शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
4
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
5
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
6
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
7
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
8
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
9
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
10
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
11
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
12
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
13
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
14
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
15
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
16
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
17
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
18
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
19
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
20
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!

जीवनदर्शी साहित्यनिर्मिती व्हावी

By admin | Updated: September 29, 2014 00:18 IST

अनिल अवचट : सावाना जिल्हा साहित्यिक मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी प्रतिपादन

नाशिक : साहित्यात संस्कृतीपुढचे प्रश्न तीव्रतेने मांडले जात नाहीत. साहित्य हे रंजनात्मक नव्हे, तर जीवनदर्शी असले पाहिजे. आपला शब्द, अनुभव आपला असला पाहिजे. माणूसपण शोषून घेणाऱ्या संस्कृतीपासून दूर राहण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ लेखक अनिल अवचट यांनी सावानाच्या वतीने आयोजित जिल्हा साहित्यिक मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना केले.सार्वजनिक वाचनालयाच्या लिमये सभागृहात आयोजित ४७ व्या साहित्यिक मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ लेखिका व एशियाटिक लायब्ररीच्या उपाध्यक्ष डॉ. मीना वैशंपायन होत्या. यावेळी अनिल अवचट यांनी ‘साहित्यावर बोलू काही’ या विषयावर बोलताना सांगितले, आपण समाजात जितके खोलवर जाऊन वेध घेऊ तितके साहित्य सकस होणार आहे. दुसऱ्यांचे जीवन जाणण्याची संवेदना माणसात आहे. महाराष्ट्राबाहेरील प्रेमचंद, शिवराम कारंथ यांसारख्या लेखकांच्या साहित्यात माणसांचे अस्सल चित्रण दिसून येते. आपल्या मराठी साहित्यात ते अलीकडे आले. निसर्गाचा रसरशीतपणाही आपल्या साहित्यात नाही. पूर्वी फडके-खांडेकर यांच्यापलीकडे साहित्य जात नव्हते. १९६० नंतर बांध मोकळे झाले. दलित आत्मनिवेदनानंतर एक चांगली कादंबरी दिसून येत नाही. आपल्याकडे लांब पल्ल्याचे घोडे का निर्माण होत नाहीत, असा प्रश्नही अवचट यांनी उपस्थित केला. संस्कृतीचे वस्त्र रक्ताच्या डागाने डागाळलेले आहे. कल्पक माणसाचे रूपांतर ग्राहकात झाले आहे. अंधानुकरण हा एक मंत्र झाला आहे. साहित्यात समाजाला पुढची दिशा दाखविण्याचे काम झाले पाहिजे. भाषांतरित चांगले साहित्य आले पाहिजे. दुर्दैवाने त्यात सनसनाटीपणाच अधिक दिसून येतो. मातृभाषेतून संस्कृतीचे वहन होत असते. एका संस्कृतीचे भरणपोषण झाले की दुसरी संस्कृती स्वीकारता येते. मराठी माध्यमाच्या शाळा जगल्या पाहिजे, असा आग्रहही अवचट यांनी धरला. प्रारंभी अवचट यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. अवचट यांचा परिचय अरुण ठाकूर यांनी करून दिला. व्यासपीठावर मेळाव्याचे मावळते अध्यक्ष कवी खलील मोमीन, वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर, कार्यवाह मिलिंद जहागीरदार, कार्याध्यक्ष विनया केळकर आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)