शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
2
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
5
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
6
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
7
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
8
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
9
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
10
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
11
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
12
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
13
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
14
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
15
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
16
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
17
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
18
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
19
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
20
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश

मुंबई-आग्रा महामार्गावरील चौफुलींंवर  जीवघेणी कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 00:37 IST

मुंबई-आग्रा महामार्गावरील चौफुलींंवर वाहनधारकांसह पादचाऱ्यांची जीवघेणी कसरत सुरू आहे. या महामार्गावर अनेकांचा बळी गेला आहे, तर काही लोकांना कायमस्वरूपी अपंगत्व आले आहे. के. के. वाघ ते जत्रा हॉटेल उड्डाणपुलाचे भूमिपूजन होऊन जवळपास दीड वर्ष उलटूनही काम सुरू झालेले नाही. प्रत्यक्ष कामाला सुरुवात कधी होणार, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.

आडगाव : मुंबई-आग्रा महामार्गावरील चौफुलींंवर वाहनधारकांसह पादचाऱ्यांची जीवघेणी कसरत सुरू आहे. या महामार्गावर अनेकांचा बळी गेला आहे, तर काही लोकांना कायमस्वरूपी अपंगत्व आले आहे. के. के. वाघ ते जत्रा हॉटेल उड्डाणपुलाचे भूमिपूजन होऊन जवळपास दीड वर्ष उलटूनही काम सुरू झालेले नाही. प्रत्यक्ष कामाला सुरुवात कधी होणार, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.मुंबई-आग्रा महामार्गावरील अमृतधाम, रासबिहारी, जत्रा चौफुली याठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या नित्याची झाली असून, रोज लहान-मोठे अपघात घडतात. या उड्डाणपुलासाठी चौफुलीवर अनेक संघटनांनी, स्थानिक नागरिकांनी आंदोलने करून पाठपुरावा केल्यानंतर प्रशासनाने उड्डाणपूल मंजूर केला. महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर दीड वर्षापूर्वी मोठ्या दिमाखात भूमिपूजन करण्यात आले पण अजूनही उड्डाणपुलाच्या कामाला मुहूर्त मिळालेला दिसत नाही. त्यामुळे प्रशासन अजून किती बळी घेण्याची वाट बघत आहे, असा संतप्त सवाल नागरिकांनी विचारला आहे. या मार्गावर चारही बाजूने प्रचंड वेगाने वाहतूक सुरू असते. बघताक्षणी वाहने अंगावर येतात. त्यामुळे रस्ता क्र ॉस करताना लहान मुले, वयोवृद्ध नागरिक व महिलांची तारांबळ उडते. या गोंधळात बºयाचदा अपघात घडतात. शिवाय या परिसरात शाळा, कॉलेजेस यांची संख्यादेखील मोठी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा नेहमी राबता असतो. वाहतूक पोलीसदेखील कायमस्वरूपी दिसत नाही. अशी तक्रार नागरिक करत आहे. सन २०१३ पासून आजपर्यंत ४०५ अपघात आडगाव पोलीस स्टेशन हद्दीत दाखल झालेले आहेत. त्यामध्ये १६३ लोकांचा मृत्यू झाला असून २९४ लोक जखमी झाले आहेत. यातील ८० टक्के अपघात मुंबई-आग्रा महामार्गावरील चौफुल्यांवर झालेले आहेत.मुंबई-आग्रा रोडवरील चौफुलींवर वाहतूक कोंडी व अपघात ही समस्या गंभीर झाली असून, उड्डाणपूल होणे गरजेचे आहे. पण दीड वर्ष उलटूनही कामाला मुहूर्त मिळत नाही. या समस्या सोडविण्यासाठी तत्काळ उड्डाणपुलाचे काम सुरू करावे.- संदीप जाधव, नागरिक

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीroad safetyरस्ते सुरक्षा