शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
2
तर ती आज माझ्यासोबत असली असती...! माधुरी दीक्षितसोबत लग्नाच्या मागणीवर सुरेश वाडकर आजही...
3
बाप आहे की राक्षस ! सोबत झोपणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीवर केले अत्याचार; मुलीने दिला बाळाला जन्म
4
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
5
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
6
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
7
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
8
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
9
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
10
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
11
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
12
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
13
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
14
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
15
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
16
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
17
फेल, फेल, सपशेल...! होंडाने Activa ईव्ही जानेवारीत आणली, आता उत्पादन बंद केले; गिऱ्हाईकच मिळेना...
18
दीपिकाच्या ८ तासांची शिफ्ट अटीवर रेणुका शहाणेची प्रतिक्रिया; म्हणाली, "अमान्य असेल तर..."
19
Uddhav Thackeray : "भाजपा कपट कारस्थान करणारा पक्ष, भाषिक प्रांतावादाचं विष...", उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
20
‘प्रत्येक विधानसभेत ५०,००० मतं कापण्याचा कट’, अखिलेश यादवांचे भाजपा, निवडणूक आयोगावर गंभीर आरोप  
Daily Top 2Weekly Top 5

तडजोडीतच जीवनाच्या सुखाचा मार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 01:01 IST

आयुष्यात प्रत्येकाला जडजोडी कराव्याच लागतात. परंतु दिव्यांगाला जाणीवपूर्वक अशा तडजोडी स्वीकारून आयुष्याची वाटचाल करावी लागते. स्वीकारलेल्या जोडीदाराच्या सर्व मर्यादा मान्य करून त्यांच्याबरोबरच संसार करावा लागतो. अशा तडजोडी स्वीकारल्यामुळेच आज इतक्या वर्षांत संसार सुरळीत सुरू असल्याच्या भावना दिव्यांग जोडीदारांनी व्यक्त केल्या.

नाशिक : आयुष्यात प्रत्येकाला जडजोडी कराव्याच लागतात. परंतु दिव्यांगाला जाणीवपूर्वक अशा तडजोडी स्वीकारून आयुष्याची वाटचाल करावी लागते. स्वीकारलेल्या जोडीदाराच्या सर्व मर्यादा मान्य करून त्यांच्याबरोबरच संसार करावा लागतो. अशा तडजोडी स्वीकारल्यामुळेच आज इतक्या वर्षांत संसार सुरळीत सुरू असल्याच्या भावना दिव्यांग जोडीदारांनी व्यक्त केल्या.  जनलक्ष्मी बॅँकेच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात तुळसाआई बहुद्देशीय संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्ताने पाच दिव्यांग जोडप्यांचा सत्कार करण्यात आला. यावळी या दिव्यांगांनी आपल्या भावना प्रकट केल्या. तडजोडी स्वीकारल्यास दिव्यांना जीवन जगणे सुलभ होते. दोघांनी एकमेकांना समजून घेणे महत्त्वाचे असून, सर्वात महत्त्वाचे म्हणजे साथ दिली पाहिजे, अशा भावना अंध दिव्यांग बांधवांनी व्यक्त केल्या. यावेळी एनजीओ फोरमचे अध्यक्ष मुक्तेश्वर मुनशेट्टीवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. दिव्यांग व्यक्तींचे जीवन जगणे आणि त्यांना जगविणे फार कठीण काम असते. दिव्यांगांचे विवाह जुळविताना तर अनेक अडचणी येतात. त्यावर मात करीत हा प्रश्न तडीस न्यावा लागतो. सामाजिक भावनेचा प्रश्न अशा संस्थांसमोर नेहमी असतो, असे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी डॉ. सिंधू काकडे यांनीही मार्गदर्शन केले. दिव्यांगांच्या प्रश्नांवर प्रसंगी लढा उभारण्याची वेळ आल्यानंतर सर्वांनी त्यासाठी पुढे आले पाहिजे, असेही मुनशेट्टीवार यांनी सांगितले. यावेळी संगीता बुथकर, किशोर काळे, कैलास गोडसे, डॉ. संगीता पवार, किरण तुपलोंढे, शशांक हिरे उपस्थित होते. याप्रसंगी साळुंखे, बैसाने, काशीनाथ पाडवी, नितीन निर्मळ, रेखा साळुंके, घनदाट यांचा सत्कार करण्यात आला. संस्थेच्या अध्यक्षा शोभा काळे यांनी प्रास्ताविक केले तर संगीता पवार यांनी आभार मानले.यावेळी सूर्यभान साळुंके, नितीन घनदाट, शारदा व शैलेश बैसाने, कैलास निर्मळ यांनी अनुभव कथन केले. दिव्यांगांच्या बाबतीतील काही महत्त्वाच्या बाबी आणि सत्य स्वीकारणे अपेक्षित असते. आपल्या मर्यादा ओळखून आपल्या इच्छांना आळा घालता आले पाहिजे. आपल्या आयुष्यात येणाऱ्या अडचणीच्या क्षणांचा समरस होऊन सामना केला, तर जोडीदार कोणीही असो जीवन सुखी झाल्याशिवाय राहत नाही, अशादेखील भावना दिव्यांग व्यक्तींनी व्यक्त केल्या.

टॅग्स :Nashikनाशिक