शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

जीवनदर्शी साहित्यनिर्मिती व्हावी

By admin | Updated: September 29, 2014 00:18 IST

अनिल अवचट : सावाना जिल्हा साहित्यिक मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी प्रतिपादन

नाशिक : साहित्यात संस्कृतीपुढचे प्रश्न तीव्रतेने मांडले जात नाहीत. साहित्य हे रंजनात्मक नव्हे, तर जीवनदर्शी असले पाहिजे. आपला शब्द, अनुभव आपला असला पाहिजे. माणूसपण शोषून घेणाऱ्या संस्कृतीपासून दूर राहण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ लेखक अनिल अवचट यांनी सावानाच्या वतीने आयोजित जिल्हा साहित्यिक मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना केले.सार्वजनिक वाचनालयाच्या लिमये सभागृहात आयोजित ४७ व्या साहित्यिक मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ लेखिका व एशियाटिक लायब्ररीच्या उपाध्यक्ष डॉ. मीना वैशंपायन होत्या. यावेळी अनिल अवचट यांनी ‘साहित्यावर बोलू काही’ या विषयावर बोलताना सांगितले, आपण समाजात जितके खोलवर जाऊन वेध घेऊ तितके साहित्य सकस होणार आहे. दुसऱ्यांचे जीवन जाणण्याची संवेदना माणसात आहे. महाराष्ट्राबाहेरील प्रेमचंद, शिवराम कारंथ यांसारख्या लेखकांच्या साहित्यात माणसांचे अस्सल चित्रण दिसून येते. आपल्या मराठी साहित्यात ते अलीकडे आले. निसर्गाचा रसरशीतपणाही आपल्या साहित्यात नाही. पूर्वी फडके-खांडेकर यांच्यापलीकडे साहित्य जात नव्हते. १९६० नंतर बांध मोकळे झाले. दलित आत्मनिवेदनानंतर एक चांगली कादंबरी दिसून येत नाही. आपल्याकडे लांब पल्ल्याचे घोडे का निर्माण होत नाहीत, असा प्रश्नही अवचट यांनी उपस्थित केला. संस्कृतीचे वस्त्र रक्ताच्या डागाने डागाळलेले आहे. कल्पक माणसाचे रूपांतर ग्राहकात झाले आहे. अंधानुकरण हा एक मंत्र झाला आहे. साहित्यात समाजाला पुढची दिशा दाखविण्याचे काम झाले पाहिजे. भाषांतरित चांगले साहित्य आले पाहिजे. दुर्दैवाने त्यात सनसनाटीपणाच अधिक दिसून येतो. मातृभाषेतून संस्कृतीचे वहन होत असते. एका संस्कृतीचे भरणपोषण झाले की दुसरी संस्कृती स्वीकारता येते. मराठी माध्यमाच्या शाळा जगल्या पाहिजे, असा आग्रहही अवचट यांनी धरला. प्रारंभी अवचट यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. अवचट यांचा परिचय अरुण ठाकूर यांनी करून दिला. व्यासपीठावर मेळाव्याचे मावळते अध्यक्ष कवी खलील मोमीन, वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर, कार्यवाह मिलिंद जहागीरदार, कार्याध्यक्ष विनया केळकर आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)