुंखे, बैसाने, काशीनाथ पाडवी, नितीन निर्मळ, रेखा साळुंके, घनदाट यांचा सत्कार करण्यात आला. संस्थेच्या अध्यक्षा शोभा काळे यांनी प्रास्ताविक केले तर संगीता पवार यांनी आभार मानले.यावेळी सूर्यभान साळुंके, नितीन घनदाट, शारदा व शैलेश बैसाने, कैलास निर्मळ यांनी अनुभव कथन केले. दिव्यांगांच्या बाबतीतील काही महत्त्वाच्या बाबी आणि सत्य स्वीकारणे अपेक्षित असते. आपल्या मर्यादा ओळखून आपल्या इच्छांना आळा घालता आले पाहिजे. आपल्या आयुष्यात येणाऱ्या अडचणीच्या क्षणांचा समरस होऊन सामना केला, तर जोडीदार कोणीही असो जीवन सुखी झाल्याशिवाय राहत नाही, अशादेखील भावना दिव्यांग व्यक्तींनी व्यक्त केल्या.

टॅग्स :Nashikनाशिक