शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
2
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
3
Operation Sindoor Live Updates: स्फोटाचा आवाजांमुळे अमृतसरमध्ये रात्रभर ब्लॅक आऊट; पोलिस म्हणतात काहीच सापडले नाही
4
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
6
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
7
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
8
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
9
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
10
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
11
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
12
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
13
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
14
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
15
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
16
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
17
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
18
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
19
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
20
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 

बहिणाबार्इंच्या रचनेतून आयुष्याचे बोलके चित्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 00:40 IST

आपल्या सहज, सोप्या, साध्या बोलीभाषेत जगण्याचे सार सांगणाऱ्या कवयित्री म्हणून बहिणाबाई चौधरी यांच्या कवितांचा जागर सोमवारी (दि. २५) नाशकात झाला आणि प्रत्येकाला आपल्याच आयुष्याचे बोलके चित्रण समोर उभे राहिल्याचा भास झाला.

नाशिक : आपल्या सहज, सोप्या, साध्या बोलीभाषेत जगण्याचे सार सांगणाऱ्या कवयित्री म्हणून बहिणाबाई चौधरी यांच्या कवितांचा जागर सोमवारी (दि. २५) नाशकात झाला आणि प्रत्येकाला आपल्याच आयुष्याचे बोलके चित्रण समोर उभे राहिल्याचा भास झाला.विकास अणि अनुराधा गरुड यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मंजूषा सोमण यांचे ओघवत निवेदन आणि गीता गद्रे यांनी स्वरबद्ध केलेल्या या कविता ऐकताना उपस्थित भारावून गेले. अक्षरांशी ओळख नसल्याने त्यांना निरक्षर म्हणणे योग्य आहे मात्र अशिक्षित म्हणणे अयोग्य असल्याचा विचार मंजूषा सोमण यांनी मांडला. बहिणाबार्इंच्या कविता वºहाडी-खान्देशीत, त्यांच्या मातृबोलीत रचलेल्या आहेत. त्यांच्या कवितांचे विषय माहेर, संसार, शेतीची साधने, कापणी, मळणी असे रोजच्या जीवनातील आहे. गीता गद्रे यांनी सादर केलेल्या रचनांतून शेती, सणवार आदी प्रसंग डोळ्यासमोर अक्षरश: उभे राहिले. निवेदनाच्या रूपातून बहिणाबार्इंचे आयुष्य उलगडत होते. गीता गद्रे यांनी याच स्वरबद्ध केलेल्या शब्दांना रसिकांनी उस्फूर्त दाद दिली. तल्लख स्मरणशक्ती, सूक्ष्म निरीक्षण, उपजत विनोदबुद्धी, जीवनातील सुख-दु:खाकडे समभावाने पाहू शकणारे शहाणपण आणि जगण्यातून कळलेले तत्त्वज्ञान हा बहिणाबार्इंच्या रचनेचा नेमका बाज मंजूषा सोमण आणि गीता गद्रे यांनी सांभाळला.

टॅग्स :cultureसांस्कृतिकNashikनाशिक