शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-आग्रा महामार्गावरील चौफुलींंवर  जीवघेणी कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 00:37 IST

मुंबई-आग्रा महामार्गावरील चौफुलींंवर वाहनधारकांसह पादचाऱ्यांची जीवघेणी कसरत सुरू आहे. या महामार्गावर अनेकांचा बळी गेला आहे, तर काही लोकांना कायमस्वरूपी अपंगत्व आले आहे. के. के. वाघ ते जत्रा हॉटेल उड्डाणपुलाचे भूमिपूजन होऊन जवळपास दीड वर्ष उलटूनही काम सुरू झालेले नाही. प्रत्यक्ष कामाला सुरुवात कधी होणार, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.

आडगाव : मुंबई-आग्रा महामार्गावरील चौफुलींंवर वाहनधारकांसह पादचाऱ्यांची जीवघेणी कसरत सुरू आहे. या महामार्गावर अनेकांचा बळी गेला आहे, तर काही लोकांना कायमस्वरूपी अपंगत्व आले आहे. के. के. वाघ ते जत्रा हॉटेल उड्डाणपुलाचे भूमिपूजन होऊन जवळपास दीड वर्ष उलटूनही काम सुरू झालेले नाही. प्रत्यक्ष कामाला सुरुवात कधी होणार, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.मुंबई-आग्रा महामार्गावरील अमृतधाम, रासबिहारी, जत्रा चौफुली याठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या नित्याची झाली असून, रोज लहान-मोठे अपघात घडतात. या उड्डाणपुलासाठी चौफुलीवर अनेक संघटनांनी, स्थानिक नागरिकांनी आंदोलने करून पाठपुरावा केल्यानंतर प्रशासनाने उड्डाणपूल मंजूर केला. महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर दीड वर्षापूर्वी मोठ्या दिमाखात भूमिपूजन करण्यात आले पण अजूनही उड्डाणपुलाच्या कामाला मुहूर्त मिळालेला दिसत नाही. त्यामुळे प्रशासन अजून किती बळी घेण्याची वाट बघत आहे, असा संतप्त सवाल नागरिकांनी विचारला आहे. या मार्गावर चारही बाजूने प्रचंड वेगाने वाहतूक सुरू असते. बघताक्षणी वाहने अंगावर येतात. त्यामुळे रस्ता क्र ॉस करताना लहान मुले, वयोवृद्ध नागरिक व महिलांची तारांबळ उडते. या गोंधळात बºयाचदा अपघात घडतात. शिवाय या परिसरात शाळा, कॉलेजेस यांची संख्यादेखील मोठी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा नेहमी राबता असतो. वाहतूक पोलीसदेखील कायमस्वरूपी दिसत नाही. अशी तक्रार नागरिक करत आहे. सन २०१३ पासून आजपर्यंत ४०५ अपघात आडगाव पोलीस स्टेशन हद्दीत दाखल झालेले आहेत. त्यामध्ये १६३ लोकांचा मृत्यू झाला असून २९४ लोक जखमी झाले आहेत. यातील ८० टक्के अपघात मुंबई-आग्रा महामार्गावरील चौफुल्यांवर झालेले आहेत.मुंबई-आग्रा रोडवरील चौफुलींवर वाहतूक कोंडी व अपघात ही समस्या गंभीर झाली असून, उड्डाणपूल होणे गरजेचे आहे. पण दीड वर्ष उलटूनही कामाला मुहूर्त मिळत नाही. या समस्या सोडविण्यासाठी तत्काळ उड्डाणपुलाचे काम सुरू करावे.- संदीप जाधव, नागरिक

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीroad safetyरस्ते सुरक्षा