शहरं
Join us  
Trending Stories
1
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
2
"खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
3
MHADA Lottery: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'म्हाडा'च्या लॉटरीत वाकड-हिंजवडीत फक्त २८ लाखांत घर; ६० लाखांची थेट बचत!
4
कारच्या बंद दरवाजात गुदमरले जीव, ५ जणांचा मृत्यू; Tesla कारविरोधात खटला दाखल, काय आहे प्रकरण?
5
मेसेजची रिंग वाजली? लाडकी बहीण योजनेचे आज पैसे येणार; eKYC न केलेल्या महिलांचे काय?
6
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
7
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
8
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
9
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
10
वर्षभरापासून सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात कैद, भारत सरकारकडे मागितली मदत; प्रकरण काय?
11
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
12
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
13
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा
14
Tripuri Purnima 2025: त्रिपुरी पौर्णिमा हीच 'मनोरथ पौर्णिमा'; ५ नोव्हेंबरला 'या' वस्तूंचे दान ठरेल वरदान!
15
'तुझ्यासाठी बायकोला संपवलं'; दुसऱ्या लग्नासाठी डॉक्टरने केली पत्नीची हत्या; मेसेजमुळे 'डबल गेम'चा पर्दाफाश
16
...म्हणून त्या डंपरचालकाने ५० जणांना चिरडलं, धक्कादायक कारण समोर आलं
17
ऐतिहासिक अंदाज: निफ्टी ५४,००० अंकांचा टप्पा गाठणार; काय म्हणाले एक्सपर्ट?
18
आई-वडिलांशिवाय लेकाची पहिली फ्लाईट, जिनिलिया देशमुखने शेअर केला व्हिडीओ; म्हणाली...
19
Reliance Anil Ambani: अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
20
Tripuri Purnima 2025: दिवाळीनंतर येणारी त्रिपुरी पौर्णिमा का महत्त्वाची? कशी करावी शिवउपासना?

मुंबई-आग्रा महामार्गावरील चौफुलींंवर  जीवघेणी कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 00:37 IST

मुंबई-आग्रा महामार्गावरील चौफुलींंवर वाहनधारकांसह पादचाऱ्यांची जीवघेणी कसरत सुरू आहे. या महामार्गावर अनेकांचा बळी गेला आहे, तर काही लोकांना कायमस्वरूपी अपंगत्व आले आहे. के. के. वाघ ते जत्रा हॉटेल उड्डाणपुलाचे भूमिपूजन होऊन जवळपास दीड वर्ष उलटूनही काम सुरू झालेले नाही. प्रत्यक्ष कामाला सुरुवात कधी होणार, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.

आडगाव : मुंबई-आग्रा महामार्गावरील चौफुलींंवर वाहनधारकांसह पादचाऱ्यांची जीवघेणी कसरत सुरू आहे. या महामार्गावर अनेकांचा बळी गेला आहे, तर काही लोकांना कायमस्वरूपी अपंगत्व आले आहे. के. के. वाघ ते जत्रा हॉटेल उड्डाणपुलाचे भूमिपूजन होऊन जवळपास दीड वर्ष उलटूनही काम सुरू झालेले नाही. प्रत्यक्ष कामाला सुरुवात कधी होणार, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.मुंबई-आग्रा महामार्गावरील अमृतधाम, रासबिहारी, जत्रा चौफुली याठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या नित्याची झाली असून, रोज लहान-मोठे अपघात घडतात. या उड्डाणपुलासाठी चौफुलीवर अनेक संघटनांनी, स्थानिक नागरिकांनी आंदोलने करून पाठपुरावा केल्यानंतर प्रशासनाने उड्डाणपूल मंजूर केला. महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर दीड वर्षापूर्वी मोठ्या दिमाखात भूमिपूजन करण्यात आले पण अजूनही उड्डाणपुलाच्या कामाला मुहूर्त मिळालेला दिसत नाही. त्यामुळे प्रशासन अजून किती बळी घेण्याची वाट बघत आहे, असा संतप्त सवाल नागरिकांनी विचारला आहे. या मार्गावर चारही बाजूने प्रचंड वेगाने वाहतूक सुरू असते. बघताक्षणी वाहने अंगावर येतात. त्यामुळे रस्ता क्र ॉस करताना लहान मुले, वयोवृद्ध नागरिक व महिलांची तारांबळ उडते. या गोंधळात बºयाचदा अपघात घडतात. शिवाय या परिसरात शाळा, कॉलेजेस यांची संख्यादेखील मोठी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा नेहमी राबता असतो. वाहतूक पोलीसदेखील कायमस्वरूपी दिसत नाही. अशी तक्रार नागरिक करत आहे. सन २०१३ पासून आजपर्यंत ४०५ अपघात आडगाव पोलीस स्टेशन हद्दीत दाखल झालेले आहेत. त्यामध्ये १६३ लोकांचा मृत्यू झाला असून २९४ लोक जखमी झाले आहेत. यातील ८० टक्के अपघात मुंबई-आग्रा महामार्गावरील चौफुल्यांवर झालेले आहेत.मुंबई-आग्रा रोडवरील चौफुलींवर वाहतूक कोंडी व अपघात ही समस्या गंभीर झाली असून, उड्डाणपूल होणे गरजेचे आहे. पण दीड वर्ष उलटूनही कामाला मुहूर्त मिळत नाही. या समस्या सोडविण्यासाठी तत्काळ उड्डाणपुलाचे काम सुरू करावे.- संदीप जाधव, नागरिक

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीroad safetyरस्ते सुरक्षा