शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

राजापूर परिसरातील पिकांना जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 00:00 IST

राजापूर : परिसरात शुक्रवारी (दि.९) संध्याकाळी पावसाने हजेरी लावल्याने खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे. खरिपाच्या पेरणीनंतर पावसाचा खंड पडला ...

ठळक मुद्देशेतकऱ्यांत समाधान : दुबार पेरणीचे संकट टळले

राजापूर : परिसरात शुक्रवारी (दि.९) संध्याकाळी पावसाने हजेरी लावल्याने खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे. खरिपाच्या पेरणीनंतर पावसाचा खंड पडला होता. पिके पाण्यावाचून सुकू लागली असताना वरुणराजाने हजेरी लावल्याने पिके पुन्हा तरारली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांत समाधान व्यक्त होत आहे.राजापूर व परिसरात उत्तर पूर्व भागात शेतकऱ्यांनी जमिनीत पुरेशी पेरओल असेल तरच पेरणी करावी अन्यथा पेरणी करू नये असे आवाहन कृषी विभागाने शेतकऱ्यांना केले होते. परंतु शेतकऱ्यांनी सुरुवातीला झालेल्या पावसावर पेरण्या उरकल्या होत्या. त्यानंतर पावसाने ओढ दिल्याने शेतकरी चिंतित होता. पेरणी केली पण काही ठिकाणी कोंभ वर आलेच नव्हते. खरिपात शेतकऱ्यांनी मका, भुईमूग, बाजरी, तूर अशी पिके घेतली आहेत. राजापूर व परिसरात दोन टप्प्यांत पेरण्या झाल्या आहेत. आता काही ठिकाणी मका मोठा झाला आहे तर काही मक्याला आताच कोंब फुटत आहे. आजही विहिरींना पाणी नसल्याने शेतकरी वर्ग लाल कांदा उळे टाकण्यासाठी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. पावसाचा खंड पडल्याने पिकांची वाढ काही प्रमाणात खुंटली आहे. त्यात आता लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने पुन्हा औषधे फवारणी केली जात आहे.राजापूर येथे बऱ्याच पेरण्यांमध्ये तीन आठवड्यांचा फरक आहे. अगोदरच्या पिकांची दोनदा कोळपणी झाली आहे. तर नंतर पेरणी केलेली पिके हे आता उतरत आहेत. काही शेतकऱ्यांनी काळपट जमीन असलेल्या शेतात सोयाबीन पेरणी केली, परंतु पुरेशी पेरओलअभावी दुबार पेरणी करावी लागली आहे. अगोदर पेरणी केलेल्या पिकांना आता पाऊस झाल्याने युरिया खताची मात्रा देणे सुरू असून बऱ्याच शेतकऱ्यांना युरिया खत मिळत नसल्याने त्यांची धावपळ सुरू झाली आहे. पावसाळ्यात दरवर्षी युरिया खताची टंचाई निर्माण होते की केली जाते याबाबत शंका उपस्थित केली जात आहे.विहिरींनी अजूनही तळ गाठलेला आहे. आता थोडाफार प्रमाणात पाऊस झाल्याने पिकांना या नक्षत्राने जीवदान दिले आहे. येथून मागे दोन दिवसांपूर्वी पिकांची परिस्थिती बिकट झाली होती. सध्या महागाई भरमसाठ वाढली असून, याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. शासनाने कर्जमाफी केली असली तरी बरेच शेतकरी वंचित राहिले आहेत; परंतु यात जे शेतकरी थकीत राहतात त्यांना कर्जमाफी दिली जाते. व जे शेतकरी थकीत न राहता कर्ज वेळेवर भरतात त्यांना कर्जमाफी नाही ही शासनाने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. दोन लाखांपर्यंत सरसकट कर्ज माफ केले असते तर उर्वरित दोन लाखांवरील शेतकऱ्यांनी भरून दिले असते, अशी चर्चा सध्या होताना दिसत आहे.शेतकरी वर्ग हा नेहमी आशावादी राहून शेतीकामात व्यस्त असतो. शेतकऱ्यांना वेळेवर खते मिळत नाही. वेळेवर पाऊस नाही अशा अनेक समस्या शेतकऱ्यांच्या जीवनात येतात. तरीही शेतकरी न डगमगता संकटांना सामोरे जातो. शेतकऱ्यांवर पेरणीपासून ते पीक येईपर्यंत अनेक संकटे येतात. शासनाने शेतकऱ्यांच्या हिताकडे लक्ष केंद्रित करावे.- साखरचंद घुगे, शेतकरी, राजापूर 

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती