शहरं
Join us  
Trending Stories
1
तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
4
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्विट केलं डिलीट
5
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
6
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
7
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
8
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
9
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
10
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
11
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
12
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
13
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
14
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
15
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
16
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
17
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
18
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
19
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?

जीवनदर्शी साहित्यनिर्मिती व्हावी

By admin | Updated: September 29, 2014 00:18 IST

अनिल अवचट : सावाना जिल्हा साहित्यिक मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी प्रतिपादन

नाशिक : साहित्यात संस्कृतीपुढचे प्रश्न तीव्रतेने मांडले जात नाहीत. साहित्य हे रंजनात्मक नव्हे, तर जीवनदर्शी असले पाहिजे. आपला शब्द, अनुभव आपला असला पाहिजे. माणूसपण शोषून घेणाऱ्या संस्कृतीपासून दूर राहण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ लेखक अनिल अवचट यांनी सावानाच्या वतीने आयोजित जिल्हा साहित्यिक मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना केले.सार्वजनिक वाचनालयाच्या लिमये सभागृहात आयोजित ४७ व्या साहित्यिक मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ लेखिका व एशियाटिक लायब्ररीच्या उपाध्यक्ष डॉ. मीना वैशंपायन होत्या. यावेळी अनिल अवचट यांनी ‘साहित्यावर बोलू काही’ या विषयावर बोलताना सांगितले, आपण समाजात जितके खोलवर जाऊन वेध घेऊ तितके साहित्य सकस होणार आहे. दुसऱ्यांचे जीवन जाणण्याची संवेदना माणसात आहे. महाराष्ट्राबाहेरील प्रेमचंद, शिवराम कारंथ यांसारख्या लेखकांच्या साहित्यात माणसांचे अस्सल चित्रण दिसून येते. आपल्या मराठी साहित्यात ते अलीकडे आले. निसर्गाचा रसरशीतपणाही आपल्या साहित्यात नाही. पूर्वी फडके-खांडेकर यांच्यापलीकडे साहित्य जात नव्हते. १९६० नंतर बांध मोकळे झाले. दलित आत्मनिवेदनानंतर एक चांगली कादंबरी दिसून येत नाही. आपल्याकडे लांब पल्ल्याचे घोडे का निर्माण होत नाहीत, असा प्रश्नही अवचट यांनी उपस्थित केला. संस्कृतीचे वस्त्र रक्ताच्या डागाने डागाळलेले आहे. कल्पक माणसाचे रूपांतर ग्राहकात झाले आहे. अंधानुकरण हा एक मंत्र झाला आहे. साहित्यात समाजाला पुढची दिशा दाखविण्याचे काम झाले पाहिजे. भाषांतरित चांगले साहित्य आले पाहिजे. दुर्दैवाने त्यात सनसनाटीपणाच अधिक दिसून येतो. मातृभाषेतून संस्कृतीचे वहन होत असते. एका संस्कृतीचे भरणपोषण झाले की दुसरी संस्कृती स्वीकारता येते. मराठी माध्यमाच्या शाळा जगल्या पाहिजे, असा आग्रहही अवचट यांनी धरला. प्रारंभी अवचट यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. अवचट यांचा परिचय अरुण ठाकूर यांनी करून दिला. व्यासपीठावर मेळाव्याचे मावळते अध्यक्ष कवी खलील मोमीन, वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर, कार्यवाह मिलिंद जहागीरदार, कार्याध्यक्ष विनया केळकर आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)